एसएनडीटीच्या निर्णयाविरुद्ध अनोखे आंदोलन
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी चर्चगेट कॅम्पस येथे केलेल्या ड्रेसकोडच्या विरोधात सध्या सर्व स्तरांतून टीका होत आहे. याविरोधात अनेक विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली असताना आता विद्यार्थी भारती या विद्यार्थी संघटनेने थेट आंदोलनाची हाक दिली आहे. कुलगुरूंच्या या ड्रेसकोड विरोधात शॉर्ट कपडे घालून आगळे वेगळे आंदोलन करण्याची घोषणा संघटनेने केली असून हा निर्णय मागे घेण्याची मागणी विद्यार्थी भारतीच्या राज्य अध्यक्षा विजेता भोनकर यांनी गुरुवारी केली.
एसएनडीटी विद्यापीठातील विद्यार्थिनींसाठी फॉर्मल ड्रेस कोडची घोषणा काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी यांनी केली होती. कुलगुरूंच्या या निर्णयाला विरोध करताना विद्यार्थी भारतीने जोरदार टीका केली आहे. शुक्रवारी कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ शॉर्ट कपडे घालून या निर्णयाचा निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुलगुरूंचा निर्णय तालिबानी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
हा तर तालिबानी फतवा
याबद्दल बोलताना विद्यार्थी भारतीच्या कार्यवाह स्मिता साळुंखे म्हणाल्या, मुलींच्या ड्रेसकोड बद्दल घेतलेला निर्णय म्हणजे एक प्रकारचा फतवाच आहे. या निर्णयामुळे सर्व विद्यार्थिनी खुश आहेत असे खोटे आणि चुकीचे विधान कुलगुरूंनी केले असल्याचा आरोप त्यांनी केला. विसाव्या शतकात असे तालिबानी फतवे काढणे एखाद्या विद्यापीठाने काढावेत, हे शोभत नाही असे त्यांनी नमूद केले.
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी चर्चगेट कॅम्पस येथे केलेल्या ड्रेसकोडच्या विरोधात सध्या सर्व स्तरांतून टीका होत आहे. याविरोधात अनेक विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली असताना आता विद्यार्थी भारती या विद्यार्थी संघटनेने थेट आंदोलनाची हाक दिली आहे. कुलगुरूंच्या या ड्रेसकोड विरोधात शॉर्ट कपडे घालून आगळे वेगळे आंदोलन करण्याची घोषणा संघटनेने केली असून हा निर्णय मागे घेण्याची मागणी विद्यार्थी भारतीच्या राज्य अध्यक्षा विजेता भोनकर यांनी गुरुवारी केली.
एसएनडीटी विद्यापीठातील विद्यार्थिनींसाठी फॉर्मल ड्रेस कोडची घोषणा काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी यांनी केली होती. कुलगुरूंच्या या निर्णयाला विरोध करताना विद्यार्थी भारतीने जोरदार टीका केली आहे. शुक्रवारी कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ शॉर्ट कपडे घालून या निर्णयाचा निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुलगुरूंचा निर्णय तालिबानी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
हा तर तालिबानी फतवा
याबद्दल बोलताना विद्यार्थी भारतीच्या कार्यवाह स्मिता साळुंखे म्हणाल्या, मुलींच्या ड्रेसकोड बद्दल घेतलेला निर्णय म्हणजे एक प्रकारचा फतवाच आहे. या निर्णयामुळे सर्व विद्यार्थिनी खुश आहेत असे खोटे आणि चुकीचे विधान कुलगुरूंनी केले असल्याचा आरोप त्यांनी केला. विसाव्या शतकात असे तालिबानी फतवे काढणे एखाद्या विद्यापीठाने काढावेत, हे शोभत नाही असे त्यांनी नमूद केले.