मुंबई: राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरून सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगतील की, हनुमान चालीसा वाचा, मशिदींसमोर जाऊन दुप्पट आवाजात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावा. मी जरा फिरून येतो. मशिदींसमोर हनुमान चालीसा लावल्यानंतर काही भांडण आणि तंटे झाले तर तुम्ही तुमचं बघून घ्या, अशी राज ठाकरे यांची भूमिका असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. त्या सोमवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांचा चिमटे काढले. राज ठाकरे यांच्या मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या आदेशामुळे तरुण मनसैनिक तुरुंगात जाऊन बसतील. तुम्ही तुमचं रेकॉर्ड बिघडवाल. मात्र, राज ठाकरे हे सगळं तुम्हीच भोगा, असे म्हणतील. पण मनसैनिकही हुशार झाले आहेत. हे सगळे खरे नाही. भोंग्यांचा विषय निवडणुकीपुरता आहे, हे त्यांनाही माहिती आहे, असेही पेडणकेर यांनी म्हटले.
यावेळी किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. नागरिकांनी कोणत्याही संभ्रमात राहू नये. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला मुंबईत दंगली नकोत, ही ठाम भूमिका आपण घेतली पाहिजे. एमआयएम पक्षाच्या नेत्यांनीही याबाबत सबुरीची भूमिका घेतली आहे. भोंग्यांवरून वाद निर्माण झाल्यास डोकं थंड ठेऊन काम करा, असे आदेश आम्हीदेखील शिवसैनिकांना दिल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
आम्ही फडणवीसांप्रमाणे स्वत:चा मोठेपणा सांगत नाही: पेडणेकर
देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भाजपच्या बुस्टर सभेत आपण बाबरी पतनाच्यावेळी त्याठिकाणी हजर होते, असा दावा केला होता. मात्र, त्याठिकाणी एकही शिवसैनिक नव्हता, असेही फडणवीस यांनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्याचा किशोरी पेडणेकर यांनी समाचार घेतला. बाबरीचा घुमट पडल्यानंतर सगळ्यांची पळता भुई थोडी झाली होती. कोणीही बाबरी पतनाची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती.
शिवसैनिक बाबरी पाडताना त्याठिकाणी होते की नाही, हे तपासण्यासाठी उत्तर प्रदेशातील सर्व रेकॉर्ड तपासावेत. मी स्वत: २७ महिलांसह अयोध्येला जाण्यासाठी कल्याणमध्ये गाडीत बसले होते. मात्र, महिलांना यायचे नाही, असे सांगत आम्हाला गाडीतून उतरवण्यात आले. त्यामुळे मी बाबरी पतनावेळी अयोध्येला गेले होते, असे खोटे सांगणार नाही. देवेंद्र फडणवीसही बाबरी पतनानंतर तुरुंगात होते, हे मी नाकारत नाही. पण त्यांच्यासोबत शिवसैनिकही तुरुंगात होते, ही बाब त्यांनी स्वीकारली पाहिजे. फडणवीस वरिष्ठ नेते आहेत, त्यांचे राजकीय कार्य चांगले आहे. पण खोटे बोलून ते स्वत:ची प्रतिमा मलीन करत आहेत, असेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.
यावेळी किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. नागरिकांनी कोणत्याही संभ्रमात राहू नये. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला मुंबईत दंगली नकोत, ही ठाम भूमिका आपण घेतली पाहिजे. एमआयएम पक्षाच्या नेत्यांनीही याबाबत सबुरीची भूमिका घेतली आहे. भोंग्यांवरून वाद निर्माण झाल्यास डोकं थंड ठेऊन काम करा, असे आदेश आम्हीदेखील शिवसैनिकांना दिल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
आम्ही फडणवीसांप्रमाणे स्वत:चा मोठेपणा सांगत नाही: पेडणेकर
देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भाजपच्या बुस्टर सभेत आपण बाबरी पतनाच्यावेळी त्याठिकाणी हजर होते, असा दावा केला होता. मात्र, त्याठिकाणी एकही शिवसैनिक नव्हता, असेही फडणवीस यांनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्याचा किशोरी पेडणेकर यांनी समाचार घेतला. बाबरीचा घुमट पडल्यानंतर सगळ्यांची पळता भुई थोडी झाली होती. कोणीही बाबरी पतनाची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती.
शिवसैनिक बाबरी पाडताना त्याठिकाणी होते की नाही, हे तपासण्यासाठी उत्तर प्रदेशातील सर्व रेकॉर्ड तपासावेत. मी स्वत: २७ महिलांसह अयोध्येला जाण्यासाठी कल्याणमध्ये गाडीत बसले होते. मात्र, महिलांना यायचे नाही, असे सांगत आम्हाला गाडीतून उतरवण्यात आले. त्यामुळे मी बाबरी पतनावेळी अयोध्येला गेले होते, असे खोटे सांगणार नाही. देवेंद्र फडणवीसही बाबरी पतनानंतर तुरुंगात होते, हे मी नाकारत नाही. पण त्यांच्यासोबत शिवसैनिकही तुरुंगात होते, ही बाब त्यांनी स्वीकारली पाहिजे. फडणवीस वरिष्ठ नेते आहेत, त्यांचे राजकीय कार्य चांगले आहे. पण खोटे बोलून ते स्वत:ची प्रतिमा मलीन करत आहेत, असेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.