मुंबई : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केली आहे. जगामध्ये दोन संघ आहेत, बौद्ध भिक्खू संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम देशहिताचं आहे, असं सदावर्ते म्हणाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर काम करणं चुकीचं नाही. दोन्ही विचार हे जागतिक असून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला टार्गेट करत असतील तर ते बौद्ध भिक्खू संघाला टार्गेट करतील, असं सदावर्ते म्हणाले होते. सुषमा अंधारे यांनी गुणरत्न सदावर्ते हे अर्धवटराव असल्याची टीका केली आहे.
गुणरत्न सदावर्ते हे कायमच आपल्या अतार्किक आणि असंबंध भाषा शैलीसाठी कुप्रसिद्ध आहेत. अतार्किक बोलून चर्चेची धूम उडवून द्यायची, अशी त्यांची पद्धत असते. ते ज्या पद्धतीची मांडणी दर वेळेला करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्याचेच एक उदाहरण म्हणजे त्यांचे आजचे भिक्खू संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना करणारे विधान होय. मुळात या दोन्हींची तुलना होऊ शकत नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
एकनाथ शिंदेंचे एका दगडात दोन निशाणे, चंद्रकांत पाटलांना बळ देत खडसेंना डिवचलं
भिक्खू संघ अहिंसा मानणारा आहे. कारण भिक्खू संघ चातुर्वण्य व्यवस्थेला विरोध करतो. जाती धर्म याच्या पलीकडे जाऊन मनुवादी व्यवस्थेला विरोध करतो, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
सूर्यकुमार यादवला एकाच दिवसात मिळाल्या तीन गूड न्यूज, असं नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा परदेशी पाहुणे हा देश समजून घेण्यासाठी आले तर या देशातले लोक त्यांना महात्मा गांधीजींचे स्मारक दाखवतात, चैत्यभूमी दाखवतात, दीक्षाभूमी दाखवतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संग्रहालय स्वामी विवेकानंद यांचं समाधीस्थळ, साबरमती आश्रम दाखवतात. पण कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय दाखवत नाहीत. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि बौद्ध भिक्खू संघ हे गुणरत्न सदावर्तेंसारख्या सारख्या अर्धवट रावांना कळण्याची गरज आहे. तुलना करुन सदावर्तेंसारखी माणसं दोन समाजातील लोकांना उकसवण्याचं काम करतात, असा आरोप सुषमा अंधारेंनी केला.
गुणरत्न सदावर्ते यांनी ते वकील की पूर्णवेळ राजकारणी आहात ते ठरवावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते असल्याच्या थाटात वावरणं बंद करा, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
भारताने विजय साकारला खरा पण रोहित शर्मावर आली नामुष्कीची वेळ, पाहा नेमकं काय घडलं...
गुणरत्न सदावर्ते हे कायमच आपल्या अतार्किक आणि असंबंध भाषा शैलीसाठी कुप्रसिद्ध आहेत. अतार्किक बोलून चर्चेची धूम उडवून द्यायची, अशी त्यांची पद्धत असते. ते ज्या पद्धतीची मांडणी दर वेळेला करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्याचेच एक उदाहरण म्हणजे त्यांचे आजचे भिक्खू संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना करणारे विधान होय. मुळात या दोन्हींची तुलना होऊ शकत नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
एकनाथ शिंदेंचे एका दगडात दोन निशाणे, चंद्रकांत पाटलांना बळ देत खडसेंना डिवचलं
भिक्खू संघ अहिंसा मानणारा आहे. कारण भिक्खू संघ चातुर्वण्य व्यवस्थेला विरोध करतो. जाती धर्म याच्या पलीकडे जाऊन मनुवादी व्यवस्थेला विरोध करतो, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
सूर्यकुमार यादवला एकाच दिवसात मिळाल्या तीन गूड न्यूज, असं नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा परदेशी पाहुणे हा देश समजून घेण्यासाठी आले तर या देशातले लोक त्यांना महात्मा गांधीजींचे स्मारक दाखवतात, चैत्यभूमी दाखवतात, दीक्षाभूमी दाखवतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संग्रहालय स्वामी विवेकानंद यांचं समाधीस्थळ, साबरमती आश्रम दाखवतात. पण कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय दाखवत नाहीत. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि बौद्ध भिक्खू संघ हे गुणरत्न सदावर्तेंसारख्या सारख्या अर्धवट रावांना कळण्याची गरज आहे. तुलना करुन सदावर्तेंसारखी माणसं दोन समाजातील लोकांना उकसवण्याचं काम करतात, असा आरोप सुषमा अंधारेंनी केला.
गुणरत्न सदावर्ते यांनी ते वकील की पूर्णवेळ राजकारणी आहात ते ठरवावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते असल्याच्या थाटात वावरणं बंद करा, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
भारताने विजय साकारला खरा पण रोहित शर्मावर आली नामुष्कीची वेळ, पाहा नेमकं काय घडलं...