मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
'ज्यांना प्रत्यक्ष बंदूक हातात घेऊन सीमेवर जाऊन लढता येत नाही अशा मंडळींनी संकटकाळात तोंड बंद ठेवावे हीसुद्धा देशसेवाच आहे,' अशा शब्दांत शिवसेनेनं भारतीय लष्कराच्या 'सर्जिकल स्ट्राइक'वर संशय व्यक्त करणाऱ्या राजकारण्यांवर हल्ला चढवला आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं केलेला 'सर्जिकल स्ट्राइक' पाकिस्ताननं फेटाळला असला तरी या कारवाईमुळं देशातील वातावरण भाजपच्या बाजूनं झुकलं आहे. भाजपनंही याचा फायदा उठविण्याचं ठरवल्यानं काँग्रेस व पंतप्रधान मोदींचे कट्टर विरोधक केजरीवाल बिथरले आहेत. त्यांनी 'सर्जिकल स्ट्राइक'वर शंका उपस्थित करत या कारवाईचे पुरावे मागितले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा पाकिस्तानी मीडिया भारताविरोधात वापर करत आहे. राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या या राजकारणावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून संताप व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणतात...
> मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीतही सर्जिकल हल्ले झाले होते, पण त्याचा राजकीय गवगवा कधीच केला नाही, असे आता अरुण शौरी, चिदंबरम यांनी म्हटलं आहे. त्यापाठोपाठ सर्जिकल हल्ल्यास खरे-खोटे ठरविण्याचा विडा उचलून अनेक दीडशहाणे पोपटपंची करू लागले आहेत. हा सर्व प्रकार म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ आहे. आपल्या जवानांचे मनोबल खच्ची करण्याचा डाव आहे.
> बंडलबाज पाकिस्तानने ‘सर्जिकल हल्ल्या’चे सत्य नाकारले हे त्यांच्या नौटंकी स्वभावास धरूनच झाले. पण अशा सर्जिकल हल्ल्याबाबत आपल्याच देशातील पुढार्यांनी शंका व्यक्त कराव्यात हे दु:खद आहे. पाकिस्तानने बंडलबाजीत अनेक पदके जिंकली आहेत. त्यांच्या बंडलबाजीशी आपल्याकडील लोकांनी स्पर्धा करू नये. काही गोष्टी गोपनीयच राहाव्यात. राष्ट्रीय सुरक्षेचे बिंग फुटले तर गडबड होईल!
> पाकिस्तान हा एक नंबरचा बंडलबाज देश आहे. हिंदुस्थानातील दहशतवादी हल्ल्याशी आपला संबंध नसल्याची त्यांची बंडलबाजी नेहमीच सुरू असते. लादेन आमच्या देशात लपला नसल्याची थाप ते मारतच होते, पण अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनला मारल्यावर त्यांची बंडलबाजी उघडी पडली.
> दाऊद इब्राहिम कराची किंवा लाहोरमध्येच उंडारतो आहे, पण पाकिस्तानची बंडलबाजी अशी की, ‘छे, छे, कोण, कुठला दाऊद? आमच्या देशात या नावाची कुणी व्यक्तीच अस्तित्वात नाही!’ जावेद मियांदादने दाऊदच्या पोरीशी सोयरिक जमवून सत्य उघड करूनही पाकिस्तानने दाऊदबाबत आपली बंडलबाजी सुरूच ठेवली आहे.
> अरविंद केजरीवाल यांची जीभ मधल्या काळात डॉक्टरांनी कापल्याची बातमी वाचनात आली होती, पण आता ही कातरलेली जीभ पुन्हा टोकदार झालेली दिसते. केजरीवाल यांनीदेखील शंकेची पाल पंतप्रधानांवर फेकली आहे. बंडलबाज पाकिस्तानला एकप्रकारे बळकटी देण्याचेच हे काम आहे.
