मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या कारवाईनंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये भाषेच्या वापरावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'सामना'त बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखाला आक्षेप घेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये 'सामना'च्या संपादिका व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. वाचा: 'काही जुने व्हायरस परत आलेत; त्यांचा बंदोबस्त करायचाय'
ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राणेंच्या अटक प्रकरणानंतर शिवसेनेच्या मुखपत्रातून काल त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. 'भोक पडलेला फुगा' अशी उपमा राणेंना देण्यात आली होती. तसंच, राणे हे छपरी गँगस्टरसारखे वागतात, असंही म्हटलं गेलं होतं. त्यास आक्षेप घेत नाशिकमध्ये आज तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याबाबत राऊत यांना विचारलं असता, 'सामनाचा कार्यकारी संपादक मी आहे. त्या अग्रलेखाची जबाबदारी माझी आहे, रश्मी ठाकरेंची नाही,' असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
'ती' वेळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर येऊ नये: उद्धव ठाकरे
नारायण राणे यांच्यावर त्यांनी पुन्हा एकदा जहरी टीका केली. 'तुम्ही केंद्रीय मंत्री आहात तर देश समजून घ्या. मग राजकारणावर बोला. तुमच्या खात्याचं काम करण्यासाठी तुम्हाला मंत्रिपद दिलंय. महाराष्ट्रात येऊन बकाल बडबड करायला तुम्हाला खातं दिलंय. तुम्ही तुमचं खातं मजबूत करा. देशाला दिशा द्या, आम्ही तुमचं स्वागत करू. शहाणपणा करून आमच्या अंगावर याल तर ही शिवसेना आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा राऊत यांनी दिला.
जातीनिहाय जनगणना: रोहित पवारांनी दिलं बिहारचं 'हे' उदाहरण
ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राणेंच्या अटक प्रकरणानंतर शिवसेनेच्या मुखपत्रातून काल त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. 'भोक पडलेला फुगा' अशी उपमा राणेंना देण्यात आली होती. तसंच, राणे हे छपरी गँगस्टरसारखे वागतात, असंही म्हटलं गेलं होतं. त्यास आक्षेप घेत नाशिकमध्ये आज तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याबाबत राऊत यांना विचारलं असता, 'सामनाचा कार्यकारी संपादक मी आहे. त्या अग्रलेखाची जबाबदारी माझी आहे, रश्मी ठाकरेंची नाही,' असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
'ती' वेळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर येऊ नये: उद्धव ठाकरे
नारायण राणे यांच्यावर त्यांनी पुन्हा एकदा जहरी टीका केली. 'तुम्ही केंद्रीय मंत्री आहात तर देश समजून घ्या. मग राजकारणावर बोला. तुमच्या खात्याचं काम करण्यासाठी तुम्हाला मंत्रिपद दिलंय. महाराष्ट्रात येऊन बकाल बडबड करायला तुम्हाला खातं दिलंय. तुम्ही तुमचं खातं मजबूत करा. देशाला दिशा द्या, आम्ही तुमचं स्वागत करू. शहाणपणा करून आमच्या अंगावर याल तर ही शिवसेना आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा राऊत यांनी दिला.
जातीनिहाय जनगणना: रोहित पवारांनी दिलं बिहारचं 'हे' उदाहरण