महापालिका निवडणुकांसाठी आज 'शंखनाद'
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई, ठाण्यासह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद होणार असून त्यात महापालिकांसह राज्यांतील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची चिन्हं आहेत.
Maharashtra Times 11 Jan 2017, 11:31 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई, ठाण्यासह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद होणार असून त्यात महापालिकांसह राज्यांतील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची चिन्हं आहेत.
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला भरभरून मतं देणाऱ्या शहरी मतदारांच्या मनात काय आहे, हे या निवडणुकीतून स्पष्ट येणार आहे. गेली अडीच वर्षे राज्याचं सत्ताशकट हाकणाऱ्या फडणवीस सरकारची कसोटी पाहणारी ही निवडणूक असून मित्रपक्ष शिवसेनेलाही आपलं प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी झगडावे लागणार आहे.
राज्यात आणि केंद्रात एकत्र सत्तेत असूनही भाजप-शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांवर राजकीय कुरघोड्या करत आहेत. शिवसेनेची आर्थिक व राजकीय ताकद असलेली मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपनं जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर, मुंबई टिकवून विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे फेडण्यासाठी शिवसेनेनंही कंबर कसली आहे. युती झाली तरी मोठा भाऊ होण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चुरस असणार आहे. राज्यातील राजकीय समीकरणं बदलणारी ही निवडणूक असल्यामुळं ती नेमकी कधी होणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एच. सहारिया आज याबाबतच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम देण्याची शक्यता आहे.
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई, ठाण्यासह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद होणार असून त्यात महापालिकांसह राज्यांतील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची चिन्हं आहेत.
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला भरभरून मतं देणाऱ्या शहरी मतदारांच्या मनात काय आहे, हे या निवडणुकीतून स्पष्ट येणार आहे. गेली अडीच वर्षे राज्याचं सत्ताशकट हाकणाऱ्या फडणवीस सरकारची कसोटी पाहणारी ही निवडणूक असून मित्रपक्ष शिवसेनेलाही आपलं प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी झगडावे लागणार आहे.
राज्यात आणि केंद्रात एकत्र सत्तेत असूनही भाजप-शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांवर राजकीय कुरघोड्या करत आहेत. शिवसेनेची आर्थिक व राजकीय ताकद असलेली मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपनं जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर, मुंबई टिकवून विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे फेडण्यासाठी शिवसेनेनंही कंबर कसली आहे. युती झाली तरी मोठा भाऊ होण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चुरस असणार आहे. राज्यातील राजकीय समीकरणं बदलणारी ही निवडणूक असल्यामुळं ती नेमकी कधी होणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एच. सहारिया आज याबाबतच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम देण्याची शक्यता आहे.