> अमेरिकेच्या कमांडोजनी पाकिस्तानात घुसून लादेनला मारले तेव्हा त्या कारवाईची छायाचित्रे आणि व्हिडीओ चित्रण जगासमोर आणले होते हे खरेच. कारण ‘लादेनला खरेच मारले की नाही? मारला गेलेला खरोखरच लादेन की त्याचा डुप्लिकेट?’ अशा शंका काढायला लोकांनी कमी केले नसते. त्यामुळे कारवाईचे चित्रीकरण करून सैतानास खतम केल्याचे सत्य समोर आणले होते हे मान्य केले तरी आमच्या जवानांनी केलेली कारवाई तोलामोलाचीच आहे.
> सर्जिकल कारवाईचा राजकीय गाजावाजा जास्तच सुरू आहे, तसा तो होणारच. कारण ‘उरी’ घटनेनंतर देशात जो संताप आणि चीड निर्माण झाली त्याचे चटके सरकारला, खासकरून भाजपला बसू लागले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काय होणार? असा प्रश्न पडला. त्या सगळ्यांवर सर्जिकल कारवाईची गोळी लागू पडली आहे.
> निवडणुकांच्या राजकीय फायद्या-तोट्यासाठी युद्ध घडवू नयेत व पंतप्रधान तसे अजिबात करणार नाहीत, पण ज्यांच्या पायाखालची सतरंजी सरकली आहे त्यांनी सर्जिकल कारवाईवर शंका उपस्थित केल्या.
> सीमेवरील एक जवान चंदू चव्हाण हा अचानक बेपत्ता झाल्याचे गूढ आहे. पाकड्यांनी जवान चंदूबाबत हात झटकले, पण संरक्षणमंत्री पर्रीकरांनी जाहीर केले, जवान चंदू चव्हाणला चार-पाच दिवसांत परत आणू. या वक्तव्याला चार-पाच दिवस उलटून गेले आहेत, पण चंदू चव्हाण परतला नाही. संरक्षण खात्याच्या प्रमुखांनी संयम आणि जिभेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, तरच केजरीवाल यांच्या वायफळ पोपटपंचीवर इलाज करता येईल.
'ज्यांना प्रत्यक्ष बंदूक हातात घेऊन सीमेवर जाऊन लढता येत नाही अशा मंडळींनी संकटकाळात तोंड बंद ठेवावे हीसुद्धा देशसेवाच आहे,' अशा शब्दांत शिवसेनेनं भारतीय लष्कराच्या 'सर्जिकल स्ट्राइक'वर संशय व्यक्त करणाऱ्या राजकारण्यांवर हल्ला चढवला आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं केलेला 'सर्जिकल स्ट्राइक' पाकिस्ताननं फेटाळला असला तरी या कारवाईमुळं देशातील वातावरण भाजपच्या बाजूनं झुकलं आहे. भाजपनंही याचा फायदा उठविण्याचं ठरवल्यानं काँग्रेस व पंतप्रधान मोदींचे कट्टर विरोधक केजरीवाल बिथरले आहेत. त्यांनी 'सर्जिकल स्ट्राइक'वर शंका उपस्थित करत या कारवाईचे पुरावे मागितले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा पाकिस्तानी मीडिया भारताविरोधात वापर करत आहे. राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या या राजकारणावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून संताप व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणतात...
> मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीतही सर्जिकल हल्ले झाले होते, पण त्याचा राजकीय गवगवा कधीच केला नाही, असे आता अरुण शौरी, चिदंबरम यांनी म्हटलं आहे. त्यापाठोपाठ सर्जिकल हल्ल्यास खरे-खोटे ठरविण्याचा विडा उचलून अनेक दीडशहाणे पोपटपंची करू लागले आहेत. हा सर्व प्रकार म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ आहे. आपल्या जवानांचे मनोबल खच्ची करण्याचा डाव आहे.
