म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यात मुंबई-ठाणेसह नाशिक, पुणे, पालघर येथे पावसाने आतापर्यंतची सरासरी मोठ्या फरकाने ओलांडली आहे. त्याचबरोबर सध्या मान्सूनला अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने ठिकठिकाणी पावसाचा उपस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्याची पावसाची एकूण सरासरी अतिरिक्त झाली असून, आतापर्यंत २४ टक्के पाऊस जास्त झाला आहे. राज्याची आतापर्यंतची एकूण सरासरी ५८०.७ मिलीमीटर अपेक्षित आहे. मात्र, राज्यात आतापर्यंत सरासरी ७१८.२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
राज्यात कोकण विभागात मुंबई उपनगराव्यतिरिक्त, पालघर, ठाणे येथे सरासरीहून तीव्र अतिरिक्त पाऊस पडला आहे. तर मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी येथे अतिरिक्त पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातही पावसाची स्थिती समाधानकारक असून, नाशिक आणि पुणे येथे तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. तर अहमदनगर, धुळे, कोल्हापूर, नंदुरबार, सांगली आणि सातारा येथे आतापर्यंत अतिरिक्त पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रात अजून सोलापूरमध्ये मात्र पावसाची तूट आहे. सोलापुरात ३८ टक्के पाऊस कमी आहे.
मराठवाड्यातही पावसाची स्थिती सुधारली आहे. औरंगाबाद, हिंगोली, जालना, नांदेड येथे पावसाने आतापर्यंतची सरासरीची श्रेणी गाठली आहे. विदर्भातही अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरीची श्रेणी गाठली आहे. मराठवाड्यात अजून एकंदर १८ टक्के पावसाची तूट आहे, तर विदर्भात ही तूट तीन टक्के आहे. सोलापूरसह उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, वाशिम, यवतमाळ आणि गोंदिया या आठ जिल्ह्यांमध्ये आता पावसाची तूट आहे. यात सर्वाधिक तूट बीडमध्ये आहे. त्याखालोखाल सोलापूरकर पावसाच्या तुटीमुळे त्रासले आहेत.
राज्यात रविवारी सकाळी ८.३० पासून सायं. ५.३० पर्यंत
महाबळेश्वर - सर्वाधिक १३५ मिलीमीटर पाऊस
नाशिक - ९७.६ मिलीमीटर पाऊस
माथेरान - ११३ मिलीमीटर पाऊस
सोलापूर - दिवसभरात केवळ २.९ मिलीमीटर पाऊस
राज्यात मुंबई-ठाणेसह नाशिक, पुणे, पालघर येथे पावसाने आतापर्यंतची सरासरी मोठ्या फरकाने ओलांडली आहे. त्याचबरोबर सध्या मान्सूनला अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने ठिकठिकाणी पावसाचा उपस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्याची पावसाची एकूण सरासरी अतिरिक्त झाली असून, आतापर्यंत २४ टक्के पाऊस जास्त झाला आहे. राज्याची आतापर्यंतची एकूण सरासरी ५८०.७ मिलीमीटर अपेक्षित आहे. मात्र, राज्यात आतापर्यंत सरासरी ७१८.२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
राज्यात कोकण विभागात मुंबई उपनगराव्यतिरिक्त, पालघर, ठाणे येथे सरासरीहून तीव्र अतिरिक्त पाऊस पडला आहे. तर मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी येथे अतिरिक्त पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातही पावसाची स्थिती समाधानकारक असून, नाशिक आणि पुणे येथे तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. तर अहमदनगर, धुळे, कोल्हापूर, नंदुरबार, सांगली आणि सातारा येथे आतापर्यंत अतिरिक्त पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रात अजून सोलापूरमध्ये मात्र पावसाची तूट आहे. सोलापुरात ३८ टक्के पाऊस कमी आहे.
मराठवाड्यातही पावसाची स्थिती सुधारली आहे. औरंगाबाद, हिंगोली, जालना, नांदेड येथे पावसाने आतापर्यंतची सरासरीची श्रेणी गाठली आहे. विदर्भातही अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरीची श्रेणी गाठली आहे. मराठवाड्यात अजून एकंदर १८ टक्के पावसाची तूट आहे, तर विदर्भात ही तूट तीन टक्के आहे. सोलापूरसह उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, वाशिम, यवतमाळ आणि गोंदिया या आठ जिल्ह्यांमध्ये आता पावसाची तूट आहे. यात सर्वाधिक तूट बीडमध्ये आहे. त्याखालोखाल सोलापूरकर पावसाच्या तुटीमुळे त्रासले आहेत.
राज्यात रविवारी सकाळी ८.३० पासून सायं. ५.३० पर्यंत
महाबळेश्वर - सर्वाधिक १३५ मिलीमीटर पाऊस
नाशिक - ९७.६ मिलीमीटर पाऊस
माथेरान - ११३ मिलीमीटर पाऊस
सोलापूर - दिवसभरात केवळ २.९ मिलीमीटर पाऊस