अ‍ॅपशहर

'मुंबई, तुझा विद्यापीठावर भरवसा नाही काय!'

मुंबई महापालिकेला मुंबईतल्या खड्ड्यांसाठी धारेवर धरले जात असताना शिवसेनेने विद्यार्थ्यांच्या जीवनात पडलेल्या 'खड्ड्यां'साठी मुंबई विद्यापीठाला धारेवर धरले आहे. विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांच्या पार्श्वभूमीवर 'मुंबई, तुझा विद्यापीठावर भरवसा नाही काय!' असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुलगुरूंवर 'सामना'च्या अग्रलेखातून ताशेरे ओढले आहेत. मुंबई विद्यापीठाचा मृत्यू झाला आहे आणि विद्यापीठ परीक्षा व निकालांचे श्राद्ध घालत असल्याचं ठाकरे यांनी अग्रलेखात जाहीर करून टाकलं आहे.

Maharashtra Times 1 Aug 2017, 8:41 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivsena chairperson uddhav thackeray slams vc of mumbai university through editorial in saamana
'मुंबई, तुझा विद्यापीठावर भरवसा नाही काय!'


मुंबई महापालिकेला मुंबईतल्या खड्ड्यांसाठी धारेवर धरले जात असताना शिवसेनेने विद्यार्थ्यांच्या जीवनात पडलेल्या 'खड्ड्यां'साठी मुंबई विद्यापीठाला धारेवर धरले आहे. विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांच्या पार्श्वभूमीवर 'मुंबई, तुझा विद्यापीठावर भरवसा नाही काय!' असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुलगुरूंवर 'सामना'च्या अग्रलेखातून ताशेरे ओढले आहेत. मुंबई विद्यापीठाचा मृत्यू झाला आहे आणि विद्यापीठ परीक्षा व निकालांचे श्राद्ध घालत असल्याचं ठाकरे यांनी अग्रलेखात जाहीर करून टाकलं आहे.

केंद्र आणि राज्यातल्या भाजप सरकारमुळे सर्वच घटनात्मक पदांवर संघविचारांच्या लोकांची वर्णी लागत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. संघविचार हा गुन्हा नाही, त्याने कुणाचे नुकसानही होणार नाही, मात्र पिढी घडवणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर तरी किमान गुणवत्तेच्या आधारे नेमणुका करा, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. विद्यापीठात सुरू असलेल्या अराजकाला जबाबदार धरत कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे.

अग्रलेखातले अन्य महत्त्वाचे मु्द्दे :-

> सर्व महाविद्यालये आठ दिवस बंद ठेवून समस्त शिक्षकवर्ग पेपर तपासणीसाठी जुंपूनही निकाल लागत नसतील तर या अनागोंदीची जबाबदारी
शिक्षण मंत्री तसेच विद्यापीठाच्या कुलगुरूंवर तर जातेच, पण इतका बेफिकीर, अकार्यक्षम कुलगुरू नेमणाऱ्या सरकारवरदेखील जाते. नव्या राजवटीत कुलगुरू निवडीचा घोटाळा झाला आहे व तो गंभीर आहे.

> डॉ. संजय देशमुख हे संघाच्या रामभाऊ म्हाळगी संस्थेशी संबंधित होते. या एकाच कारणासाठी अनेक सुयोग्य व कर्तबगार उमेदवारांना डावलून त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक झाली असेल तर ही बाब धक्कादायक आहे.

> विद्यापीठाच्या मॅनेजिंग कमिटीने ऑनलाइन पेपर तपासणीस विरोध करूनही कुलगुरूंनी त्यासाठी हट्ट धरला व निकालांचे श्राद्ध घातले.

> सध्या भाजपात व संघ परिवारात प्रत्येक जण मोदींची कार्यपद्धती पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत असेल तर एकही शैक्षणिक संस्था, विद्यापीठ स्वतंत्र व नीटपणे चालणार नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज