मुंबई: भ्रष्टाचार प्रकरणात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे , स्वीय सहायक कुंदन शिंदे आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे ( Sachin Vaze ) यांनाही १३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. ( Anil Deshmukh Extortion Case ) वाचा : तेच मैदान, तीच गर्दी! राज ठाकरेंनंतर आता उद्धव ठाकरेही घेणार औरंगाबादमध्ये सभा
खंडणी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख हे अटकेत असून सध्या त्यांचा ताबा सीबीआयकडे देण्यात आलेला आहे. सीबीआय कोठडीत त्यांची चौकशी करण्यात आल्यानंतर आता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. आज कोठडीची मुदत संपल्यानंतर विशेष कोर्टात त्यांना हजर केले असता त्यांच्या न्यायायलीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. याच प्रकरणात संजीव पलांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझे हे अटकेत असून त्यांनाही १३ मेपर्यंत कोठडीत राहावे लागणार आहे.
वाचा : राज ठाकरेंचे योगींसंदर्भात मतपरिवर्तन कसं झालं, हा पीएचडीचा विषय: संजय राऊत
दरम्यान, अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदावर असताना पदाचा गैरवापर केला व सचिन वाझे याला दरमहा १०० कोटी रुपये इतक्या खंडणी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाने सीबीआय आणि ईडी या दोन केंद्रीय तपास यंत्रणा या प्रकरणी तपास करत आहेत. दुसरीकडे देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीसाठी राज्य सरकारनेही एकसदस्यीय चांदीवाल आयोग नेमला होता. या आयोगाने तीन दिवसांपूर्वी मंगळवारीच आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. या अहवालात अनिल देशमुख यांना क्लीनचिट देण्यात आलेली आहे.
वाचा : 'गोडसे स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी', भडकले प्रकाश राज
खंडणी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख हे अटकेत असून सध्या त्यांचा ताबा सीबीआयकडे देण्यात आलेला आहे. सीबीआय कोठडीत त्यांची चौकशी करण्यात आल्यानंतर आता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. आज कोठडीची मुदत संपल्यानंतर विशेष कोर्टात त्यांना हजर केले असता त्यांच्या न्यायायलीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. याच प्रकरणात संजीव पलांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझे हे अटकेत असून त्यांनाही १३ मेपर्यंत कोठडीत राहावे लागणार आहे.
वाचा : राज ठाकरेंचे योगींसंदर्भात मतपरिवर्तन कसं झालं, हा पीएचडीचा विषय: संजय राऊत
दरम्यान, अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदावर असताना पदाचा गैरवापर केला व सचिन वाझे याला दरमहा १०० कोटी रुपये इतक्या खंडणी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाने सीबीआय आणि ईडी या दोन केंद्रीय तपास यंत्रणा या प्रकरणी तपास करत आहेत. दुसरीकडे देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीसाठी राज्य सरकारनेही एकसदस्यीय चांदीवाल आयोग नेमला होता. या आयोगाने तीन दिवसांपूर्वी मंगळवारीच आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. या अहवालात अनिल देशमुख यांना क्लीनचिट देण्यात आलेली आहे.
वाचा : 'गोडसे स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी', भडकले प्रकाश राज