मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
नवी मुंबईच्या खारघर येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या ट्रीटमेंट आणि रिसर्च सेंटरमध्ये २०१४ ला घडलेल्या अपघातात हॉस्पिटलमधील टेक्निशियन स्वामी रमैय्या आणि वॉर्ड बॉय सुनील जाधव हे दोघेही एमआरआय मशिनमध्ये अडकले होते. तीन वर्षांनंतर टेक्निशियन स्वामी रमैय्या यांना नुकसान भरपाई म्हणून १ कोटी रुपये टाटा मेमोरियलतर्फे देण्यात आले आहेत.
टेक्निशियन स्वामी रमैय्या (४०) आणि हॉस्पिटलच्या एमआरआय मशीनच्या खोलीत ऑक्सिजन सिलेंडर घेऊन येणारा ३१ वर्षीय वॉर्ड बॉय सुनील जाधव हे दोघेही कर्मचारी एमआरआय मशीनमध्ये अडकले होते. मशीनमध्ये अडकल्यामुळे रमैय्या यांच्या कमरेच्या खालील भागाला पॅरालिसिस झाले होते. पोटापासून मांड्यांच्या वरचा भाग तुटला होता तसेच त्यांच्या मूत्राशयालाही जबर मार बसल्याने ते निकामी झाले होते. किडनीलाही मोठी दुखापत झाली होती. तर सुनील जाधवचाही एक हात तुटला होता.
सुनील जाधव याच्या बेजबाबदारपणामुळेच हा अतिप्रसंग रमैय्या आणि त्याच्यावर ओढावला होता. एका कॅन्सर रुग्णाच्या तपासणीसाठी सुनीलला डॉक्टरांनी ऑक्सिजन मास्क आणण्यास सांगितले होते. पण तो ऑक्सिजन मास्कऐवजी ऑक्सिजन सिलेंडर घेऊन एमआरआय रुममध्ये गेला. एमआरआय रुममध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे धातूचे सामान घेऊन जाण्याची परवानगी नसते. कारण त्या रुममध्ये मॅग्नेटिक फिल्ड तयार केलेले असते. ऑक्सिजन सिलेंडर हा लोखंडापासून बनलेला असतो. जसे सुनील तो सिलेंडर आत घेऊन आला तसे मशीनने मॅग्नेटिक फिल्डच्या प्रभावामुळे त्याला आत ओढण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गडबडीत रमैय्या आणि सुनिल दोघेही मशिनमध्ये अडकले गेले.
या सर्व प्रकरणी २०१५ मध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. वैंकट वारा प्रसाद राव आणि अॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सरचे(एसीटीआरईसी) उपसंचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी अपघाताच्या चौकशीसाठी एक टीम तयार केली. टीमने आपला चौकशी अहवाल एसीटीआरईसीकडे सोपविला. त्यानंतर रमैय्या यांची स्थिती पाहून त्या आधारावर त्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम ठरविली गेली.
टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांनी नुकसान भरपाई दिली गेल्याचे सांगितले आहे. रमैय्या यांनीही त्याची पुष्टी केली आहे. रमैय्या म्हणाले की, 'मला मदत केल्याबद्दल मी माझ्या संस्थेचा आभारी आहे. मी या अपघातात जे गमावले ते या नुकसान भरपाईतून परत तर येणार नाही. पण तरीही माझी कोणतीही तक्रार नाही. मागील गोष्टींसाठी रडत बसण्यापेक्षा पुढे जाण्याची वेळ आता आहे.'
नवी मुंबईच्या खारघर येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या ट्रीटमेंट आणि रिसर्च सेंटरमध्ये २०१४ ला घडलेल्या अपघातात हॉस्पिटलमधील टेक्निशियन स्वामी रमैय्या आणि वॉर्ड बॉय सुनील जाधव हे दोघेही एमआरआय मशिनमध्ये अडकले होते. तीन वर्षांनंतर टेक्निशियन स्वामी रमैय्या यांना नुकसान भरपाई म्हणून १ कोटी रुपये टाटा मेमोरियलतर्फे देण्यात आले आहेत.
टेक्निशियन स्वामी रमैय्या (४०) आणि हॉस्पिटलच्या एमआरआय मशीनच्या खोलीत ऑक्सिजन सिलेंडर घेऊन येणारा ३१ वर्षीय वॉर्ड बॉय सुनील जाधव हे दोघेही कर्मचारी एमआरआय मशीनमध्ये अडकले होते. मशीनमध्ये अडकल्यामुळे रमैय्या यांच्या कमरेच्या खालील भागाला पॅरालिसिस झाले होते. पोटापासून मांड्यांच्या वरचा भाग तुटला होता तसेच त्यांच्या मूत्राशयालाही जबर मार बसल्याने ते निकामी झाले होते. किडनीलाही मोठी दुखापत झाली होती. तर सुनील जाधवचाही एक हात तुटला होता.
सुनील जाधव याच्या बेजबाबदारपणामुळेच हा अतिप्रसंग रमैय्या आणि त्याच्यावर ओढावला होता. एका कॅन्सर रुग्णाच्या तपासणीसाठी सुनीलला डॉक्टरांनी ऑक्सिजन मास्क आणण्यास सांगितले होते. पण तो ऑक्सिजन मास्कऐवजी ऑक्सिजन सिलेंडर घेऊन एमआरआय रुममध्ये गेला. एमआरआय रुममध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे धातूचे सामान घेऊन जाण्याची परवानगी नसते. कारण त्या रुममध्ये मॅग्नेटिक फिल्ड तयार केलेले असते. ऑक्सिजन सिलेंडर हा लोखंडापासून बनलेला असतो. जसे सुनील तो सिलेंडर आत घेऊन आला तसे मशीनने मॅग्नेटिक फिल्डच्या प्रभावामुळे त्याला आत ओढण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गडबडीत रमैय्या आणि सुनिल दोघेही मशिनमध्ये अडकले गेले.
या सर्व प्रकरणी २०१५ मध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. वैंकट वारा प्रसाद राव आणि अॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सरचे(एसीटीआरईसी) उपसंचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी अपघाताच्या चौकशीसाठी एक टीम तयार केली. टीमने आपला चौकशी अहवाल एसीटीआरईसीकडे सोपविला. त्यानंतर रमैय्या यांची स्थिती पाहून त्या आधारावर त्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम ठरविली गेली.
टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांनी नुकसान भरपाई दिली गेल्याचे सांगितले आहे. रमैय्या यांनीही त्याची पुष्टी केली आहे. रमैय्या म्हणाले की, 'मला मदत केल्याबद्दल मी माझ्या संस्थेचा आभारी आहे. मी या अपघातात जे गमावले ते या नुकसान भरपाईतून परत तर येणार नाही. पण तरीही माझी कोणतीही तक्रार नाही. मागील गोष्टींसाठी रडत बसण्यापेक्षा पुढे जाण्याची वेळ आता आहे.'