वैद्यकीय क्षेत्राला पूर्णपणे नव्या असलेल्या करोना संसर्गासाठी कोणते उपचार द्यायचे, याची कल्पना संसर्ग सुरू झाला तेव्हा नव्हती. लक्षणाधारित उपचारपद्धती देत असताना रुग्णांची तपासणी, पाठपुरावा आणि विलगीकरण या त्रिसूत्रीवर भर देण्यात आला. करोना रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी सेव्हनहिल्स या रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयामध्ये करण्यात आले. ४२ हजारांहून अधिक रुग्णांना वैद्यकीय उपचार देणाऱ्या या रुग्णालयाने या आजारासंदर्भात केलेले एक अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन भविष्यात करोनासारख्या साथींचा मुकाबला करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
करोना संसर्गाच्या काळामध्ये एकेका रुग्णाचा प्राण वाचवण्यासाठी शिकस्त करण्यात आली. या साथीने दिलेला धडा कायम लक्षात राहावा, त्यानुरूप वैद्यकीय उपचारपद्धतीमध्ये अन् दृष्टिकोनामध्ये बदल करण्यासाठी मुंबईतील सेव्हनहिल्स या पहिल्या करोना रुग्णालयाने तब्बल ४२ हजार बाधित रुग्णांच्या वैद्यकीय, आर्थिक, सामाजिक बाजूंचा अभ्यासपूर्ण दस्तावेज तयार केला. या प्रकारचे संशोधन हे भविष्यात निश्चितपणे दिशादर्शक ठरणार आहे.
या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी या संशोधन करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. करोनाने रुग्णांवर केवळ शारीरिक आघात केला नाही तर त्यांना कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक पातळ्यांवर मोठी किंमत मोजावी लागली. संसर्गाच्या धास्तीने आरोग्य कर्मचाऱ्यांपासून अनेक जणांना वाईट वागणूक मिळाली. त्यामुळे केवळ उपचारांची पद्धती आणि दिशा यावर संशोधन करण्यासह या आजाराचा समाजावर असलेल्या परिणामांबद्दल अभ्यास करणे अपेक्षित होते. 'कम्युनिटी मेडिसीन' या विषयातील अनुभवामुळे हा विचार अधिक भक्कम झाल्याचे त्यांनी आर्वजून सांगितले.
या अभ्यासामध्ये करोना संसर्गाशी निगडित विविध पैलूंचा अभ्यास करण्यात आला आहे. १५ मार्च २०२२ पर्यंत रुग्णालयामध्ये ४७,०३४ करोना रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यापैकी ४२,१६२ रुग्णांनी करोनावर मात केली. या रुग्णालयातील मृत्यूदर हा सर्वात कमी म्हणजे ६.५ टक्के इतका होता. करोना झालेल्या रुग्णांना डायलेसिसची मोफत सुविधा येथे सुरू करण्यात आली. ही सुविधा मिळालेल्या ५७३५ रुग्णांपैकी ९४० हे करोनाचे रुग्ण होते.
पालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी या संशोधनासाठी मार्गदर्शन केले होते. आयसीएमआर, जागतिक आरोग्य संघटनेकडून या आजारासंदर्भात नियमावली येत होती. तिचे पालन रुग्णालयांमध्ये केले जात होते. मात्र मुंबईतील लोकसंख्या, रुग्णसंख्येमध्ये वेगाने होणारी वाढ लक्षात घेता करोना उपचाराच्या सर्वात मोठ्या रुग्णालयामध्ये रुग्णांचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. इतरांकडून प्रेरणा घेत असताना आपल्या आरोग्य यंत्रणेला दिशा दाखवण्यासाठी हा अभ्यास महत्त्वाचा असल्याचे काकाणी यांनी 'मटा'ला सांगितले. करोना संसर्गाचा फैलाव करणाऱ्या विषाणूच्या स्वरूपात बदल झाला तर उपचारांची नेमकी दिशा कशी असायला हवी, हे समजून घेण्यासाठी यातून मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संशोधनामध्ये काय?
या रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेतलेल्या ४२,६८२ रुग्णसंख्येमध्ये ६०.८ टक्के पुरुष तर ३९.२ टक्के महिला रुग्णांचा समावेश होता. ४६ ते ६० वयोगटातील २९.९ टक्के रुग्णांनी येथे उपचार घेतले. करोना संसर्गाची सर्वाधिक लागण ही कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना झाली, रुग्णसंख्येमध्ये मुंबई तसेच मुंबईबाहेरील किती रुग्णांचा समावेश होता, आजारावर मात करण्यासाठी कोणती औषधोपचार पद्धती अधिक लागू पडली, याचा विस्तृत आढावा यात घेण्यात आला आहे. करोनावर मात करण्यासाठी लसीकरणाच्या उपयुक्ततेसंदर्भात मतमतांतरे व्यक्त होत होती. रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या ८४ टक्के रुग्णांनी लस घेतली नव्हती तर ५ टक्के रुग्णांनी एक मात्रा घेतली होती. लस घेतलेल्या रुग्णांना संसर्गाची पुन्हा लागण झाली असली तरीही लसीकरणामुळे मृत्यू टाळता आल्याचे या अभ्यासातून दिसून आले आहे.
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
करोना संसर्गाच्या काळामध्ये एकेका रुग्णाचा प्राण वाचवण्यासाठी शिकस्त करण्यात आली. या साथीने दिलेला धडा कायम लक्षात राहावा, त्यानुरूप वैद्यकीय उपचारपद्धतीमध्ये अन् दृष्टिकोनामध्ये बदल करण्यासाठी मुंबईतील सेव्हनहिल्स या पहिल्या करोना रुग्णालयाने तब्बल ४२ हजार बाधित रुग्णांच्या वैद्यकीय, आर्थिक, सामाजिक बाजूंचा अभ्यासपूर्ण दस्तावेज तयार केला. या प्रकारचे संशोधन हे भविष्यात निश्चितपणे दिशादर्शक ठरणार आहे.
या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी या संशोधन करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. करोनाने रुग्णांवर केवळ शारीरिक आघात केला नाही तर त्यांना कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक पातळ्यांवर मोठी किंमत मोजावी लागली. संसर्गाच्या धास्तीने आरोग्य कर्मचाऱ्यांपासून अनेक जणांना वाईट वागणूक मिळाली. त्यामुळे केवळ उपचारांची पद्धती आणि दिशा यावर संशोधन करण्यासह या आजाराचा समाजावर असलेल्या परिणामांबद्दल अभ्यास करणे अपेक्षित होते. 'कम्युनिटी मेडिसीन' या विषयातील अनुभवामुळे हा विचार अधिक भक्कम झाल्याचे त्यांनी आर्वजून सांगितले.
या अभ्यासामध्ये करोना संसर्गाशी निगडित विविध पैलूंचा अभ्यास करण्यात आला आहे. १५ मार्च २०२२ पर्यंत रुग्णालयामध्ये ४७,०३४ करोना रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यापैकी ४२,१६२ रुग्णांनी करोनावर मात केली. या रुग्णालयातील मृत्यूदर हा सर्वात कमी म्हणजे ६.५ टक्के इतका होता. करोना झालेल्या रुग्णांना डायलेसिसची मोफत सुविधा येथे सुरू करण्यात आली. ही सुविधा मिळालेल्या ५७३५ रुग्णांपैकी ९४० हे करोनाचे रुग्ण होते.
पालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी या संशोधनासाठी मार्गदर्शन केले होते. आयसीएमआर, जागतिक आरोग्य संघटनेकडून या आजारासंदर्भात नियमावली येत होती. तिचे पालन रुग्णालयांमध्ये केले जात होते. मात्र मुंबईतील लोकसंख्या, रुग्णसंख्येमध्ये वेगाने होणारी वाढ लक्षात घेता करोना उपचाराच्या सर्वात मोठ्या रुग्णालयामध्ये रुग्णांचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. इतरांकडून प्रेरणा घेत असताना आपल्या आरोग्य यंत्रणेला दिशा दाखवण्यासाठी हा अभ्यास महत्त्वाचा असल्याचे काकाणी यांनी 'मटा'ला सांगितले. करोना संसर्गाचा फैलाव करणाऱ्या विषाणूच्या स्वरूपात बदल झाला तर उपचारांची नेमकी दिशा कशी असायला हवी, हे समजून घेण्यासाठी यातून मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संशोधनामध्ये काय?
या रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेतलेल्या ४२,६८२ रुग्णसंख्येमध्ये ६०.८ टक्के पुरुष तर ३९.२ टक्के महिला रुग्णांचा समावेश होता. ४६ ते ६० वयोगटातील २९.९ टक्के रुग्णांनी येथे उपचार घेतले. करोना संसर्गाची सर्वाधिक लागण ही कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना झाली, रुग्णसंख्येमध्ये मुंबई तसेच मुंबईबाहेरील किती रुग्णांचा समावेश होता, आजारावर मात करण्यासाठी कोणती औषधोपचार पद्धती अधिक लागू पडली, याचा विस्तृत आढावा यात घेण्यात आला आहे. करोनावर मात करण्यासाठी लसीकरणाच्या उपयुक्ततेसंदर्भात मतमतांतरे व्यक्त होत होती. रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या ८४ टक्के रुग्णांनी लस घेतली नव्हती तर ५ टक्के रुग्णांनी एक मात्रा घेतली होती. लस घेतलेल्या रुग्णांना संसर्गाची पुन्हा लागण झाली असली तरीही लसीकरणामुळे मृत्यू टाळता आल्याचे या अभ्यासातून दिसून आले आहे.