अ‍ॅपशहर

आदिवासी बांधवांसाठी सिद्धिविनायक ट्रस्ट सरसावलं

सिद्धिविनायक ट्रस्टने राज्यातील सामाजिक कामांमध्ये कायमच हातभार लावला आहे. आता आदिवासी बांधव आणि त्यांच्या मुलांसाठी सिद्धिविनायक ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. बालमृत्यू रोखण्यासाठीची लस उपलब्ध करुन देण्यासाठी ट्रस्टकडून आर्थिक मदत केली जाणार आहे. यासाठी सरकारची मान्यता मिळाली असून हा निधी लवकरच सरकारला दिला जाईल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jun 2020, 2:22 pm
मुंबई : राज्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी सिद्धिविनायक ट्रस्ट आता हातभार लावणार आहे. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील आदिवासी बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी सिद्धिविनायक ट्रस्ट सरकारच्या प्रयत्नांना साथ देणार आहे. सिद्धिविनायक ट्रस्टकडून पालघर, नंदुरबार, नाशिक,
महाराष्ट्र टाइम्स.कॉम siddhivinayak trust to provide vaccine for tribal childs
आदिवासी बांधवांसाठी सिद्धिविनायक ट्रस्ट सरसावलं

अमरावती, गडचिरोली या ५ जिल्ह्यातील बालमृत्यू ही समस्या लक्षात घेऊन तातडीने आदिवासी भागातील ० ते १ वर्ष या वयोगटातील मुलांचे लसीकरण करून बालमृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाला मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी १० कोटी रुपये निधीचे नियोजन करण्यात आले आहे.

लॉकडाऊनचा भंग; दोन महिन्यात सुमारे साडे सहा कोटींची वसूली

कोरोनाच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना येणाऱ्या पुढील आव्हानांबरोबरच आदिवासी बांधवांबद्दल चिंता व्यक्त केली. शिवाय महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील आदिवासी बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून शासन पाऊले उचलत आहे ही बाब निदर्शनास आणली. याचीच दखल घेत सिद्धिविनायक ट्रस्टकडून हा पुढाकार घेण्यात आला आहे.

करोनाबाधितांचा बेड्स, व्हेटिंलेटर अभावी मृत्यू; भाजपची निदर्शने

पालघर, नंदुरबार, नाशिक, अमरावती, गडचिरोली या ५ जिल्ह्यातील ० ते १ वयोगटातील अंदाजे १.४१ लाख बालकांना पहिल्या टप्प्यात या लसीचे लसीकरण करता येईल. आरोग्य विभागाच्या अभ्यासानुसार 'न्युमोकोकल' ही लस बालक ९ महिने पूर्ण होईपर्यंत ३ टप्प्यात द्यावी लागते. ५ जिल्ह्यासाठी अंदाजे ४.६२ लाख डोसेसची आवश्यकता भासणार आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार न्युमोकोकल ही लस ४ डोसेसच्या व्हायलमधे ऊपलब्ध असून प्रति व्हायलची किंमत अंदाजे ८०० रुपये इतकी आहे.

राज्यात दिवसभरात १३९ करोनाबाधित दगावले; मुंबईत सर्वाधिक ५४ रुग्णांचा मृत्यू

राज्यातील ५ आदिवासी जिल्ह्यांमध्ये लसीकरण सुरू करण्यासाठी अंदाजे १० कोटी इतक्या निधीची आवश्यकता भासणार असल्याचं सिद्धिविनायक ट्रस्टने म्हटलं आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी बालक लसीकरण योजनेसाठी १० कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय न्यास विश्वस्तांनी घेतला. हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडे पाठविण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाने अध्यादेश जारी केला आहे. आयुक्त, आरोग्य सेवा यांच्याकडे हा निधी लवकरच सुपूर्द करण्यात येईल, अशी माहिती सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज