अ‍ॅपशहर

तुमच्या पिपाण्या लोकांनी बंद केल्या; संजय राऊतांचा फडणवीस-राज ठाकरेंवर पलटवार

Sanjay Raut Shivsena : राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देत हे सरकार फार काळ टिकणार नसल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jul 2022, 10:42 am
मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या दरदरोज होणाऱ्या पत्रकार परिषदांना महाराष्ट्रातील लोक कंटाळले होते, असं म्हणत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. या टीकेला आता राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'शिवसेनेचा लाऊडस्पीकर मागील ५६ वर्षांपासून सुरू आहे. हा लाऊडस्पीकर म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांच्या पिपाण्या राज्यातील जनतेनं बंद करून टाकल्या आहेत,' अशा शब्दांत राऊत यांनी पलटवार केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanjay raut devendra fadanvis
संजय राऊत - देवेंद्र फडणवीस


राज्यात शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून तयार झालेलं सरकार फार काळ टिकणार नाही, या दाव्याचाही संजय राऊत यांनी पुनरुच्चार केला आहे. 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे वारंवार सांगत आहेत की नवं सरकार फार काळ टिकणार नाही. त्याप्रमाणे निष्ठावान शिवसैनिकांच्या अश्रूंमध्ये हे सरकार वाहून जाईल,' असं राऊत यांनी म्हटलं आहे.

मनसे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती, शॅडो कॅबिनेटवरुनही टोला : दिपाली सय्यद

'जे पोटात मळमळत होतं, ते ओठांवर आलं'

आपण मनावर दगड ठेवून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री केलं, असं विधान नुकतंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पाटील यांच्या या वक्तव्यावरही राऊत यांनी निशाणा साधला. 'भाजपमध्ये विचारस्वातंत्र्य नाही, मात्र तरीही काल चंद्रकांत पाटील हे खरं बोलून गेले आहेत. त्यांच्या पोटात जे मळमळत होतं, तेच ओठांवर आलं. भाजप कार्यकर्त्यांच्या त्याच भावना आहेत,' असं ते म्हणाले.

शिवसेनेला शेवटची संधी? संसदीय पक्षातील फूट उघड न होऊ देण्यासाठी उचलावं लागेल 'हे' पाऊल

दरम्यान, भाजपचे नेते कितीही म्हणत असले की शिवसेना आमच्यासोबत सत्तेत आहेत, मात्र ते खरं नाही. कारण शिवसेना ही सत्तेत नाही तर काल संभाजीनगर, पैठण आणि वैजापुरात आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात जी दिसली तीच खरी शिवसेना आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज