म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
सरफरोश चित्रपटात उंटावरून शस्रे परदेशातून भारतामध्ये पाठवितात हे दाखविण्यात आले आहे. अशाप्रकारे लोकलमध्ये प्रवाशांचे मोबाइल चोरणारी झारखंडची टोळी हे मोबाइल बांग्लादेशात पाठविण्यासाठी गाई-म्हशींचा वापर करत असल्याचे उघड झाले आहे. या टोळीतील तिघांना शुक्रवारी रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
लोकलमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या खिशातील मोबाइल चोरणाऱ्या मुकेशकुमार महांतो (३१), इस्तिखार उमर शेख (१९) आणि उत्तमकुमार विनोद ठाकूर (२१) या तिघांना रंगेहाथ पकडले. हे तिघेही झारखंडचे असून सराईत मोबाइल चोर आहेत. मोबाइल चोरी आणि ते विकण्याची पद्धती याबाबत चौकशी करीत असताना पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती आली. मुकेशकुमार या टोळीचा म्होरक्या असून तो झारखंडमधील बेरोजगार तरुणांना दरमहा १० ते १५ हजार रुपये देऊन मुंबईत आणतो. उपनगरात खोली भाड्याने घेतो. १५ ते २० दिवसांत ४०-५० मोबाइल हाती लागले की ते मुंबईतून झारखंडमार्गे पश्चिम बंगालमध्ये पाठविले जातात. भारताच्या सीमेवर चरणाऱ्या गाई-म्हशींच्या पाठीवरून हे चोरीचे मोबाइल सीमेपलिकडे बांग्लादेशात पाठविले जातात. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचे मोबाइल जप्त केले.
मोबाइल चोरांची ही टोळी २०११ पासून लोकलमध्ये सक्रीय आहे. चोरीचे मोबाइल मुंबई किंवा भारतात वापरण्यास सुरुवात केल्यास आयएमईआय नंबरवरून ट्रेस केले जातात. तेच सीमेपलिकडे परदेशात पाठविल्यास ट्रेस करताना अडचणी येतात. म्हणून ही टोळी चोरीचे मोबाइल बांग्लादेशात नेऊन विकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सरफरोश चित्रपटात उंटावरून शस्रे परदेशातून भारतामध्ये पाठवितात हे दाखविण्यात आले आहे. अशाप्रकारे लोकलमध्ये प्रवाशांचे मोबाइल चोरणारी झारखंडची टोळी हे मोबाइल बांग्लादेशात पाठविण्यासाठी गाई-म्हशींचा वापर करत असल्याचे उघड झाले आहे. या टोळीतील तिघांना शुक्रवारी रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
लोकलमधील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या खिशातील मोबाइल चोरणाऱ्या मुकेशकुमार महांतो (३१), इस्तिखार उमर शेख (१९) आणि उत्तमकुमार विनोद ठाकूर (२१) या तिघांना रंगेहाथ पकडले. हे तिघेही झारखंडचे असून सराईत मोबाइल चोर आहेत. मोबाइल चोरी आणि ते विकण्याची पद्धती याबाबत चौकशी करीत असताना पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती आली. मुकेशकुमार या टोळीचा म्होरक्या असून तो झारखंडमधील बेरोजगार तरुणांना दरमहा १० ते १५ हजार रुपये देऊन मुंबईत आणतो. उपनगरात खोली भाड्याने घेतो. १५ ते २० दिवसांत ४०-५० मोबाइल हाती लागले की ते मुंबईतून झारखंडमार्गे पश्चिम बंगालमध्ये पाठविले जातात. भारताच्या सीमेवर चरणाऱ्या गाई-म्हशींच्या पाठीवरून हे चोरीचे मोबाइल सीमेपलिकडे बांग्लादेशात पाठविले जातात. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचे मोबाइल जप्त केले.
मोबाइल चोरांची ही टोळी २०११ पासून लोकलमध्ये सक्रीय आहे. चोरीचे मोबाइल मुंबई किंवा भारतात वापरण्यास सुरुवात केल्यास आयएमईआय नंबरवरून ट्रेस केले जातात. तेच सीमेपलिकडे परदेशात पाठविल्यास ट्रेस करताना अडचणी येतात. म्हणून ही टोळी चोरीचे मोबाइल बांग्लादेशात नेऊन विकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.