म. टा. प्रतिनिधी, मुंबई
वरळी येथील ना. म. जोशी, नायगाव बीडीडी चाळीचा पुनर्विकास जलदगतीने करण्यात यावा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. बीडीडी पुनर्विकास जलदगतीने व्हावा आणि पुनर्विकासातील अडथळे दूर व्हावेत यासाठी आज बीडीडी पुनर्विकास समिती आणि रहिवाश्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ठाकरे यांची सह्याद्री निवस्थानी रविवारी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी, 'ना. म. जोशी मार्ग येथील संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित झालेल्या रहिवाशांची सोडत १५ मार्च रोजी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत काढण्यात येईल, तसेच स्थलांतरित झालेल्या सर्व रहिवाशांना कायमस्वरूपी करारनामा देण्यात येईल,' असेही सांगितले.