११५ जागांवर उमेदवार उतरवणार रिंगणात
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीत कुणाशीही युती न करता ती स्वबळावर लढवणार असल्याचे समाजवादी पक्षाने मंगळवारी जाहीर केले. शहरातील २२७ पैकी ११५ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती पक्षाचे मुंबई अध्यक्ष अबू आझमी यांनी दिली.
२०१२च्या पालिका निवडणुकीत काँग्रेसने समाजवादी पक्षाशी युती करण्याचे निश्चित केले होते. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये म्हणून आम्ही युतीस तयार होतो. मात्र अखेरच्या क्षणी काँग्रेसने विश्वासघात केला. यंदाही युतीसाठी आमच्या पक्षाने प्रयत्न केले. मात्र संजय निरूपम यांनी दूधात मिठाचा खडा टाकला, असा आरोप आझमी यांनी केला. त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रीय नेत्यांना मातोश्रीत बोलवून आदेश देत, तर उद्धव भाजपपुढे गुढगे टेकतात, असे आझमी म्हणाले.
झोपड्या २० फुटी हव्यात
वांद्रे येथील बेहरामपाड्यात सुरू असलेल्या पालिकेच्या कारवाईवर आझमी यांनी नाराजी व्यक्त केली. झोपड्यांची उंची २० फुटांपर्यंत अधिकृत करण्याची मागणी त्यांनी केली. मुंबईत ५१ हजार अवैध इमारती असून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. मात्र बेहरामपाड्यातील सामान्य नागरिकांच्या झोपड्यांवर हातोडा चालवला जातो, हे अन्यायकारक आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना अवैध बांधकामप्रकरणी सहाय्यक आयुक्तांना जबाबदार धरण्याचा निर्णय झाला होता. त्याचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला.
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीत कुणाशीही युती न करता ती स्वबळावर लढवणार असल्याचे समाजवादी पक्षाने मंगळवारी जाहीर केले. शहरातील २२७ पैकी ११५ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती पक्षाचे मुंबई अध्यक्ष अबू आझमी यांनी दिली.
२०१२च्या पालिका निवडणुकीत काँग्रेसने समाजवादी पक्षाशी युती करण्याचे निश्चित केले होते. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये म्हणून आम्ही युतीस तयार होतो. मात्र अखेरच्या क्षणी काँग्रेसने विश्वासघात केला. यंदाही युतीसाठी आमच्या पक्षाने प्रयत्न केले. मात्र संजय निरूपम यांनी दूधात मिठाचा खडा टाकला, असा आरोप आझमी यांनी केला. त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रीय नेत्यांना मातोश्रीत बोलवून आदेश देत, तर उद्धव भाजपपुढे गुढगे टेकतात, असे आझमी म्हणाले.
झोपड्या २० फुटी हव्यात
वांद्रे येथील बेहरामपाड्यात सुरू असलेल्या पालिकेच्या कारवाईवर आझमी यांनी नाराजी व्यक्त केली. झोपड्यांची उंची २० फुटांपर्यंत अधिकृत करण्याची मागणी त्यांनी केली. मुंबईत ५१ हजार अवैध इमारती असून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. मात्र बेहरामपाड्यातील सामान्य नागरिकांच्या झोपड्यांवर हातोडा चालवला जातो, हे अन्यायकारक आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना अवैध बांधकामप्रकरणी सहाय्यक आयुक्तांना जबाबदार धरण्याचा निर्णय झाला होता. त्याचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला.