अ‍ॅपशहर

ओला-उबरचा फटका 'बेस्ट'लाही बसला: उद्धव ठाकरे

वाहन उद्योगात ओला-उबरमुळे मंदी आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेलं वक्तव्य ताजं असतानाच ओला-उबरचा बेस्टलाही फटका बसल्याचं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Sep 2019, 1:31 pm
मुंबई: वाहन उद्योगात ओला-उबरमुळे मंदी आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेलं वक्तव्य ताजं असतानाच ओला-उबरचा बेस्टलाही फटका बसल्याचं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav-thackeray7


उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बेस्ट उपक्रमात दाखल झालेल्या ६ मिनी वातानुकूलित बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. ओला-उबरमुळे बेस्ट बसेसलाही फटका बसला. आज देशात मंदी आहे. पण ही मंदी दीर्घकाळ राहणार नाही. एक दिवस मंदीही जाईल, असं सांगतानाच आम्ही डबघाईला आलेली बेस्ट सेवा सुरू केली, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. काळानुसार सुधारणा करणं गरजेचं आहे. त्यामुळे बेस्टमध्येही सुधारणा होत आहेत, असं ते म्हणाले. कितीही संकट आलं तरी बेस्टच्या एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नसल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज