मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
भाजपच्या पाक्षिकाचे अंक जाळणाऱ्या शिवसेनेला प्रत्युत्तर म्हणून 'सामना'चे अंक जाळण्याचा इशारा देणारे भाजप आमदार आशीष शेलार यांच्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 'सामना' जाळण्याची भाषा करणारे मनोरुग्ण आहेत. मनोरुग्ण जास्त पिसाटले की त्यांना मूर्खांच्या इस्पितळात दाखल करणं हेच समाजहिताचं असतं. त्यामुळं अशा मनोरुग्णांसाठी सरकारनं प्रत्येक स्मार्ट सिटीत पाच-दहा वेड्यांची इस्पितळं उभारावीत,' असा टोला उद्धव यांनी हाणला आहे.
राज्य भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या 'मनोगत' या पाक्षिकातून उद्धव ठाकरे यांची 'शोले'तील असरानी म्हणून संभावना केली होती. त्यामुळं संतापलेल्या शिवसैनिकांनी राज्यात ठिकठिकाणी 'मनोगत'चे अंक जाळले. त्यास प्रत्युत्तर देताना काल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी 'जशास तसे'ची भाषा करत 'सामना' जाळण्याचा इशारा दिला होता. शेलार यांचा हा इशारा उद्धव यांच्या जिव्हारी लागला असून त्यांनी 'सामना'च्या आजच्या अग्रलेखातून नामोल्लेख न करता शेलारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्याचवेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुकही केलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणतात...
> सूर्यावर थुंकण्याचे बालीश प्रकार गेल्या पन्नास वर्षांपासून सुरू आहेत. थुंकणार्याच्या थोबाडावर ती थुंकी पडते व सूर्याचे तेज मात्र वाढतच जाते असे महाराष्ट्राचा राजकीय इतिहास सांगतो. शिवसेना सूर्याच्या तेजाप्रमाणे तळपत आहे व ‘सामना’चे तेजही त्याच बरोबरीने वाढत आहे. शिवसेना व ‘सामना’ एकमेकांना पूरक आहेत व त्यांच्याशी बरोबरी कधीच कोणी करू शकले नाही ही अनेकांची पोटदुखी आहेच.
> गेल्या पन्नासेक वर्षांत दिल्लीश्वरांच्या ‘फुस’खोरीने व येथील थैलीवाल्यांच्या मदतीने अनेकांनी शिवसेना संपविण्याचे विडे उचलले, पण ते अफझलखान, शाहिस्तेखानाप्रमाणे आडवेच झाले. हा इतिहास ज्यांना माहीत नाही असे मुंबईतील काही फडतूस लोक शिवसेनेस आव्हान देण्याच्या फुसकुल्या सोडून स्वत:च्याच अंतर्वस्त्रांना आगी लावत आहेत.
> ‘सामना’ जाळू असे मनोगतही यापैकी काही मनोरुग्णांनी व्यक्त केल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अग्निशमन दले सज्ज झाल्याच्या अफवा पसरवल्या आहेत. अफवांचा बाजार भरवून त्यांत स्वप्ने विकणार्यांची ही जमात असली तरी अफवा पसरवणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण यांचे सारे राजकारण अफवा आणि खोटेपणावर टिकून असल्याने ‘बंब’वाल्यांनी निर्धास्त असावे. कारण हे लोक स्वत:ची विडी पेटवायलाही दुसर्यांची पेटलेली विडी घेत असतात किंवा दुसर्यानी पेटवलेल्या आगीवर स्वत:च्या भाकर्या शेकवीत असतात.
> ‘सामना’ हा एक विचार आहे. कागद जळतो, विचार जळत नाही. ‘सामना’ जाळण्याचा विचार करणे म्हणजे ‘हिंदुत्व’ जाळणे. प्रखर राष्ट्रवाद, प्रभू श्रीराम, काशी, मथुरा आणि राष्ट्राची अस्मिता जाळणे, हिंदुस्थानचे स्वातंत्र्य व संविधान जाळणे. पण मनोरुग्णांना हे सर्व सांगायचे कोणी?
> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामात हे अशा प्रकारे अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोदी यांनी राष्ट्रभक्तीचा व राष्ट्रउभारणीचा जो विडा उचलला आहे त्या विड्यात शेंदूर कालवण्याचा हा प्रकार त्यांचेच लोक करीत असतील तर या अस्तनीतल्या दलालांना (निखार्यांचा अपमान नको) मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठेचले पाहिजे.
> मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे. त्यांनी भ्रष्टाचार मोडण्याचे व गुन्हेगारी संपविण्याचे काम हाती घेतले आहे त्यामुळे स्वपक्षातील काही फडतूस लोकांचे धाबे दणाणल्याने मानसिक आजार बळावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीलाही सुरुंग लावण्याचे हे कारस्थान आहे.
> अर्ध्या महाराष्ट्रात आजही दुष्काळ व आत्महत्यांचे लोण आहे. चुली विझल्याच आहेत. त्या चुली पेटविण्याचे सोडून हे फडतूस लोक जाळपोळीची तोंडपाटीलकी करतात. हे मानसिक आजाराचे टोक आहे. ब्लॅकमेलिंग, दलाली, स्वैराचाराचे राजकीय कवच मिळवून ज्यांनी अंबारीत बसल्याचा आव आणला ते प्रत्यक्षात खेचरांवर किंवा गाढवांवरच बसले आहेत, पण मनोरुग्ण असल्यामुळे त्यांच्या हे लक्षात येईल असे वाटत नाही.
> हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाशी काही घेणेदेणे नसणारेच ‘सामना’ जाळण्याच्या हिरव्या पिचकार्या उडवू शकतात. ‘सामना’ जाळणे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेला चूड लावणे होय. ‘सामना’ जाळण्याची भाषा करणे म्हणजे मोदींच्या मूळ विचारसरणीची कत्तल करणे होय. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जाज्वल्य राष्ट्रभक्तीला, हिंदुत्वाला अग्नी देण्याचीच ही भाषा आहे.
> आतापर्यंत पाकडे मुसलमान, दळभद्री मुस्लिम लीग, ओवेसीची ‘एमआयएम’ आणि धर्मांधांची तळी उचलणारे काँग्रेससारखे लोक ‘सामना’ जाळून स्वत:ची सुंता करून घेत होते, पण आता स्वत:स हिंदुत्ववादी म्हणवून घेणारेही याच सुंतावाल्यांच्या दाढीत बोटे फिरवीत असतील तर हा मूर्खांचा बाजार आहे. त्यामुळे प्रत्येक स्मार्ट सिटीत किमान पाच-दहा वेड्यांची इस्पितळे उभारण्याची शिफारस आम्ही सरकारकडे करीत आहोत.
भाजपच्या पाक्षिकाचे अंक जाळणाऱ्या शिवसेनेला प्रत्युत्तर म्हणून 'सामना'चे अंक जाळण्याचा इशारा देणारे भाजप आमदार आशीष शेलार यांच्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 'सामना' जाळण्याची भाषा करणारे मनोरुग्ण आहेत. मनोरुग्ण जास्त पिसाटले की त्यांना मूर्खांच्या इस्पितळात दाखल करणं हेच समाजहिताचं असतं. त्यामुळं अशा मनोरुग्णांसाठी सरकारनं प्रत्येक स्मार्ट सिटीत पाच-दहा वेड्यांची इस्पितळं उभारावीत,' असा टोला उद्धव यांनी हाणला आहे.
राज्य भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या 'मनोगत' या पाक्षिकातून उद्धव ठाकरे यांची 'शोले'तील असरानी म्हणून संभावना केली होती. त्यामुळं संतापलेल्या शिवसैनिकांनी राज्यात ठिकठिकाणी 'मनोगत'चे अंक जाळले. त्यास प्रत्युत्तर देताना काल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी 'जशास तसे'ची भाषा करत 'सामना' जाळण्याचा इशारा दिला होता. शेलार यांचा हा इशारा उद्धव यांच्या जिव्हारी लागला असून त्यांनी 'सामना'च्या आजच्या अग्रलेखातून नामोल्लेख न करता शेलारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्याचवेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुकही केलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणतात...
> सूर्यावर थुंकण्याचे बालीश प्रकार गेल्या पन्नास वर्षांपासून सुरू आहेत. थुंकणार्याच्या थोबाडावर ती थुंकी पडते व सूर्याचे तेज मात्र वाढतच जाते असे महाराष्ट्राचा राजकीय इतिहास सांगतो. शिवसेना सूर्याच्या तेजाप्रमाणे तळपत आहे व ‘सामना’चे तेजही त्याच बरोबरीने वाढत आहे. शिवसेना व ‘सामना’ एकमेकांना पूरक आहेत व त्यांच्याशी बरोबरी कधीच कोणी करू शकले नाही ही अनेकांची पोटदुखी आहेच.
> गेल्या पन्नासेक वर्षांत दिल्लीश्वरांच्या ‘फुस’खोरीने व येथील थैलीवाल्यांच्या मदतीने अनेकांनी शिवसेना संपविण्याचे विडे उचलले, पण ते अफझलखान, शाहिस्तेखानाप्रमाणे आडवेच झाले. हा इतिहास ज्यांना माहीत नाही असे मुंबईतील काही फडतूस लोक शिवसेनेस आव्हान देण्याच्या फुसकुल्या सोडून स्वत:च्याच अंतर्वस्त्रांना आगी लावत आहेत.
> ‘सामना’ जाळू असे मनोगतही यापैकी काही मनोरुग्णांनी व्यक्त केल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अग्निशमन दले सज्ज झाल्याच्या अफवा पसरवल्या आहेत. अफवांचा बाजार भरवून त्यांत स्वप्ने विकणार्यांची ही जमात असली तरी अफवा पसरवणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण यांचे सारे राजकारण अफवा आणि खोटेपणावर टिकून असल्याने ‘बंब’वाल्यांनी निर्धास्त असावे. कारण हे लोक स्वत:ची विडी पेटवायलाही दुसर्यांची पेटलेली विडी घेत असतात किंवा दुसर्यानी पेटवलेल्या आगीवर स्वत:च्या भाकर्या शेकवीत असतात.
> ‘सामना’ हा एक विचार आहे. कागद जळतो, विचार जळत नाही. ‘सामना’ जाळण्याचा विचार करणे म्हणजे ‘हिंदुत्व’ जाळणे. प्रखर राष्ट्रवाद, प्रभू श्रीराम, काशी, मथुरा आणि राष्ट्राची अस्मिता जाळणे, हिंदुस्थानचे स्वातंत्र्य व संविधान जाळणे. पण मनोरुग्णांना हे सर्व सांगायचे कोणी?
> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामात हे अशा प्रकारे अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोदी यांनी राष्ट्रभक्तीचा व राष्ट्रउभारणीचा जो विडा उचलला आहे त्या विड्यात शेंदूर कालवण्याचा हा प्रकार त्यांचेच लोक करीत असतील तर या अस्तनीतल्या दलालांना (निखार्यांचा अपमान नको) मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठेचले पाहिजे.
> मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे. त्यांनी भ्रष्टाचार मोडण्याचे व गुन्हेगारी संपविण्याचे काम हाती घेतले आहे त्यामुळे स्वपक्षातील काही फडतूस लोकांचे धाबे दणाणल्याने मानसिक आजार बळावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीलाही सुरुंग लावण्याचे हे कारस्थान आहे.
> अर्ध्या महाराष्ट्रात आजही दुष्काळ व आत्महत्यांचे लोण आहे. चुली विझल्याच आहेत. त्या चुली पेटविण्याचे सोडून हे फडतूस लोक जाळपोळीची तोंडपाटीलकी करतात. हे मानसिक आजाराचे टोक आहे. ब्लॅकमेलिंग, दलाली, स्वैराचाराचे राजकीय कवच मिळवून ज्यांनी अंबारीत बसल्याचा आव आणला ते प्रत्यक्षात खेचरांवर किंवा गाढवांवरच बसले आहेत, पण मनोरुग्ण असल्यामुळे त्यांच्या हे लक्षात येईल असे वाटत नाही.
> हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाशी काही घेणेदेणे नसणारेच ‘सामना’ जाळण्याच्या हिरव्या पिचकार्या उडवू शकतात. ‘सामना’ जाळणे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेला चूड लावणे होय. ‘सामना’ जाळण्याची भाषा करणे म्हणजे मोदींच्या मूळ विचारसरणीची कत्तल करणे होय. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जाज्वल्य राष्ट्रभक्तीला, हिंदुत्वाला अग्नी देण्याचीच ही भाषा आहे.
> आतापर्यंत पाकडे मुसलमान, दळभद्री मुस्लिम लीग, ओवेसीची ‘एमआयएम’ आणि धर्मांधांची तळी उचलणारे काँग्रेससारखे लोक ‘सामना’ जाळून स्वत:ची सुंता करून घेत होते, पण आता स्वत:स हिंदुत्ववादी म्हणवून घेणारेही याच सुंतावाल्यांच्या दाढीत बोटे फिरवीत असतील तर हा मूर्खांचा बाजार आहे. त्यामुळे प्रत्येक स्मार्ट सिटीत किमान पाच-दहा वेड्यांची इस्पितळे उभारण्याची शिफारस आम्ही सरकारकडे करीत आहोत.