अ‍ॅपशहर

'मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही'; बंडखोर गटात सामील होण्याच्या चर्चेवर आमदाराचं स्पष्टीकरण

Shivsena MLA : मी बंडखोरी करणार असल्याच्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून माझ्या मतदारसंघातील लोकांनी अस्वस्थ होऊ नये, असं आवाहनही आमदारांकडून करण्यात आलं आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jun 2022, 3:21 pm
मुंबई : शिवसेनेच्या विधानसभेतील ५५ पैकी ४० पेक्षा अधिक आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला असून इतरही आमदारांबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. परभणीतील शिवसेना आमदार राहुल पाटील यांच्याबाबतही ते गुवाहाटी येथील बंडखोरांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर आमदार राहुल पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं असून मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

'माझ्याविरोधात खोट्या बातम्या पसरवण्याचं काम केलं जातं आहे. मी माझ्या मतदार संघातील दैनंदिन कामकाज संपवून मंत्रालयातच आहे. मी कुठेही जाणार नाही. कालही नाही, आजही नाही आणि उद्याही जाणार नाही. मी बंडखोरी करणार असल्याच्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून माझ्या मतदारसंघातील लोकांनी अस्वस्थ होऊ नये. मी मरेपर्यंत शिवसेनेत राहणार, असं वचन देतो,' असं आमदार राहुल पाटील यांनी एक व्हिडिओ शेअर करून सांगितलं आहे.

दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांचा गट दिवसेंदिवस राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत आहे. या गटाने काल सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आपण राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढत असल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे हा राजकीय संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज