अ‍ॅपशहर

मुंबईकरांसाठी खुशखबर! तानसा तलाव ओसंडून वाहू लागला

मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या तलाव आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडतोय. यामुळे धरणं आणि तलाव भरू लागली आहे. परिणामी मुंबईवरील पाणी कपातीचे संकट दूर झाले आहे. आता तनसा तलावही ओसंडून वाहू लागला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 21 Aug 2020, 12:28 am
मुंबई: महानगराची जीवनवाहिनी असलेला तसेच वर्षभर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख ७ तलावांपैकी तानसा तलाव आज (२० ऑगस्‍ट, २०२०) सायंकाळी ७.०५ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tansa dam : मुंबईकरांसाठी खुशखबर! तानसा तलाव ओसंडून वाहू लागला (संग्रहित फोटो)


हा तलाव गतवर्षी म्‍हणजेच दिनांक २५ जुलै, २०१९ रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍याआधी वर्ष २०१८ मध्‍ये १७ जुलै रोजी, वर्ष २०१७ मध्‍ये १८ जुलै रोजी तर त्‍याआधीच्‍या वर्षी म्‍हणजेच सन २०१६ मध्‍ये हा तलाव २ ऑगस्‍ट रोजी भरुन वाहू लागला होता.

स्वच्छ सर्वेक्षणात यंदा मुंबईला भोपळा; 'या' कारणामुळं झाली घसरण

सुशांतसिंह प्रकरण: मुंबई पोलीस आयुक्त गृहमंत्र्यांना घाईघाईत का भेटले, काय झाली चर्चा?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा दशलक्ष लीटर आहे. आज सकाळपर्यंत सातही तलावातील जलसाठा हा १२ लाख ६२ हजार ११९ दशलक्ष लीटर्स इतका असून तो क्षमतेच्‍या ८७.२० टक्‍के एवढा आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज