अ‍ॅपशहर

कसं असेल उद्याचं कंकणाकृती सूर्यग्रहण?, पाहा!

यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण गुरुवार, २६ डिसेंबरला होणार असून, याची कंकणाकृती स्थिती कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील काही भागांतून दिसणार आहे. या आधी नऊ वर्षांपूर्वी १५ जानेवारी २०१० रोजी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती भारतातून दिसली होती.

Maharashtra Times 26 Dec 2019, 5:40 am

प्रवाशांनो, आज मध्य रेल्वेची वाहूतक ४ तास बंद राहणार!

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण गुरुवार, २६ डिसेंबरला होणार असून, याची कंकणाकृती स्थिती कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील काही भागांतून दिसणार आहे. या आधी नऊ वर्षांपूर्वी १५ जानेवारी २०१० रोजी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती भारतातून दिसली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Solar-eclipse


खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही. त्यामुळे जरी चंद्रबिंब सूर्यबिंबाच्या आड आले तरी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसतच राहते. याला 'फायर रिंग' असेही म्हणतात. अशावेळी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते, अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. यावेळी २६ डिसेंबरला अशी कंकणाकृती अवस्था दक्षिण भारतातील कोइम्बतूर, धरपूरम, दिंडीगुल, एरोडे, कान्हनगड , कन्नूर, करूर, कोझीकोडे, मदेकेरी, मंगळुर, मंजेरी, उटी, फाल्लकड, पायन्नूर, पोलची, पुडुकोटल, तिरूचीपल्ली, तिरूर इत्यादी ठिकाणांहून सकाळी सुमारे दोन ते तीन मिनिटे दिसणार आहे. त्यामुळे देश व परदेशातील अनेक खगोलप्रेमी या ठिकाणी दाखल होत आहेत. खग्रास सूर्यग्रहणात छायाप्रकाश लहरी, डायमंड रिंग, करोना, दिवसा काळोख झाल्यामुळे होणारे ग्रह-तारका दर्शन जसे होते तसे अविष्कार कंकणाकृती सूर्य ग्रहणात दिसत नाहीत. 'फायर रिंग'चे अद्भूत दर्शन मात्र होते, असेही सोमण यांनी सांगितले.


महाराष्ट्रातून सुमारे ८० ते ८४ टक्के सूर्यबिंब चंद्रबिंबामुळे झाकले गेलेले दिसणार आहे. मुंबईतून सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ झालेला दिसेल. ग्रहणमध्य सकाळी ९ वाजून २२ मिनिटांनी होईल. त्यावेळी जास्तीत जास्त सूर्यबिंब चंद्रबिंबामुळे झाकलेले दिसेल. सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. चंद्रग्रहण जिथून दिसते त्यावेळी सर्व ठिकाणांहून एकाचवेळी ते दिसत असते. सूर्यग्रहणाचे तसे नसते. ते दिसण्याच्या वेळा स्थानपरत्वे थोड्याप्रमाणात बदलत असतात. सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहू नये.

राष्ट्रपती, PM मोदींची वाजपेयींना आदरांजली

यानंतर पुढच्या वर्षी २१ जून २०२० रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती पंजाब, राजस्थान, हरियाणा व उत्तराखंड या राज्यातील प्रदेशातून दिसणार आहे. उर्वरित भारतातून त्यावेळीही खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे.

व्हॉटसअॅपवरील ओळख पडली शिक्षिकेला महाग

ग्रहणातील गैरसमज

ग्रहण पाहू नये, ग्रहणात जेवू नये, ग्रहणकालात झोपू नये, असे अनेक गैरसमज आपल्याकडे आहेत. त्यात काहीही तथ्य नसल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले. ग्रहणे हा नैसर्गिक अविष्कार आहे. सावल्यांचा खेळ आहे. ग्रहणे निरीक्षण करून त्यामागचे विज्ञान समजून घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज