म. टा. प्रतिनिधी, मुंबई
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांचे जनजागरण करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. डॉ. अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा सुरू असतानाच, राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे ह्या २३ ऑगस्टपासून सहा जिल्ह्यात संवाद दौरा सुरू करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आली.
सुप्रिया सुळे उद्या शुक्रवारपासून पहिल्या टप्प्यात राज्यातील सहा जिल्ह्यांत संवाद दौरा सुरू करणार आहेत. पूरपरिस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा, ढिसाळ प्रशासकीय कारभार व सामान्य लोकांच्या कामाबाबत सरकारी अनास्था या विषयावर विविध जिल्ह्यांतील बहुविध घटकांशी संवाद साधण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे, असे राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात आले.
संवाद दौऱ्याच्या पहिल्या टप्यात २३ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर आणि नवी मुंबई या भागातील जनतेशी त्या संवाद साधणार आहेत असे सांगण्यात आले.
'मुंबई बन गई खड्डे का अड्डा' हे नवीन विशेष अभियान मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस राबविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.
'मुंबई बन गई खड्डे का अड्डा' या नावाखाली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खड्ड्यांचे फोटो काढून महापालिकेला टॅग करणार आहेत. त्यातील किती खड्डे बुजवले, किती खड्डे अद्याप तसेच आहेत, असे प्रश्न मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस विचारणार आहे, असेही मलिक यांनी सांगितले. MumbaiPotholes या हॅशटॅग खाली हे अभियान राबवण्यात येणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांचे जनजागरण करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. डॉ. अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा सुरू असतानाच, राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे ह्या २३ ऑगस्टपासून सहा जिल्ह्यात संवाद दौरा सुरू करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आली.
सुप्रिया सुळे उद्या शुक्रवारपासून पहिल्या टप्प्यात राज्यातील सहा जिल्ह्यांत संवाद दौरा सुरू करणार आहेत. पूरपरिस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा, ढिसाळ प्रशासकीय कारभार व सामान्य लोकांच्या कामाबाबत सरकारी अनास्था या विषयावर विविध जिल्ह्यांतील बहुविध घटकांशी संवाद साधण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे, असे राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात आले.
संवाद दौऱ्याच्या पहिल्या टप्यात २३ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर आणि नवी मुंबई या भागातील जनतेशी त्या संवाद साधणार आहेत असे सांगण्यात आले.
'मुंबई बन गई खड्डे का अड्डा' हे नवीन विशेष अभियान मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस राबविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.
'मुंबई बन गई खड्डे का अड्डा' या नावाखाली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खड्ड्यांचे फोटो काढून महापालिकेला टॅग करणार आहेत. त्यातील किती खड्डे बुजवले, किती खड्डे अद्याप तसेच आहेत, असे प्रश्न मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस विचारणार आहे, असेही मलिक यांनी सांगितले. MumbaiPotholes या हॅशटॅग खाली हे अभियान राबवण्यात येणार आहे.