मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्यावरून भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्याकडं बोट दाखवत शिवसेनेनं भाजपवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. 'स्वामी व अरुण जेटली हे दोघेही शिवसेनेचे नाहीत. त्यामुळं ज्या सत्तेत बसता त्या सत्तेविरोधातच का बोलता? हे शहाणपण शिवसेनेला कुणी शिकवू नये,' अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले आहे.
राज्य सरकार व केंद्र सरकारविरोधात सातत्यानं तोफा डागणाऱ्या शिवसेनेनं आधी सत्ता सोडावी, असा सल्ला भाजप नेत्यांकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दिला जात आहे. भाजपच्या या सल्ल्याला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून उत्तर दिलं आहे. त्यासाठी उद्धव यांनी भाजपमध्येच सुरू असलेल्या 'शाब्दिक' चकमकींचा आधार घेतला आहे. सरकारविरोधात भूमिका घेत टीका करणे शिवसेनेला शोभते काय? असे प्रश्न विचारणाऱ्यांच्या विनोदबुद्धीस टाळी देण्याचा मोह आवरत नाही, अशी कोपरखळीही उद्धव यांनी मारली आहे.
उद्धव ठाकरे म्हणतात...
> आपण सत्तेत आहात याचे भान ठेवा असे सल्ले आम्हाला दिले जातात; पण सध्या रघुराम राजन, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम व सुब्रमण्यम स्वामी यांच्यात जो आर्थिक कलगीतुरा रंगला आहे त्याच्याशी शिवसेनेचा काडीमात्र संबंध नाही.
> रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर डॉ. स्वामी यांनी तोंडसुख घेतले व रघुराम यांना काहीच कळत नसल्याने त्यांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी स्वामी यांनी केली. इतकेच नव्हे तर ‘मनी लॉण्डरिंग’ प्रकरणात रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला अटक करून तुरुंगात पाठवा, अशी जोड मागणी करून स्वामी यांनी खळबळ उडवून दिली. रघुराम हे त्यांच्या पदावरून जात आहेत. त्यामुळे त्यांना घालवण्याचे श्रेय डॉ. स्वामी यांनाच जात आहे.
> सुब्रमण्यम यांची आर्थिक धोरणे देशाला मारक आहेत व हे महाशय काँग्रेसधार्जिणे असल्याचा आरोप डॉ. स्वामी यांनी केला आहे. ज्या व्यक्ती सरकारच्या कामावर परिणाम करू शकतात, सरकारची धोरणे अपयशी ठरवू शकतात, त्यांना त्या पदावरून काढले पाहिजे, असे डॉ. स्वामी यांनी अरविंद सुब्रमण्यम यांच्याबाबतीत म्हटले आहे व ते गंभीर आहे; पण स्वामी यांची विधाने अर्थमंत्री जेटली यांनी उडवून लावली आहेत.
> डॉ. स्वामी आणि जेटली हे एकाच पक्षाचे आहेत. त्या दोघांमधील वादामुळे सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
> स्वामी, जेटली, रघुराम आणि अरविंद सुब्रमण्यम यांच्यातील पिपाण्या व रणशिंगे म्हणजे भाजपतील अंतर्गत कलह असावेत.
> अनेक घोटाळ्यांची प्रकरणे स्वामी यांनी लावून धरल्यामुळे सत्य चव्हाट्यावर आले आणि तेव्हा भाजपने त्यांचा चांगलाच वापर केला. त्यामुळे स्वामी आता त्यांच्या पद्धतीने एखादे सत्य सांगत असतील तर ते त्यांचे वैयक्तिक मत ठरवून गुंडाळता येणार नाही.
> देशांतर्गत सुरक्षा, पाकिस्तान, काश्मीरच्या प्रश्नांवर शिवसेना राष्ट्रहितासाठी म्हणून भूमिका घेते तेव्हा नाके मुरडणारे स्वपक्षातील कलगीतुऱ्यांवर 'मौन' धारण करतात. डॉ. स्वामी आणि अरुण जेटली हे शिवसेनेचे नाहीत. त्यामुळे सत्तेविरोधात का बोलता? हे शहाणपण निदान शिवसेनेला कुणी शिकवू नये.
मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्यावरून भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्याकडं बोट दाखवत शिवसेनेनं भाजपवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. 'स्वामी व अरुण जेटली हे दोघेही शिवसेनेचे नाहीत. त्यामुळं ज्या सत्तेत बसता त्या सत्तेविरोधातच का बोलता? हे शहाणपण शिवसेनेला कुणी शिकवू नये,' अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले आहे.
राज्य सरकार व केंद्र सरकारविरोधात सातत्यानं तोफा डागणाऱ्या शिवसेनेनं आधी सत्ता सोडावी, असा सल्ला भाजप नेत्यांकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दिला जात आहे. भाजपच्या या सल्ल्याला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून उत्तर दिलं आहे. त्यासाठी उद्धव यांनी भाजपमध्येच सुरू असलेल्या 'शाब्दिक' चकमकींचा आधार घेतला आहे. सरकारविरोधात भूमिका घेत टीका करणे शिवसेनेला शोभते काय? असे प्रश्न विचारणाऱ्यांच्या विनोदबुद्धीस टाळी देण्याचा मोह आवरत नाही, अशी कोपरखळीही उद्धव यांनी मारली आहे.
उद्धव ठाकरे म्हणतात...
> आपण सत्तेत आहात याचे भान ठेवा असे सल्ले आम्हाला दिले जातात; पण सध्या रघुराम राजन, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम व सुब्रमण्यम स्वामी यांच्यात जो आर्थिक कलगीतुरा रंगला आहे त्याच्याशी शिवसेनेचा काडीमात्र संबंध नाही.
> रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर डॉ. स्वामी यांनी तोंडसुख घेतले व रघुराम यांना काहीच कळत नसल्याने त्यांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी स्वामी यांनी केली. इतकेच नव्हे तर ‘मनी लॉण्डरिंग’ प्रकरणात रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला अटक करून तुरुंगात पाठवा, अशी जोड मागणी करून स्वामी यांनी खळबळ उडवून दिली. रघुराम हे त्यांच्या पदावरून जात आहेत. त्यामुळे त्यांना घालवण्याचे श्रेय डॉ. स्वामी यांनाच जात आहे.
> सुब्रमण्यम यांची आर्थिक धोरणे देशाला मारक आहेत व हे महाशय काँग्रेसधार्जिणे असल्याचा आरोप डॉ. स्वामी यांनी केला आहे. ज्या व्यक्ती सरकारच्या कामावर परिणाम करू शकतात, सरकारची धोरणे अपयशी ठरवू शकतात, त्यांना त्या पदावरून काढले पाहिजे, असे डॉ. स्वामी यांनी अरविंद सुब्रमण्यम यांच्याबाबतीत म्हटले आहे व ते गंभीर आहे; पण स्वामी यांची विधाने अर्थमंत्री जेटली यांनी उडवून लावली आहेत.
> डॉ. स्वामी आणि जेटली हे एकाच पक्षाचे आहेत. त्या दोघांमधील वादामुळे सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
> स्वामी, जेटली, रघुराम आणि अरविंद सुब्रमण्यम यांच्यातील पिपाण्या व रणशिंगे म्हणजे भाजपतील अंतर्गत कलह असावेत.
> अनेक घोटाळ्यांची प्रकरणे स्वामी यांनी लावून धरल्यामुळे सत्य चव्हाट्यावर आले आणि तेव्हा भाजपने त्यांचा चांगलाच वापर केला. त्यामुळे स्वामी आता त्यांच्या पद्धतीने एखादे सत्य सांगत असतील तर ते त्यांचे वैयक्तिक मत ठरवून गुंडाळता येणार नाही.
> देशांतर्गत सुरक्षा, पाकिस्तान, काश्मीरच्या प्रश्नांवर शिवसेना राष्ट्रहितासाठी म्हणून भूमिका घेते तेव्हा नाके मुरडणारे स्वपक्षातील कलगीतुऱ्यांवर 'मौन' धारण करतात. डॉ. स्वामी आणि अरुण जेटली हे शिवसेनेचे नाहीत. त्यामुळे सत्तेविरोधात का बोलता? हे शहाणपण निदान शिवसेनेला कुणी शिकवू नये.