> बंडलबाज पाकिस्तानने ‘सर्जिकल हल्ल्या’चे सत्य नाकारले हे त्यांच्या नौटंकी स्वभावास धरूनच झाले. पण अशा सर्जिकल हल्ल्याबाबत आपल्याच देशातील पुढार्यांनी शंका व्यक्त कराव्यात हे दु:खद आहे. पाकिस्तानने बंडलबाजीत अनेक पदके जिंकली आहेत. त्यांच्या बंडलबाजीशी आपल्याकडील लोकांनी स्पर्धा करू नये. काही गोष्टी गोपनीयच राहाव्यात. राष्ट्रीय सुरक्षेचे बिंग फुटले तर गडबड होईल!
> पाकिस्तान हा एक नंबरचा बंडलबाज देश आहे. हिंदुस्थानातील दहशतवादी हल्ल्याशी आपला संबंध नसल्याची त्यांची बंडलबाजी नेहमीच सुरू असते. लादेन आमच्या देशात लपला नसल्याची थाप ते मारतच होते, पण अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनला मारल्यावर त्यांची बंडलबाजी उघडी पडली.
> दाऊद इब्राहिम कराची किंवा लाहोरमध्येच उंडारतो आहे, पण पाकिस्तानची बंडलबाजी अशी की, ‘छे, छे, कोण, कुठला दाऊद? आमच्या देशात या नावाची कुणी व्यक्तीच अस्तित्वात नाही!’ जावेद मियांदादने दाऊदच्या पोरीशी सोयरिक जमवून सत्य उघड करूनही पाकिस्तानने दाऊदबाबत आपली बंडलबाजी सुरूच ठेवली आहे.
> अरविंद केजरीवाल यांची जीभ मधल्या काळात डॉक्टरांनी कापल्याची बातमी वाचनात आली होती, पण आता ही कातरलेली जीभ पुन्हा टोकदार झालेली दिसते. केजरीवाल यांनीदेखील शंकेची पाल पंतप्रधानांवर फेकली आहे. बंडलबाज पाकिस्तानला एकप्रकारे बळकटी देण्याचेच हे काम आहे.
> अमेरिकेच्या कमांडोजनी पाकिस्तानात घुसून लादेनला मारले तेव्हा त्या कारवाईची छायाचित्रे आणि व्हिडीओ चित्रण जगासमोर आणले होते हे खरेच. कारण ‘लादेनला खरेच मारले की नाही? मारला गेलेला खरोखरच लादेन की त्याचा डुप्लिकेट?’ अशा शंका काढायला लोकांनी कमी केले नसते. त्यामुळे कारवाईचे चित्रीकरण करून सैतानास खतम केल्याचे सत्य समोर आणले होते हे मान्य केले तरी आमच्या जवानांनी केलेली कारवाई तोलामोलाचीच आहे.
> सर्जिकल कारवाईचा राजकीय गाजावाजा जास्तच सुरू आहे, तसा तो होणारच. कारण ‘उरी’ घटनेनंतर देशात जो संताप आणि चीड निर्माण झाली त्याचे चटके सरकारला, खासकरून भाजपला बसू लागले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काय होणार? असा प्रश्न पडला. त्या सगळ्यांवर सर्जिकल कारवाईची गोळी लागू पडली आहे.
> निवडणुकांच्या राजकीय फायद्या-तोट्यासाठी युद्ध घडवू नयेत व पंतप्रधान तसे अजिबात करणार नाहीत, पण ज्यांच्या पायाखालची सतरंजी सरकली आहे त्यांनी सर्जिकल कारवाईवर शंका उपस्थित केल्या.
> सीमेवरील एक जवान चंदू चव्हाण हा अचानक बेपत्ता झाल्याचे गूढ आहे. पाकड्यांनी जवान चंदूबाबत हात झटकले, पण संरक्षणमंत्री पर्रीकरांनी जाहीर केले, जवान चंदू चव्हाणला चार-पाच दिवसांत परत आणू. या वक्तव्याला चार-पाच दिवस उलटून गेले आहेत, पण चंदू चव्हाण परतला नाही. संरक्षण खात्याच्या प्रमुखांनी संयम आणि जिभेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, तरच केजरीवाल यांच्या वायफळ पोपटपंचीवर इलाज करता येईल.