अ‍ॅपशहर

शिवसेनेचं फडणवीस यांना आव्हान

दोन वर्षांत ७२ हजार सरकारी नोकऱ्या देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेचा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. 'बोलायचे आणि विसरून जायचे. थापा मारून वेळ काढायचा हे तंत्र नव्या सरकारला चांगलेच जमते,' असं सुनावतानाच, 'पहिल्या वर्षी ३६ हजार जागा भराल, तेव्हा त्या लोकांची यादीही जाहीर करा,' असं आव्हान उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Mar 2018, 12:33 pm
मुंबई: दोन वर्षांत ७२ हजार सरकारी नोकऱ्या देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेचा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. 'बोलायचे आणि विसरून जायचे. थापा मारून वेळ काढायचा हे तंत्र नव्या सरकारला चांगलेच जमते,' असं सुनावतानाच, 'पहिल्या वर्षी ३६ हजार जागा भराल, तेव्हा त्या लोकांची यादीही जाहीर करा,' असं आव्हान उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shiv sena targets devendra fadnavis over government job announcement
शिवसेनेचं फडणवीस यांना आव्हान


शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांच्या रोजगारासंबंधीच्या घोषणेवर तिरकस भाष्य केलं आहे. एकूण ७२ हजारांपैकी ३६ हजार पदे याच वर्षी भरू, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. या घोषणेचं अभिनंदन करतानाच उद्धव यांनी फडणवीसांना निवडणुकीआधी भाजपनं दिलेल्या आश्वासनांचीही आठवण दिली आहे.

उद्धव म्हणतात...

>> राज्यात फडणवीसांचे सरकार विराजमान झाले तेव्हा पुढील पाच वर्षांत २० लाख रोजगार उपलब्ध होतील असे सांगण्यात आले. त्यातील किती जणांच्या हातास काम मिळाले? आता सरकारी नोकरभरतीची ‘लॉटरी’ जाहीर झाली. पोलिसांना, गरीबांना घरे देण्याच्याही मोठ्या घोषणा झाल्या आहेत.

>> विधानसभा व लोकसभा निवडणुकांआधी ही सर्व भरती करून घेण्याचा मुहूर्त मुख्यमंत्र्यांनी शोधला आहे. चिंता मुहूर्ताची नसून घोषणेच्या अंमलबजावणीची आहे. ११ कोटींच्या महाराष्ट्रात आता ३६ हजारांना सरकारी नोकरी मिळेल, पण इतर लाखो बेरोजगारांचे काय, हा प्रश्न आहेच.

>> सरकारने याआधी कर्जमुक्तीची घोषणा केली होती. ती तोंडास पाने पुसणारी ठरली. ज्यांना कर्जमुक्तीचा लाभ झाला अशा शेतकऱ्यांची यादी जाहीर करा असे तेव्हा आम्ही सुचवले. पण काहीही झाले नाही. सरकारी आकडे व जमिनीवरचे सत्य यात तफावत असते. सरकारला बोलायला काय जाते? बोलायचे आणि विसरून जायचे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज