अ‍ॅपशहर

मुंबई ट्रेनमधील चोरीच्या मोबाइलचं पुढे काय होतं?

उपनगरी लोकल गाड्यांमधून रोज जवळपास ८० लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकल या चोरांचा अड्डा बनल्या आहेत. रेल्वे पोलिसांच्या अहवालानुसार, एका दिवसाला साधारण ७८ मोबाइल फोन चोरीला जातात.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2020, 3:11 pm
मुंबई: उपनगरी लोकल गाड्यांमधून रोज जवळपास ८० लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकल या चोरांचा अड्डा बनल्या आहेत. रेल्वे पोलिसांच्या अहवालानुसार, एका दिवसाला साधारण ७८ मोबाइल फोन चोरीला जातात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai train mobile


चोरीला गेलेल्या मोबाइल फोनपैकी फक्त ८ मोबाइल परत मिळण्याची शक्यता असते. कारण मोबाइल चोर हे इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी (आयएमईआय) बदलतात. त्यामुळं चोरीला गेलेल्या मोबाइलचा तपास करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं राहतं. \

आईने मुलाला बेडमध्ये डांबलं; गुदमरून गेला जीव

चोरीच्या मोबाइलचं पुढे काय होतं?

  • गर्दीचा गैरफायदा घेऊन ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवाशाच्या खिशातून मोबाइल लंपास केला जातो.

  • प्रवाशांचे मोबाइल चोरी केल्यानंतर फोन लगेच स्विच्ड ऑफ केला जातो.

  • त्यानंतर चोरीचे मोबाइल खरेदी करणाऱ्या स्थानिकांना तो विकला जातो.

  • खरेदी केलेले चोरीचे मोबाइल चोरबाजारात स्वस्तात विकले जातात.

  • महागडे मोबाइल फोन इतर राज्यांमध्ये पाठवण्याआधी त्याचा आयएमईआय क्रमांक बदलला जातो आणि ते फोन परत मिळण्याची शक्यता कमी असते.

  • फोनचा आयएमईआय क्रमांक बदलला गेला नाही तर, पोलीस तो ट्रेस करून संबंधित मालकाला परत देऊ शकतात. मग ते काही महिन्यांनंतर पुन्हा सुरू केले तरी ते परत मिळतात.

  • आयएमईआय क्रमांक बदलला असेल तर, फोन परत मिळण्याची शक्यता खूप कमी असते.

एचआयव्हीग्रस्त महिलेवर ट्रेनमध्ये बलात्कार

...तर फोन ट्रॅक होऊ शकतो

मुंबई रेल्वे पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, 'आम्ही फोनचं लोकेशन फक्त तेव्हाच ट्रॅक करू शकतो, ज्यावेळी तो रिस्टार्ट केला जातो. तसंच त्याचा आयएमईआय क्रमांक बदलत नाही तोपर्यंत तो फोन ट्रॅक केला जाऊ शकतो. जर फोन अन्य राज्यांत पाठवला जात असेल तर तिथे आम्हाला एक पथक पाठवावं लागतं. त्यानंतर गुन्हेगारांना पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांशी समन्वय साधावा लागतो.'

५६, ४८६ मोबाइल चोरीचे गुन्हे

मुंबई रेल्वे पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत एकूण ५६, ४८६ मोबाइल चोरीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गर्दीचा फायदा घेत चोर प्रवाशांच्या खिशातून मोबाइल लंपास करतात. रोज किमान ७८ मोबाइल चोरीला जातात. सरासरी ८ लाख रुपये किंमतीचे मोबाइल चोरीला जातात.

या स्थानकांवर जरा सांभाळून!

कल्याण, बोरिवली, ठाणे, कुर्ला आणि वडाळा या स्थानकांवर मोबाइल चोरी होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. गेल्या दोन वर्षांत कुर्ला रेल्वे पोलिसांत मोबाइल चोरीचे ७७०४ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तर ठाणे रेल्वे पोलिसांत ६९३५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज