म. टा. प्रतिनिधी, मुंबई
रत्नागिरीतील तिवरे धरणफुटी दुर्घटनेतील रहिवाशांना प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून घरे व गावातील शाळा बांधून दिली जाणार आहे. न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला.
सिद्धिविनायक मंदिर न्यासाने तिवरे दुर्घटनाग्रस्तांच्या सहाय्यासाठी भरीव निधीच्या केलेल्या तरतुदीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. धरणफुटीचा फटका बसलेल्या ग्रामस्थांना जीवनाची नव्याने सुरुवात करण्यासाठी न्यास सर्वतोपरी मदत करेल, असे बांदेकर यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील अनाथ गतिमंद मुलांच्या संगोपनाची जबाबदारी उचलण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. आई-वडिलांनंतर या गतिमंद मुलांना कुणाचाच आधार नसतो. ती पूर्णत: परावलंबी असतात. आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्यांची प्रचंड वाताहत होते. त्यामुळेच त्यांना आधार देण्याचा निर्णय न्यासाने घेतला असल्याचे सांगण्यात आले.
रत्नागिरीतील तिवरे धरणफुटी दुर्घटनेतील रहिवाशांना प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून घरे व गावातील शाळा बांधून दिली जाणार आहे. न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला.
सिद्धिविनायक मंदिर न्यासाने तिवरे दुर्घटनाग्रस्तांच्या सहाय्यासाठी भरीव निधीच्या केलेल्या तरतुदीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. धरणफुटीचा फटका बसलेल्या ग्रामस्थांना जीवनाची नव्याने सुरुवात करण्यासाठी न्यास सर्वतोपरी मदत करेल, असे बांदेकर यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील अनाथ गतिमंद मुलांच्या संगोपनाची जबाबदारी उचलण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. आई-वडिलांनंतर या गतिमंद मुलांना कुणाचाच आधार नसतो. ती पूर्णत: परावलंबी असतात. आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्यांची प्रचंड वाताहत होते. त्यामुळेच त्यांना आधार देण्याचा निर्णय न्यासाने घेतला असल्याचे सांगण्यात आले.