मुंबई: कोविडवरील उपचारात प्रभावी ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकार थेट आंतरराष्ट्रीय बाजारातून रेमडेसिवीर खरेदी करण्याचा विचार करत आहे. याबाबत विदेशी कंपन्यांशी प्राथमिक बोलणी झाली असून सिंगापूर, इजिप्त आणि बांगलादेश येथील कंपन्यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा साठा पुरवण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती पुढे आली आहे. ( Remdesivir Shortage In Maharashtra Latest Update ) वाचा: विराफीनमुळे ऑक्सिजनचा तुटवडा दूर होणार; ७ दिवसांत करोनामुक्ती?
रेमडेसिवीर इंजेक्शनचा सध्या मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. करोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. याचा फायदा उठवत मोठ्या प्रमाणात काळाबाजारही सुरू झाला आहे. चढ्या दराने रेमडेसिवीरची विक्री केली जात आहे. ही बाब लक्षात घेत महाराष्ट्र सरकारने रेमडेसिवीरचा तुटवडा भरून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा काढण्याचे ठरवले आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारातून रेमडेसिवीर खरेदी करण्यासाठी परवानगी मिळावी अशी विनंतीही राज्याने केंद्र सरकारकडे केली आहे.
वाचा: राज्यात ६० हजार रुग्ण ऑक्सिजनवर!; PM मोदींना मुख्यमंत्री म्हणाले...
राज्य सरकार सध्या केंद्राकडून होणाऱ्या रेमडेसिवीर पुरवठ्यावरच विसंबून आहे. राज्यातील करोनाचा उद्रेक पाहता सध्या दररोज ७० हजार व्हायल्सची गरज असून प्रत्यक्षात २६ ते २७ हजार व्हायल्स राज्याला दरदिवशी उपलब्ध होत आहेत. आंतराष्ट्रीय बाजारातून रेमडेसिवीर खरेदी करण्याची परवानगी मिळाल्यास राज्य हा तुटवडा भरून काढू शकणार आहे. सिंगापूर, इजिप्त आणि बांगलादेश येथील कंपन्यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवीर पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार केंद्राची परवानगी मिळाल्यास पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, असे राज्य सरकारमधील सूत्रांनी सांगितले.
वाचा: 'लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय होता आणि...'; PM मोदींपुढे CM ठाकरेंनी मांडले वास्तव
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली मागणी
रेमडेसिवीरच्या तुटवड्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही मुद्दा उपस्थित केला. कोविड बाधित रुग्णाचा रुग्णालयात राहण्याचा कालावधी रेमडेसिवीरमुळे कमी होतो, असे दिसून आले आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर, बेड्स उपलब्धता आणि एकूणच आरोग्य सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी रेमडेसिवीरचा जास्तीत जास्त वापर आवश्यक झाला आहे. महाराष्ट्राला सध्या दररोज ७० हजार व्हायल्सची गरज आहे. मात्र, दररोज २७ हजार व्हायल्स उपलब्ध होत आहेत. म्हणूनच रेमडेसिवीर अधिक प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे नमूद करताना परदेशातून रेमडेसिवीर आयात करण्याची परवानगी राज्याला मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली.
वाचा: 'चंद्रकांत पाटील, तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे?'
रेमडेसिवीर इंजेक्शनचा सध्या मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. करोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. याचा फायदा उठवत मोठ्या प्रमाणात काळाबाजारही सुरू झाला आहे. चढ्या दराने रेमडेसिवीरची विक्री केली जात आहे. ही बाब लक्षात घेत महाराष्ट्र सरकारने रेमडेसिवीरचा तुटवडा भरून काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा काढण्याचे ठरवले आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारातून रेमडेसिवीर खरेदी करण्यासाठी परवानगी मिळावी अशी विनंतीही राज्याने केंद्र सरकारकडे केली आहे.
वाचा: राज्यात ६० हजार रुग्ण ऑक्सिजनवर!; PM मोदींना मुख्यमंत्री म्हणाले...
राज्य सरकार सध्या केंद्राकडून होणाऱ्या रेमडेसिवीर पुरवठ्यावरच विसंबून आहे. राज्यातील करोनाचा उद्रेक पाहता सध्या दररोज ७० हजार व्हायल्सची गरज असून प्रत्यक्षात २६ ते २७ हजार व्हायल्स राज्याला दरदिवशी उपलब्ध होत आहेत. आंतराष्ट्रीय बाजारातून रेमडेसिवीर खरेदी करण्याची परवानगी मिळाल्यास राज्य हा तुटवडा भरून काढू शकणार आहे. सिंगापूर, इजिप्त आणि बांगलादेश येथील कंपन्यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवीर पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार केंद्राची परवानगी मिळाल्यास पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, असे राज्य सरकारमधील सूत्रांनी सांगितले.
वाचा: 'लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय होता आणि...'; PM मोदींपुढे CM ठाकरेंनी मांडले वास्तव
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली मागणी
रेमडेसिवीरच्या तुटवड्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही मुद्दा उपस्थित केला. कोविड बाधित रुग्णाचा रुग्णालयात राहण्याचा कालावधी रेमडेसिवीरमुळे कमी होतो, असे दिसून आले आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर, बेड्स उपलब्धता आणि एकूणच आरोग्य सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी रेमडेसिवीरचा जास्तीत जास्त वापर आवश्यक झाला आहे. महाराष्ट्राला सध्या दररोज ७० हजार व्हायल्सची गरज आहे. मात्र, दररोज २७ हजार व्हायल्स उपलब्ध होत आहेत. म्हणूनच रेमडेसिवीर अधिक प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे नमूद करताना परदेशातून रेमडेसिवीर आयात करण्याची परवानगी राज्याला मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली.
वाचा: 'चंद्रकांत पाटील, तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे?'