अ‍ॅपशहर

अनंत गीतेंची शरद पवारांवर टीका; संजय राऊत भडकले, म्हणाले...

अनंत गीते (Anant Gite) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याशी शिवसेनेचा संबंध नाही. अशा वक्तव्यांची आम्ही दखल घेत नाही, असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केलं आहे.

Authored byगणेश कदम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Dec 2022, 6:25 pm

हायलाइट्स:

  • अनंत गीतेंच्या पवारांवरील टीकेमुळं शिवसेनेतही नाराजी
  • संजय राऊत म्हणाले, पवार हे आमचे नेतेच!
  • अनंत गीतेंच्या वक्तव्याची दखल घेत नाही - संजय राऊत
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम geete raut
अनंत गीतेंची शरद पवारांवर टीका; संजय राऊत भडकले, म्हणाले...
मुंबई: माजी केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते अनंत गीते (Anant Gite) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या जाहीर टीकेचे पडसाद राजकीय वर्तुळात अद्यापही उमटत आहेत. गीतेंच्या वक्तव्यामुळं शिवसेनेतही अस्वस्थता आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही अस्वस्थता बोलून दाखवली आहे. 'अशा प्रकारच्या वक्तव्यांची आम्ही दखल घेत नाही,' असं त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी हे कधीच शिवसेनेचे होऊ शकत नाहीत. शरद पवार हे आमचे नेते नाहीत. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, असं वक्तव्य अनंत गीते यांनी केलं होतं. स्थानिक राजकीय वादाची किनार त्यांच्या वक्तव्याला होती. मात्र, त्यामुळं महाविकास आघाडीत अस्वस्थता होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं तात्काळ गीतेंना प्रत्युत्तर दिलं. आता शिवसेनेनंही गीतेंच्या वक्तव्यावरून हात झटकले आहेत. 'गीतेंच्या वक्तव्याशी पक्षाचा अजिबात संबंध नाही. ते त्यांचं वैयक्तिक मत असेल. त्यांच्या भावना असतील. त्यामागे काही कारणं असतील. पण महाविकास आघाडीच्या नेत्याविषयी असं बोलणं चुकीचं आहे. हे वक्तव्य पक्षशिस्तीत बसणारं नाही,' असं राऊत म्हणाले. ते 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

वाचा: शिर्डीत खळबळ! साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह ६ जणांना अटक

'महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार उत्तम प्रकारे चाललंय. सर्व काही सहमतीनं चाललंय. उद्धव ठाकरे सरकारचं नेतृत्व करताहेत. शरद पवार साहेबांनी स्वत: आग्रहानं उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवलं होतं. शरद पवार हे आमच्या सगळ्यांचे नेते आहेतच. आमचे राजकीय नेते जरूर होते, पण बाळासाहेब आणि पवार अनेकदा एका व्यासपीठावर आलेत हा इतिहास आहे. पवारांनी देशाचं पंतप्रधान व्हावं असं बाळासाहेबांनी स्वत: सांगितलंय. पवारांबाबत आमच्या मनात कायम आदराची भावना आहे. ते देशातील सध्याचे सर्वात मोठे नेते आहेत. त्यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात आहे,' असंही राऊत म्हणाले. अनंत गीते यांच्यावर कारवाई होणार का, या प्रश्नावर पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तो निर्णय घेतील,' असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
वाचा: राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलेल्या उत्तराची देशभरात चर्चा; असं काय आहे पत्रात?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज