अ‍ॅपशहर

ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी ७ दिवसांची मुदत

महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी दादर येथील शिवतीर्थावर सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी उद्धव यांना राज्यपाल मुख्यमंत्रिपदाची शपथ देणार आहेत. दरम्यान, उद्धव यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी ७ दिवसांची म्हणजेच ३ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2019, 12:18 am
मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी दादर येथील शिवतीर्थावर सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी उद्धव यांना राज्यपाल मुख्यमंत्रिपदाची शपथ देणार आहेत. दरम्यान, उद्धव यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी ७ दिवसांची म्हणजेच ३ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhavthackeray


महाविकास आघाडीच्या वतीने युवासेनाप्रमुख व नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई व अन्य प्रमुख नेत्यांनी राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. उद्धव ठाकरे हे आमच्या आघाडीचं नेतृत्व करतील, असं यावेळी सांगण्यात आलं. हा दावा राज्यपालांनी स्वीकारला असून लगेचच उद्धव यांना सत्तास्थापनेसाठी पाचारण केलं आहे.

'ठाकरे सरकार'चा गुरुवारी शिवतीर्थावर शपथविधी



राज्यपालांनी तसं पत्र उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. महाविकास आघाडीकडे १६६ आमदारांचं संख्याबळ असल्याचं आघाडीकडून सादर करण्यात आलेल्या समर्थन पत्रांतून स्पष्ट होत आहे. त्यानुसार मी आपणास सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करत आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी दादर येथील शिवाजी पार्क मैदानात हा शपथविधी सोहळा पार पाडण्यात येईल, असेही राज्यपालांनी पुढे स्पष्ट केले आहे.

बाळासाहेबांच्या प्रतिमेपुढे उद्धव झाले नतमस्तक

उद्धव ठाकरे हे विधानसभा व विधान परिषद अशा विधीमंडळाच्या दोनपैकी एकाही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून पुढील सहा महिन्यांच्या आत विधीमंडळाचे सदस्य म्हणून निवडून यावे लागणार आहे. घटनेनुसार तो दंडक आहे. त्याबाबतही राज्यपालांनी उद्धव यांना सूचित केलं आहे.



आदित्य म्हणाले, हीच ती वेळ!

महाविकास आघाडीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना 'हीच ती वेळ' असा संकल्प बोलून दाखवला. शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे या तीन नेत्यांमुळे महाराष्ट्रात नवी आघाडी स्थापन झाली आहे. 'हीच ती वेळ आणि हीच ती संधी' हे आम्ही अवघ्या देशाला आज दाखवून दिले आहे. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी एकत्र आलो आहोत. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने आम्ही निश्चितच राज्याला स्थिर सरकार देऊ, असा विश्वास आदित्य यांनी यावेळी व्यक्त केला. महाविकास आघाडीला सत्तास्थापनेची संधी दिल्याबद्दल आदित्य यांनी राज्यपालांचे आभार मानले.

शपथविधीला शाहांनाही बोलावणार : राऊत

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज