म. टा. प्रतिनिधी, मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारचे लवकरच खातेवाटप होणार असून, याबाबतची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली असल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सरकारमधील ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी दिले. आपण रविवारी रात्री मुंबईत परत येत असून, आघाडीतील तीन पक्षांच्या नेत्यांशी अद्याप संपर्क होत नसल्यामुळे खातेवाटपाबाबत रविवार रात्रीपर्यंत निर्णय अपेक्षित नसल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
'महाराष्ट्रातील बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन तीनही पक्ष एका विचाराने एकत्र आले आहेत. आमच्यात कोणताही वाद नाही', असेही थोरात यांनी स्पष्ट केले. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटामुळे शेतकरी कठीण परिस्थितीत आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याची सरकारची भूमिका आहे', असे ते म्हणाले. विद्यमान सरकार आम्हाला पाच वर्षे चालवायचे आहे. त्यासाठी तीनही घटक पक्ष एकत्र येऊन किमान समान कार्यक्रमावर काम करतील, असेही त्यांनी सांगितले.
'काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्रिमंडळात हवेत'
'उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीत काँग्रेसची फरफट होऊ नये, यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ, अनुभवी, नव्या दमाच्या नेत्यांचा सहभाग मंत्रिमंडळात असायला हवा', अशी भूमिका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मांडली आहे. 'काँग्रेसच्या वाट्याला १२ कॅबिनेट मंत्रिपदे आली आहेत. त्यात कुणाची वर्णी लागणार याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. सरकारमध्ये पक्षाची फरफट होऊ नये यासाठी प्रशासनाचा अनुभव असलेल्यांची वर्णी लागणे आवश्यक आहे', असे चव्हाण यांचे म्हणणे आहे.
'महाराष्ट्रातील बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन तीनही पक्ष एका विचाराने एकत्र आले आहेत. आमच्यात कोणताही वाद नाही', असेही थोरात यांनी स्पष्ट केले. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटामुळे शेतकरी कठीण परिस्थितीत आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याची सरकारची भूमिका आहे', असे ते म्हणाले. विद्यमान सरकार आम्हाला पाच वर्षे चालवायचे आहे. त्यासाठी तीनही घटक पक्ष एकत्र येऊन किमान समान कार्यक्रमावर काम करतील, असेही त्यांनी सांगितले.
'काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंत्रिमंडळात हवेत'
'उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीत काँग्रेसची फरफट होऊ नये, यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ, अनुभवी, नव्या दमाच्या नेत्यांचा सहभाग मंत्रिमंडळात असायला हवा', अशी भूमिका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मांडली आहे. 'काँग्रेसच्या वाट्याला १२ कॅबिनेट मंत्रिपदे आली आहेत. त्यात कुणाची वर्णी लागणार याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. सरकारमध्ये पक्षाची फरफट होऊ नये यासाठी प्रशासनाचा अनुभव असलेल्यांची वर्णी लागणे आवश्यक आहे', असे चव्हाण यांचे म्हणणे आहे.