अ‍ॅपशहर

sanjay raut : मंदिरं बंद करण्याचा निर्णय केंद्राचाच; राऊतांनी भाजपला खडसावले

मंदिरं सुरू करण्याच्या मागणीचा जोर वाढू लागल्याने त्यावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय हा केंद्राचाच होता, असं सांगत राऊत यांनी भाजपला (bjp) आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Aug 2020, 4:37 pm
मुंबई: मंदिराचं सुद्धा एक अर्थकारण आहे. त्यावर अनेक कुटुंब अवलंबून आहेत. त्यामुळे मंदिरं बंद राहणं आम्हालाही आवडत नाही, असं सांगतानाच करोनामुळे लॉकडाऊन करण्याचा आणि मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय हा केंद्र सरकारचाच होता, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanjay-raut
मंदिरं बंद करण्याचा निर्णय केंद्राचाच; राऊतांनी भाजपला खडसावले


प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मंदिरं बंद करण्याचा किंवा लॉकडाऊन उघडण्याचा निर्णय हा केंद्राचाच होता. काही राज्यात मंदिरं उघडली त्याचे परिणाम सर्वांनी पाहिलेच आहेत. अयोध्येत राम मंदिराचं पूजन होण्यापूर्वी आणि नंतर अनेकांना करोना झाला. पुजारीही त्यातून सुटले नाहीत. तिरुपती बालाजीचं मंदिर उघडलं तिथेही काय झालं हे तुम्हाला माहीतच आहे, असं सांगतानाच आम्हीही देवभक्त आहोत. देव बंद करणं आम्हालाही आवडत नाही. करोना हा मानवनिर्मित नाही, केंद्रातील मंत्रीच म्हणतात की करोना ही देवाची करणी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

मंदिरं सुरू व्हावीत म्हणून देवासाठी आम्ही झगडतो आहोत. कारण मंदिराचंही एक अर्थकारण आहे. मंदिराच्या अर्थकारणावर अनेक कुटुंब जगत आहेत. मंदिराभोवती अनेक दुकाने सुरू असतात, त्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो. पण मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे. राजकारणाचा नाही, असं सांगतानाच मंदिरं सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेतील, असंही ते म्हणाले.

काँग्रेसमधील वादाचा आघाडीला फटका नाही; विरोधकांनी स्वप्न पाहू नये: राऊत

'देश 'काँग्रेसमुक्त' झाला नाही म्हणून भाजपने रचला 'हा' डाव'

दरम्यान, काँग्रेसमधील पक्षांतर्गत वादावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काँग्रेसमधील वादळ शमलं आहे. २३ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवलं होतं. त्याचा धुरळा बसला आहे, असं सांगतानाच काँग्रेस पक्षांतर्गत वादामुळे जर्जर झाला आहे. पण काँग्रेसच्या या वादाचा महाराष्ट्राला फटका बसणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या वादामुळे काही घडेल याची कुणी स्वप्न पाहू नये, असं राऊत म्हणाले. काँग्रेसने राजकारणातील वैभव परत मिळवलं पाहिजे. काँग्रेस पक्षाला मजबूत नेतृत्वाची गरज आहे. देशालाही मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. काँग्रेस सर्वात जुना पक्ष आहे. काँग्रेसला मोठी परंपरा आहे. देशातील सर्व गावात पोहोचलेला काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसने आपलं वैभव पुन्हा मिळवलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

'माझं ऐकलं नाही, तर पुढची ५० वर्षे काँग्रेस विरोधी पक्षातच राहील'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज