म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्य सरकारने नव्याने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, त्याचवेळी लोकलप्रवासाबाबत 'जैसे थे' आदेश असल्याने कर्मचाऱ्यांच्या प्रवासाचा प्रश्न जटील होणार आहे. करोनाची लाट आटोक्यात येत असल्याने लोकलसेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे. लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना तरी प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी भाजपने केली आहे. सोमवारी नवी नियमावली जाहीर झाली असली तरी त्यात लोकल सुरू करण्याबद्दल कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे प्रवासप्रश्न जटील झाला आहे. नव्या नियमानुसार खासगी आणि सरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होणार असतील तर नेमका कसा प्रवास करायचा याविषयी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. विरार, वसई तसेच डोंबिवली, बदलापूर, कसारा येथून चर्चगेट आणि सीएसटी परिसरात येणाऱ्या प्रवाशांना रेल्वेशिवाय पर्याय नाही. अन्य प्रवास महाग आहे. त्यामुळे सरकारने लोकल प्रवासाचा निर्णय का लांबवला, अशी विचारणा सुरू होती.
राज्य सरकारने नव्याने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, त्याचवेळी लोकलप्रवासाबाबत 'जैसे थे' आदेश असल्याने कर्मचाऱ्यांच्या प्रवासाचा प्रश्न जटील होणार आहे. करोनाची लाट आटोक्यात येत असल्याने लोकलसेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे. लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना तरी प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी भाजपने केली आहे. सोमवारी नवी नियमावली जाहीर झाली असली तरी त्यात लोकल सुरू करण्याबद्दल कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे प्रवासप्रश्न जटील झाला आहे. नव्या नियमानुसार खासगी आणि सरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होणार असतील तर नेमका कसा प्रवास करायचा याविषयी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. विरार, वसई तसेच डोंबिवली, बदलापूर, कसारा येथून चर्चगेट आणि सीएसटी परिसरात येणाऱ्या प्रवाशांना रेल्वेशिवाय पर्याय नाही. अन्य प्रवास महाग आहे. त्यामुळे सरकारने लोकल प्रवासाचा निर्णय का लांबवला, अशी विचारणा सुरू होती.