मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
अनेक आरोपांमुळे मंत्रीपद गमवावे लागलेले भाजप नेते एकनाथ खडसे यांनी एकीकडे स्वपक्षातील गद्दारांवर तोफ डागली असताना त्याचीच ढाल करत शिवसेनेने आज भाजपमधील कुरघोडीच्या राजकारणावर तोंडसुख घेतलं आहे. खडसेंवर लागलेला ‘दाऊद’ संबंधाचा आरोप मान्य होण्यासारखा नाही, असा निर्वाळा देताना 'शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर खडसेंच्या पाठीत हे असे वार कदाचित झाले नसते', असा 'खडा'ही शिवसेनेने टाकला आहे.
एकनाथ खडसे यांनी जळगावात कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. ‘माझ्यावरील आरोप हे ठरवून केलेले कृत्य आहे. एकामागोमाग एक सुपारी घेतल्यासारखे लोक ओरडायला लागलेत. यातील सत्य कधी ना कधी बाहेर येणारच. यात अनेक गुपिते आहेत. मी जर तोंड उघडले असते, तर अख्खा देश हादरला असता’, अशी जोरदार फटकेबाजी त्यांनी केली. त्यानंतर एकीकडे विरोधी पक्षांनी खडसेजी, गुपितं उघडी कराच, असे आवाहन केले असताना शिवसेनेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आज 'सामना'त खडसेंना 'बळ' देणारा अग्रलेख लिहून भाजपवर निशाणा साधला आहे. नाथाभाऊंचेही ‘मनोगत’ अशा शिर्षकाखाली लिहिलेल्या अग्रलेखात 'आपला कोण व परका कोण याची जाणीव खडसेंना आता झाली असेल', अशी कोपरखळीही मारण्यात आली आहे.
खडसेंना टोमणे आणि सल्ले...
> खडसे यांनी शिवसेनेशी युती तोडण्यात पुढचे पाऊल टाकले. कारण त्यावेळी देशात मोदी यांची लाट होती व त्या लाटेत ओंडके व काटक्याही तरंगल्या. आम्हाला त्याची खंत नाही. पण युती तोडली नसती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, असे खडसे म्हणतात. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर खडसेंच्या पाठीत हे असे वार कदाचित झाले नसते. कारण पाठीत वार करण्याची अवलाद शिवसेनेची नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर आभाळ कोसळले असते काय? याचे चिंतन करण्यास खडसे आता मोकळे आहेत.
> खडसे यांच्यावर लागलेला ‘दाऊद’ संबंधाचा आरोप मान्य होण्यासारखा नाही. दाऊदशी संबंध जोडून खडसे यांच्या देशभक्तीवरच कलंक लावण्याचा प्रकार हा त्यांच्यावर अन्याय ठरतो व याबाबतीत त्यांचे ऐकून घेतले नाही हा त्याहून मोठा अन्याय ठरू शकतो. खडसे यांच्याशी राजकीय लढायला आम्ही समर्थ आहोत. पण एखाद्या विषयात नाहक बदनामी घडवून राजकीय पोळ्या भाजणारे आम्ही नव्हेत. हे सत्य सांगण्याची हिंमत आमच्यात आहे व त्याबद्दल खडसे यांच्या पक्षातील कुणाचा आक्षेप असेल तर त्यांना बोंबलण्याचा आणि ‘सामना’ जाळण्याच्या धमक्या देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
> जळगावातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खडसे यांनी मन मोकळे केले असले तरी बर्याच गोष्टी मनात गाठ मारून बांधून ठेवल्या आहेत. ही गाठ योग्य वेळी सोडीन व योग्य वेळी गुपिते उघडी करीन तेव्हा देश हादरल्याशिवाय राहणार नाही, असेही खडसे यांनी सांगून टाकले. खडसे यांनी जे सूचक इशारे दिले आहेत ते पाहता भविष्यात एखादे छोटे महाभारत घडले तरी आश्चर्य वाटायला नको.
> खडसे यांचे मंत्रीपद जाताच जळगावातील शिवसैनिकांनी फटाके फोडले हे खडसे यांचे दु:ख नसून खरंतर स्वपक्षातच ‘दिवाळी’ साजरी झाली या वेदनेचा स्फोट त्यांच्या मुखातून झाला आहे.
> अंजली दमानिया, प्रीती मेनन यांना पुढे करून आपल्यावर वार केले, एका पाठोपाठ आरोप केले. यामागे कोण आहे याचा भंडाफोड करणारी दारूही खडसे यांनी उडवली आहे. थोडक्यात, खडसे यांचे म्हणणे आहे की, त्यांना ठरवून सुळावर चढवण्यात आले व त्यामागे स्वपक्षाचेच लोक आहेत. खरे-खोटे त्यांनाच माहीत. पण खडसे यांना आता आपला कोण व परका कोण याची जाणीव झाली असेल.
अनेक आरोपांमुळे मंत्रीपद गमवावे लागलेले भाजप नेते एकनाथ खडसे यांनी एकीकडे स्वपक्षातील गद्दारांवर तोफ डागली असताना त्याचीच ढाल करत शिवसेनेने आज भाजपमधील कुरघोडीच्या राजकारणावर तोंडसुख घेतलं आहे. खडसेंवर लागलेला ‘दाऊद’ संबंधाचा आरोप मान्य होण्यासारखा नाही, असा निर्वाळा देताना 'शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर खडसेंच्या पाठीत हे असे वार कदाचित झाले नसते', असा 'खडा'ही शिवसेनेने टाकला आहे.
एकनाथ खडसे यांनी जळगावात कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. ‘माझ्यावरील आरोप हे ठरवून केलेले कृत्य आहे. एकामागोमाग एक सुपारी घेतल्यासारखे लोक ओरडायला लागलेत. यातील सत्य कधी ना कधी बाहेर येणारच. यात अनेक गुपिते आहेत. मी जर तोंड उघडले असते, तर अख्खा देश हादरला असता’, अशी जोरदार फटकेबाजी त्यांनी केली. त्यानंतर एकीकडे विरोधी पक्षांनी खडसेजी, गुपितं उघडी कराच, असे आवाहन केले असताना शिवसेनेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आज 'सामना'त खडसेंना 'बळ' देणारा अग्रलेख लिहून भाजपवर निशाणा साधला आहे. नाथाभाऊंचेही ‘मनोगत’ अशा शिर्षकाखाली लिहिलेल्या अग्रलेखात 'आपला कोण व परका कोण याची जाणीव खडसेंना आता झाली असेल', अशी कोपरखळीही मारण्यात आली आहे.
खडसेंना टोमणे आणि सल्ले...
> खडसे यांनी शिवसेनेशी युती तोडण्यात पुढचे पाऊल टाकले. कारण त्यावेळी देशात मोदी यांची लाट होती व त्या लाटेत ओंडके व काटक्याही तरंगल्या. आम्हाला त्याची खंत नाही. पण युती तोडली नसती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, असे खडसे म्हणतात. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर खडसेंच्या पाठीत हे असे वार कदाचित झाले नसते. कारण पाठीत वार करण्याची अवलाद शिवसेनेची नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर आभाळ कोसळले असते काय? याचे चिंतन करण्यास खडसे आता मोकळे आहेत.
> खडसे यांच्यावर लागलेला ‘दाऊद’ संबंधाचा आरोप मान्य होण्यासारखा नाही. दाऊदशी संबंध जोडून खडसे यांच्या देशभक्तीवरच कलंक लावण्याचा प्रकार हा त्यांच्यावर अन्याय ठरतो व याबाबतीत त्यांचे ऐकून घेतले नाही हा त्याहून मोठा अन्याय ठरू शकतो. खडसे यांच्याशी राजकीय लढायला आम्ही समर्थ आहोत. पण एखाद्या विषयात नाहक बदनामी घडवून राजकीय पोळ्या भाजणारे आम्ही नव्हेत. हे सत्य सांगण्याची हिंमत आमच्यात आहे व त्याबद्दल खडसे यांच्या पक्षातील कुणाचा आक्षेप असेल तर त्यांना बोंबलण्याचा आणि ‘सामना’ जाळण्याच्या धमक्या देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
> जळगावातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खडसे यांनी मन मोकळे केले असले तरी बर्याच गोष्टी मनात गाठ मारून बांधून ठेवल्या आहेत. ही गाठ योग्य वेळी सोडीन व योग्य वेळी गुपिते उघडी करीन तेव्हा देश हादरल्याशिवाय राहणार नाही, असेही खडसे यांनी सांगून टाकले. खडसे यांनी जे सूचक इशारे दिले आहेत ते पाहता भविष्यात एखादे छोटे महाभारत घडले तरी आश्चर्य वाटायला नको.
> खडसे यांचे मंत्रीपद जाताच जळगावातील शिवसैनिकांनी फटाके फोडले हे खडसे यांचे दु:ख नसून खरंतर स्वपक्षातच ‘दिवाळी’ साजरी झाली या वेदनेचा स्फोट त्यांच्या मुखातून झाला आहे.
> अंजली दमानिया, प्रीती मेनन यांना पुढे करून आपल्यावर वार केले, एका पाठोपाठ आरोप केले. यामागे कोण आहे याचा भंडाफोड करणारी दारूही खडसे यांनी उडवली आहे. थोडक्यात, खडसे यांचे म्हणणे आहे की, त्यांना ठरवून सुळावर चढवण्यात आले व त्यामागे स्वपक्षाचेच लोक आहेत. खरे-खोटे त्यांनाच माहीत. पण खडसे यांना आता आपला कोण व परका कोण याची जाणीव झाली असेल.