अ‍ॅपशहर

शिवसेनेचा महागाईविरोधात एल्गार

'चलेजाव चले जाव, भाजप सरकार चले जाव' आणि 'जय राम,श्रीराम, भाजपला राम राम'...महागाई विरोधातील आंदोलनात अशा गगनभेदी घोषणा देतानाच 'एवढी माणसं कशाला? मोदींच्या मयताला', अशी घोषणा देऊन शिवसैनिकांनी घोषणांचं टोकच गाठलं.शिवसेनेने महागाई विरोधात छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून ते बोरिवली पर्यंत १२ मोर्चे काढून केंद्र आणि राज्यसरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत संताप व्यक्त केला. यावेळी शिवसेनेच्या खासदार, आमदारांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.

Maharashtra Times 23 Sep 2017, 12:50 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivsena morcha against inflation
शिवसेनेचा महागाईविरोधात एल्गार


'नरेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय', 'होश में आओ, होश में आओ, भाजप सरकार होश में आआो', 'चलेजाव चले जाव, भाजप सरकार चले जाव' आणि 'जय राम,श्रीराम, भाजपला राम राम'...महागाई विरोधातील आंदोलनात अशा गगनभेदी घोषणा देतानाच 'एवढी माणसं कशाला? मोदींच्या मयताला', अशी घोषणा देऊन शिवसैनिकांनी घोषणांचं टोकच गाठलं.शिवसेनेने महागाई विरोधात छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून ते बोरिवली पर्यंत १२ मोर्चे काढून केंद्र आणि राज्यसरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत संताप व्यक्त केला. यावेळी शिवसेनेच्या खासदार, आमदारांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.

पेट्रोल-डिझेलसह फळभाज्यांचे भावही गगनाला भिडल्याने राज्यसरकारचा निषेध करण्यासाठी आज शिवसेनेने म्हाडा कार्यालय वांद्रे, नॅशनल पार्क ते बोरिवली, जोगेश्वरी रेल्वे स्थानक, कुर्ला नेहरू नगर, घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, कांदिवली पूर्व ते पश्चिम, दादर रेल्वे स्थानक, भांडूप पश्चिम, चेंबूर आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे जोरदार निदर्शने केली. चेंबूर येथे शिवसैनिकांनी भाजपने काँग्रेस सरकारच्या काळात महागाई विरोधात केलेल्या आंदोलनाच्या पोस्टरचे प्रदर्शन भरवून जोरदार निषेध नोंदविला. या मोर्चांमध्ये भाजप सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी देण्यात आली. कहर म्हणजे यावेळी शिवसैनिकांनी 'एवढी माणसं कशाला? मोदींच्या मयताला', अशी धक्कादायक घोषणाही दिली. तर छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे शिवसेना खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आंदोलनात सहभाग घेऊन भाजप सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला. देशात वाढलेल्या महागाईला भाजपच जबाबदार असून भाजपच्या धोरणांमुळेच महागाई वाढल्याचा आरोप देखील देसाई यांनी केला. केंद्र सरकार आणि राज्यसरकारने महागाई नियंत्रणात न आणल्यास शिवसेना देशव्यापी आंदोलन पुकारेल, असा इशाराही देसाई यांनी दिला. आंदोलनावेळी अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

महागाईची तिरडी

शिवसेनेच्या आजच्या आंदोलनात महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला होता. शिवसैनिकांनी भगवे झेंडे नाचवत भाजप सरकारचा निषेध नोंदविला. बोरिवली येथे शिवसेनेने महागाईची अंत्ययात्रा काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी 'जयराम, श्रीराम भाजपला राम राम' आणि 'होश मे आओ होश मे आओ, भाजप सरकार होश मे आओ'च्या घोषणा दिल्या. यावेळी शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे उपस्थित होत्या. तर लोअर परळच्या ना.म. जोशी मार्गावर आंदोलन करताना शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे, आमदार अजय चौधरी, नगरसेवक आशिष चेंबूरकर, किशोरी पेडणेकर, माजी महापौर स्नेहल आंबेकर, अरविंद भोसले आणि माजी आमदार दगडू सकपाळ यांना अटक करण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज