मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
'महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे राज्य आणि मुख्यमंत्री आहे तरी लातुरात भारतमातेचा अपमान होऊनही असदुद्दीन ओवेसी लातुरातून सहीसलामत सटकलेच कसे?, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावे लागेल', अशा शब्दांत शिवसेनेने ओवेसी प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले आहे. दरम्यान, जे भारतमातेचा जयजयकार करणार नाहीत त्यांचे नागरिकत्व रद्द करा. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.
माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी मी 'भारत माता की जय' बोलणार नाही असं वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केल्याने मोठे वादळ उठले आहे. ओवेसी यांचीच री ओढणारे एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनाही काल विधानसभेत निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून ओवेसी यांच्यावर बोचऱ्या शब्दांत निशाणा साधला आहे.
भारतमातेला भार बनून येथे का राहता?
सिंधुदुर्गात उपोषणास बसलेल्या आमदारांना पोलीस फोडून काढतात, पण त्याच महाराष्ट्रात देशद्रोहाचा गुन्हा करून ओवेसी सहीसलामत बाहेर पडतात, याबाबत आश्चर्य व्यक्त करताना भारतमातेच्या पाठीवर वार करणाऱ्या ओवेसींच्या माथेफिरूपणावर कायदेशीर इलाज करणे गरजेचे आहे, असा आग्रहच शिवसेनेने राज्य सरकारकडे धरला आहे. भारत माता की जय म्हणायचे नसेल तर मग भारतमातेला भार बनून येथे का राहता?, असा सवालही शिवसेनेने ओवेसी यांना केला.
असदुद्दीन ओवेसी यांनी भारतमातेचा अपमान केला असून त्याविरोधात मुसलमानांनी भारतमातेचा जयजयकार करायला हवा. जे भारतमातेचा जयजयकार करणार नाहीत त्यांचे नागरिकत्व रद्द करा. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.
'महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे राज्य आणि मुख्यमंत्री आहे तरी लातुरात भारतमातेचा अपमान होऊनही असदुद्दीन ओवेसी लातुरातून सहीसलामत सटकलेच कसे?, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावे लागेल', अशा शब्दांत शिवसेनेने ओवेसी प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले आहे. दरम्यान, जे भारतमातेचा जयजयकार करणार नाहीत त्यांचे नागरिकत्व रद्द करा. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.
माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी मी 'भारत माता की जय' बोलणार नाही असं वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केल्याने मोठे वादळ उठले आहे. ओवेसी यांचीच री ओढणारे एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनाही काल विधानसभेत निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून ओवेसी यांच्यावर बोचऱ्या शब्दांत निशाणा साधला आहे.
भारतमातेला भार बनून येथे का राहता?
सिंधुदुर्गात उपोषणास बसलेल्या आमदारांना पोलीस फोडून काढतात, पण त्याच महाराष्ट्रात देशद्रोहाचा गुन्हा करून ओवेसी सहीसलामत बाहेर पडतात, याबाबत आश्चर्य व्यक्त करताना भारतमातेच्या पाठीवर वार करणाऱ्या ओवेसींच्या माथेफिरूपणावर कायदेशीर इलाज करणे गरजेचे आहे, असा आग्रहच शिवसेनेने राज्य सरकारकडे धरला आहे. भारत माता की जय म्हणायचे नसेल तर मग भारतमातेला भार बनून येथे का राहता?, असा सवालही शिवसेनेने ओवेसी यांना केला.
असदुद्दीन ओवेसी यांनी भारतमातेचा अपमान केला असून त्याविरोधात मुसलमानांनी भारतमातेचा जयजयकार करायला हवा. जे भारतमातेचा जयजयकार करणार नाहीत त्यांचे नागरिकत्व रद्द करा. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.