म. टा. वृत्तसेवा, उल्हासनगर
देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून मंगळवारी उल्हासनगरमध्ये स्वच्छता हीच सेवा मोहिमेत न्यू ईरा कॉलेजमधील १,५०० विद्यार्थ्यांनी, तर बदलापूरमध्ये एक हजार विद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुक्त शहरासाठी स्वच्छतेची शपथ घेत एक हजार कापडी पिशव्यांचे वाटप केले.
केंद्र सरकारकडून देशभरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी नगरपालिकास्तरावर प्लास्टिकमुक्तीसाठी विविध उपक्रमही राबवण्यात येत असून, यात कॉलेज, सामाजिक संघटना, प्लास्टिकमुक्तीसाठी काम करणाऱ्या संघटना यांचा सहभाग आहे. याच मोहिमेअंतर्गत मंगळवारी उल्हासनगर येथील न्यू ईरा हायस्कूलच्या प्रांगणात स्वच्छता हीच सेवा या मोहिमेअंतर्गत भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी १,५०० विद्यार्थ्यांनी स्वच्छता हीच सेवा, या अंतर्गत शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी प्लास्टिकमुक्तीची शपथ घेत एक गीतही सादर केले. तसेच प्लास्टिकमुक्तीबाबत शहरात जनजागृही करण्याचा संकल्प करण्यात आला.
बदलापूर येथील शिरगाव भागातील अरविंद गुरुकुल शाळेच्या वतीने पर्यावरणरक्षणाचे मूल्य विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये रुजवण्यासाठी कापडी पिशव्यांचा वापर करत प्लास्टिक वापरण्याच्या विरोधात मोहीम राबवत बदलापूर शहरातील आपटेवाडी, शिरगाव, यादव नगर, मांजर्ली आणि विविध परिसरांमध्ये घरोघरी एक हजार कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी नागरिकांना कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहनही केले. या उपक्रमातून प्लास्टिकचा वापर हद्दपार करण्यासह विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, संवाद कौशल्य विकास आणि पर्यावरण रक्षणासाठी संदेश देणे हा शाळेचा उद्देश असल्याचे ठाणे जनता सहकारी बँकेचे शाखाधिकारी महेश बापट यांनी सांगितले. या कार्यक्रमाला अरविंद गुरुकुल शाळेचे कार्यवाह श्रीकांत देशपांडे, मुख्याध्यपिका रोहिणी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून मंगळवारी उल्हासनगरमध्ये स्वच्छता हीच सेवा मोहिमेत न्यू ईरा कॉलेजमधील १,५०० विद्यार्थ्यांनी, तर बदलापूरमध्ये एक हजार विद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुक्त शहरासाठी स्वच्छतेची शपथ घेत एक हजार कापडी पिशव्यांचे वाटप केले.
केंद्र सरकारकडून देशभरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी नगरपालिकास्तरावर प्लास्टिकमुक्तीसाठी विविध उपक्रमही राबवण्यात येत असून, यात कॉलेज, सामाजिक संघटना, प्लास्टिकमुक्तीसाठी काम करणाऱ्या संघटना यांचा सहभाग आहे. याच मोहिमेअंतर्गत मंगळवारी उल्हासनगर येथील न्यू ईरा हायस्कूलच्या प्रांगणात स्वच्छता हीच सेवा या मोहिमेअंतर्गत भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी १,५०० विद्यार्थ्यांनी स्वच्छता हीच सेवा, या अंतर्गत शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी प्लास्टिकमुक्तीची शपथ घेत एक गीतही सादर केले. तसेच प्लास्टिकमुक्तीबाबत शहरात जनजागृही करण्याचा संकल्प करण्यात आला.
बदलापूर येथील शिरगाव भागातील अरविंद गुरुकुल शाळेच्या वतीने पर्यावरणरक्षणाचे मूल्य विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये रुजवण्यासाठी कापडी पिशव्यांचा वापर करत प्लास्टिक वापरण्याच्या विरोधात मोहीम राबवत बदलापूर शहरातील आपटेवाडी, शिरगाव, यादव नगर, मांजर्ली आणि विविध परिसरांमध्ये घरोघरी एक हजार कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी नागरिकांना कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहनही केले. या उपक्रमातून प्लास्टिकचा वापर हद्दपार करण्यासह विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, संवाद कौशल्य विकास आणि पर्यावरण रक्षणासाठी संदेश देणे हा शाळेचा उद्देश असल्याचे ठाणे जनता सहकारी बँकेचे शाखाधिकारी महेश बापट यांनी सांगितले. या कार्यक्रमाला अरविंद गुरुकुल शाळेचे कार्यवाह श्रीकांत देशपांडे, मुख्याध्यपिका रोहिणी कुलकर्णी आदी उपस्थित होते.