अ‍ॅपशहर

गाडगेबाबांची दशसुत्री, मविआ सरकारचा आदर्श अन् शिंदे फडणवीसांचं वर्तन, सुप्रिया सुळेंची चर्चेतील पोस्ट

गाडगेबाबांच्या उपदेशाची प्रेरणादायी दशसूत्री मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरुन काढण्यात आल्यानंतर राज्यभरातून नाराजीचा सूर उमटला. नंतर आपला निर्णय मागे घेत ती पुन्हा लावण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानर देर आए दुरुस्त आए असं या प्रसंगाचं वर्णन करता येईल, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. पण दुसरीकडे महापुरुषांच्या बाबतीत एखादी अशी कृती करायची आणि नंतर त्यावर टिका झाली की ती दुरुस्त करायची हे या राज्यात का सुरु आहे?, असा सवालही त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.

Authored byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Oct 2022, 3:52 pm
मुंबई : थोर संत गाडगेबाबा यांनी आपल्या जीवन कार्याची शिकवण दहा सुत्रांतून मांडली आहे. समाजाला स्वच्छतेतून समृद्धीचा कानमंत्र दिला. त्यांच्या संपूर्ण उपदेशाची ही प्रेरणादायी दशसूत्री महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराशी लावण्यात आली होती. परंतु राज्यात सत्ताबदल झाल्यावर ती काढण्यात आली. यावर राज्यभरातून नाराजीचा सूर उमटल्यानंतर आता ती पुन्हा लावण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकारावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीसांची कान टोचणारी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Supriya Sule Slam Cm Eknath Shinde And Devendra fadanvis Over removed the Gadgebaba Life Work formula board from the entrance of the mantralaya Ministry
शिंदे फडणवीस आणि सुप्रिया सुळे


गाडगेबाबांच्या उपदेशाची प्रेरणादायी दशसूत्री मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरुन काढण्यात आल्यानंतर राज्यभरातून नाराजीचा सूर उमटला. नंतर आपला निर्णय मागे घेत ती पुन्हा लावण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानर देर आए दुरुस्त आए असं या प्रसंगाचं वर्णन करता येईल, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. पण दुसरीकडे महापुरुषांच्या बाबतीत एखादी अशी कृती करायची आणि नंतर त्यावर टीका झाली की ती दुरुस्त करायची हे या राज्यात का सुरु आहे?, असा सवालही त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.

शिंदे-फडणवीसांची कान टोचणारी सुप्रिया सुळेंची पोस्ट

"थोर संत गाडगेबाबा यांनी आपल्या जीवन कार्याची शिकवण दहा सुत्रांतून मांडली आहे. यामध्ये तहानलेल्यांना पाणी, भुकेलेल्यांना अन्न, उघड्या-नागड्यांना वस्त्र, गरीब मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना निवारा, अधू-अपंग व रोगी यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशु-पक्षी-मुक्या प्राण्यांना अभय, गोरगरीबांची लग्ने व दुःखी व निराश झालेल्यांना हिंमत अशी ती जनकल्याणाची दहा सुत्रे सांगितली होती".

"माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील (आबा) यांनी ही सुत्रे समोर ठेवून राष्ट्रसंत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सुरु केले. गाडगेबाबांची शिकवण त्यांच्या पश्चात गावोगावी पोहोचविण्यासाठी काम केले. गाडगेबाबांनी समाजातील दीन-दुःखी आणि दुबळ्यांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले. समाजाला स्वच्छतेतून समृद्धीचा कानमंत्र दिला. त्यांच्या संपूर्ण उपदेशाची ही प्रेरणादायी दशसुत्री महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराशी लावण्यात आली होती. परंतु राज्यात सत्ताबदल झाल्यावर ती काढण्यात आली".

"यावर राज्यभरातून नाराजीचा सूर उमटल्यानंतर आता ती पुन्हा लावण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 'देर आए दुरुस्त आए' असं याचं वर्णन करता येईल. गाडगेबाबांची दशसुत्री पुन्हा विराजमान होतेय याचे समाधान आहे. परंतु प्रश्न असा उपस्थित होतो की, अगोदर कोणताही विचार न करता महापुरुषांच्या बाबतीत एखादी अशी कृती करायची आणि नंतर त्यावर टीका झाली की ती दुरुस्त करायची हे या राज्यात का सुरु आहे? महापुरुषांच्या शिकवणूॉुकीचा आणि त्यांच्या स्मृतींचा अवमान करु नका एवढीच विनंती".

लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख