म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
या महिन्यात राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे अनेक शाळांमधील शैक्षणिक कामे खोळंबली असतानाच गांधी जयंतीचे नियोजनही पुरते कोलमडणार आहे. आज, बुधवारी विविध ठिकाणी प्रशिक्षण असल्यामुळे अनेक शाळांमध्ये नियोजित कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. यामुळे या कार्यक्रमाचा अहवाल शिक्षण विभागाकडे कसा सादर करायचा, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.
शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षकांना केवळ निवडणुकीच्या दिवसापुरतेच काम द्यावे, असे आदेश असतानाही प्रत्येक निवडणुकीच्यावेळी शिक्षकांना बीएलओच्या ड्युटीही दिल्या जातात. यामुळे शिक्षकांना महिनाभर शालेय कामापासून लांब राहावे लागते. मुंबईतील काही शाळांमध्ये सुमारे ५० टक्के शिक्षकांना निवडणूक कामावर नियुक्त केल्यामुळे तेथील मुख्याध्यापकांना शैक्षणिक वर्षाचे नियोजन नेमके कशा प्रकारे करावे, असा प्रश्न पडला आहे. अर्ज स्वीकारणे, नोंदणीपासून वंचित राहिलेल्या पात्र मतदारांचे तसेच ओळखपत्रांचे दुरुस्ती अर्ज स्वीकारणे, ऑनलाइन तसेच ऑफलाइन अर्जांची घरोघरी जाऊन पडताळणी करणे, मतदार ओळखपत्रांचे वाटप करणे, फोटो जमा करणे, मतदार याद्यांची पडताळणी करणे, दिव्यांग मतदारांचा शोध घेणे अशा विविध कामांसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर यंदा मुख्याध्यापकांनाही निवडणूक कामावर नियुक्त केल्यामुळे दैनंदिन प्रशासकीय कामही रखडणार आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यानुसार सर्व नियोजन झालेले असताना प्रशिक्षणामुळे सर्व रद्द करावे लागणार असल्याचे एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले.
परीक्षांचे वेळापत्रक बदलावे लागणार
गांधी जयंतीनिमित्त सप्ताहाचे आयोजन करून नई तालीम दिवस साजरा करण्याचे परिपत्रक ३० सप्टेंबरला काढण्यात आले आहे. प्रत्यक्षात हा सप्ताह २३ सप्टेंबरपासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र उशिरा पत्रक आल्यामुळे शाळांमध्ये या सप्ताहाचे नियोजन करण्यात आलेले नाही. दरम्यान, या सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित स्वच्छता मोहीम विविध शाळांनी यापूर्वीच पार पाडली आहे. यंदा शाळांमध्ये ई-सिगारेट आणि तंबाखूमुक्तीची शपथ घ्यावी, असे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. ही शपथ विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेऊन ही चूक कधीही होणार नाही असे लिहून घ्यावे, असेही यात नमूद केले आहे. आता या सर्व कार्यक्रमांचे आयोजन ३ ऑक्टोबर रोजी करावे लागणार आहे. मात्र यासाठी शाळांच्या सहामाही परीक्षांचे वेळपत्रकही बदलावे लागेल, अशी प्रतिक्रियाही शिक्षकांनी दिली.
या महिन्यात राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे अनेक शाळांमधील शैक्षणिक कामे खोळंबली असतानाच गांधी जयंतीचे नियोजनही पुरते कोलमडणार आहे. आज, बुधवारी विविध ठिकाणी प्रशिक्षण असल्यामुळे अनेक शाळांमध्ये नियोजित कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. यामुळे या कार्यक्रमाचा अहवाल शिक्षण विभागाकडे कसा सादर करायचा, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.
शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षकांना केवळ निवडणुकीच्या दिवसापुरतेच काम द्यावे, असे आदेश असतानाही प्रत्येक निवडणुकीच्यावेळी शिक्षकांना बीएलओच्या ड्युटीही दिल्या जातात. यामुळे शिक्षकांना महिनाभर शालेय कामापासून लांब राहावे लागते. मुंबईतील काही शाळांमध्ये सुमारे ५० टक्के शिक्षकांना निवडणूक कामावर नियुक्त केल्यामुळे तेथील मुख्याध्यापकांना शैक्षणिक वर्षाचे नियोजन नेमके कशा प्रकारे करावे, असा प्रश्न पडला आहे. अर्ज स्वीकारणे, नोंदणीपासून वंचित राहिलेल्या पात्र मतदारांचे तसेच ओळखपत्रांचे दुरुस्ती अर्ज स्वीकारणे, ऑनलाइन तसेच ऑफलाइन अर्जांची घरोघरी जाऊन पडताळणी करणे, मतदार ओळखपत्रांचे वाटप करणे, फोटो जमा करणे, मतदार याद्यांची पडताळणी करणे, दिव्यांग मतदारांचा शोध घेणे अशा विविध कामांसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर यंदा मुख्याध्यापकांनाही निवडणूक कामावर नियुक्त केल्यामुळे दैनंदिन प्रशासकीय कामही रखडणार आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यानुसार सर्व नियोजन झालेले असताना प्रशिक्षणामुळे सर्व रद्द करावे लागणार असल्याचे एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले.
परीक्षांचे वेळापत्रक बदलावे लागणार
गांधी जयंतीनिमित्त सप्ताहाचे आयोजन करून नई तालीम दिवस साजरा करण्याचे परिपत्रक ३० सप्टेंबरला काढण्यात आले आहे. प्रत्यक्षात हा सप्ताह २३ सप्टेंबरपासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र उशिरा पत्रक आल्यामुळे शाळांमध्ये या सप्ताहाचे नियोजन करण्यात आलेले नाही. दरम्यान, या सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित स्वच्छता मोहीम विविध शाळांनी यापूर्वीच पार पाडली आहे. यंदा शाळांमध्ये ई-सिगारेट आणि तंबाखूमुक्तीची शपथ घ्यावी, असे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. ही शपथ विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेऊन ही चूक कधीही होणार नाही असे लिहून घ्यावे, असेही यात नमूद केले आहे. आता या सर्व कार्यक्रमांचे आयोजन ३ ऑक्टोबर रोजी करावे लागणार आहे. मात्र यासाठी शाळांच्या सहामाही परीक्षांचे वेळपत्रकही बदलावे लागेल, अशी प्रतिक्रियाही शिक्षकांनी दिली.