म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळांच्या वेळांनुसार विशेष बस सोडल्या जात असल्या तरीही काही भागांमध्ये पंचमासिकाची रक्कम भरूनही त्यांना अद्याप पास मिळालेले नाहीत. या विशेष सेवांसाठी पालकांना नेहमीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागत असल्याच्या तक्रारींचीही त्यात भर पडली आहे. विशेष बसचे १५ जून ते नोव्हेंबर अखेरीपर्यंचा पास काढल्यानंतर दीड महिना उलटून गेला तरीही पास हाती आलेला नाही. पासांच्या छपाईसाठी कार्डांची कमतरता असून हळूहळू ती भरून काढली जात असल्याचा दावा बेस्टतर्फे केला जात आहे.
मुंबई आणि परिसरातील शालेय विद्यार्थ्यांची संख्या ६० हजारांवर आहे. त्यापैकी एकाच भागातील शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी बेस्ट उपक्रमातर्फे स्वतंत्र बससेवा पुरवली जाते. या सेवा शाळांच्या वेळांप्रमाणे चालत असल्याने त्यास चांगला प्रतिसाद लाभतो. एका बसमध्ये ५० विद्यार्थी असावेत असा नियम आहे. त्यानुसार ही सेवा सुरू केली जाते. पण बेस्ट भाडेवाढीमुळे या सेवांचे दरही वाढले आहेत. तरीही खासगी बससेवांपेक्षा बेस्टचा प्रवास सुरक्षित असल्याने या सेवेस मागणी आहे.
या स्थितीत गोरेगाव पूर्वेतील नागरी निवारा परिषद वसाहतीतील सुमारे १५० विद्यार्थी या विशेष बसमधून शाळेत जातात. गोरेगाव स्थानक परिसरात सेंट थॉमसप्रमाणेच नंदादीप आदी शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांनी विशेष बससाठी पाच महिन्यांसाठी २,०८० रुपये भरले आहेत. या विद्यार्थ्यांनी जूनमध्येच पास काढले असले तरीही त्यांना पासऐवजी कागदी स्लिप देण्यात आली आहे. विद्यार्थी, पालकांची अडचण संपुष्टात आणण्यासाठी पास देण्याची मागणी साद प्रतिसाद संस्थेतर्फे संदीप सावंत यांनी दिंडोशी आगाराकडे पत्रातून केली आहे.
पासांची छपाई न होण्यामागे मुख्य कारण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कार्डांची कमतरता हे आहे. ही कार्डे आता उपलब्ध झाली असून त्यांची छपाई करून पासांचे वाटप होत असल्याचे बेस्ट उपक्रमाचे म्हणणे आहे. पासाच्या किंमतीबद्दलही पालकांमध्ये नाराजी आहे. या विशेष बसमधील पास अन्य कोणत्याही बससेवांमध्ये वापरता येत नसल्याचा नियम अडचणीचा ठरला आहे. शाळांमध्ये अतिरिक्त वर्ग, कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आदींमुळे शाळा काहीवेळा उशिरा सुटतात. त्यावेळी, ही बस नेहमीच्या वेळेनुसार निघून जात असल्याने पुन्हा प्रवासासाठी जादा खर्च होत असल्याचे पालक स्पष्ट करतात. त्यामुळे या बससेवेसाठी अर्ज भरून घेतानाच त्याची पूर्वकल्पना देणे आवश्यक असल्याचे पालक सांगतात. या पासासाठी दोन हजार रुपये भरल्यानंतर अन्य फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचीही मागणी केली जात आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळांच्या वेळांनुसार विशेष बस सोडल्या जात असल्या तरीही काही भागांमध्ये पंचमासिकाची रक्कम भरूनही त्यांना अद्याप पास मिळालेले नाहीत. या विशेष सेवांसाठी पालकांना नेहमीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागत असल्याच्या तक्रारींचीही त्यात भर पडली आहे. विशेष बसचे १५ जून ते नोव्हेंबर अखेरीपर्यंचा पास काढल्यानंतर दीड महिना उलटून गेला तरीही पास हाती आलेला नाही. पासांच्या छपाईसाठी कार्डांची कमतरता असून हळूहळू ती भरून काढली जात असल्याचा दावा बेस्टतर्फे केला जात आहे.
मुंबई आणि परिसरातील शालेय विद्यार्थ्यांची संख्या ६० हजारांवर आहे. त्यापैकी एकाच भागातील शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी बेस्ट उपक्रमातर्फे स्वतंत्र बससेवा पुरवली जाते. या सेवा शाळांच्या वेळांप्रमाणे चालत असल्याने त्यास चांगला प्रतिसाद लाभतो. एका बसमध्ये ५० विद्यार्थी असावेत असा नियम आहे. त्यानुसार ही सेवा सुरू केली जाते. पण बेस्ट भाडेवाढीमुळे या सेवांचे दरही वाढले आहेत. तरीही खासगी बससेवांपेक्षा बेस्टचा प्रवास सुरक्षित असल्याने या सेवेस मागणी आहे.
या स्थितीत गोरेगाव पूर्वेतील नागरी निवारा परिषद वसाहतीतील सुमारे १५० विद्यार्थी या विशेष बसमधून शाळेत जातात. गोरेगाव स्थानक परिसरात सेंट थॉमसप्रमाणेच नंदादीप आदी शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांनी विशेष बससाठी पाच महिन्यांसाठी २,०८० रुपये भरले आहेत. या विद्यार्थ्यांनी जूनमध्येच पास काढले असले तरीही त्यांना पासऐवजी कागदी स्लिप देण्यात आली आहे. विद्यार्थी, पालकांची अडचण संपुष्टात आणण्यासाठी पास देण्याची मागणी साद प्रतिसाद संस्थेतर्फे संदीप सावंत यांनी दिंडोशी आगाराकडे पत्रातून केली आहे.
पासांची छपाई न होण्यामागे मुख्य कारण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कार्डांची कमतरता हे आहे. ही कार्डे आता उपलब्ध झाली असून त्यांची छपाई करून पासांचे वाटप होत असल्याचे बेस्ट उपक्रमाचे म्हणणे आहे. पासाच्या किंमतीबद्दलही पालकांमध्ये नाराजी आहे. या विशेष बसमधील पास अन्य कोणत्याही बससेवांमध्ये वापरता येत नसल्याचा नियम अडचणीचा ठरला आहे. शाळांमध्ये अतिरिक्त वर्ग, कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आदींमुळे शाळा काहीवेळा उशिरा सुटतात. त्यावेळी, ही बस नेहमीच्या वेळेनुसार निघून जात असल्याने पुन्हा प्रवासासाठी जादा खर्च होत असल्याचे पालक स्पष्ट करतात. त्यामुळे या बससेवेसाठी अर्ज भरून घेतानाच त्याची पूर्वकल्पना देणे आवश्यक असल्याचे पालक सांगतात. या पासासाठी दोन हजार रुपये भरल्यानंतर अन्य फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचीही मागणी केली जात आहे.