अ‍ॅपशहर

मुख्याध्यापकांवर ‘कस्टोडिअन’च्या जबाबदारीचा भार

दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान मुख्याध्यापकांना 'कस्टोडियन'ची जबाबदारी स्वीकारणार का, अशी विचारणा शिक्षण विभागाकडून केली जाऊ लागली आहे. प्रत्यक्षात मुख्याध्यापकांना हे काम दऊ नये, अशी विनंती वारंवार करूनही शिक्षण विभागामार्फत कोणताही तोडगा काढला जात नसल्यामुळे मुख्याध्यापक याबाबत नाराज आहेत.

Maharashtra Times 14 Feb 2018, 3:20 am
अधिकारी कमी म्हणून व्यवस्थेला मदत करण्याचे आवाहन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम headmasters


मुख्याध्यापकांचा विरोध

म. टा. विशेष प्रतिनधी, मुंबई

दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान मुख्याध्यापकांना 'कस्टोडियन'ची जबाबदारी स्वीकारणार का, अशी विचारणा शिक्षण विभागाकडून केली जाऊ लागली आहे. प्रत्यक्षात मुख्याध्यापकांना हे काम दऊ नये, अशी विनंती वारंवार करूनही शिक्षण विभागामार्फत कोणताही तोडगा काढला जात नसल्यामुळे मुख्याध्यापक याबाबत नाराज आहेत.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान अनेक मुख्याध्यापकांना एकाचवेळी केंद्र प्रमुख आणि कस्टोडियनची जबाबदारी पार पाडण्यास सांगितले जाते. या संदर्भात काही मुख्याध्यापकांना पत्र गेले आहे, तर काही मुख्याध्यापकांना कस्टोडियनचे काम करणार का, याबाबत विचारणा होत आहे. मात्र मुख्याध्यापक संघटना २०१६पासून यास विरोध करत आहे. मुख्याध्यापकाला एकाचवेळी दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणे अवघड जाते. कस्टोडियनची जबाबदारी ही खूप मोठी असते. त्यांच्याकडे आसपासच्या परिसरातील केंद्रांवरील प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांची जबाबदारी असते. हे सर्व काम करत असताना त्यांना त्यांच्या शाळेतील परीक्षा केंद्राचीही जबाबदारी पार पाडायची असते. यामुळे त्यांना कस्टोडियनच्या कामात अडकवू नये, अशी मुंबई माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेची मागणी असल्याचे संघटनेचे सचिव प्रशांत रेडिज यांनी सांगितले. याबाबत राज्य शिक्षण मंडळाशी पत्रव्यवहार केला असला, तरीही या वर्षीही मुख्याध्यापकांना विचारणा होऊ लागल्याचे ते म्हणाले.

परीक्षा घेण्यासाठी आम्हाला कस्टोडियनची आवश्यकता असते, यामुळे आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना ते पुरविण्याची मागणी करतो. शिक्षणाधिकारी नावे देतील, त्याप्रमाणे आम्ही पुढील कार्यवाही करतो, असे राज्य मंडळाच्या मुंबई विभागाचे सचिव सुभाष बोरसे यांनी सांगितले.

'सक्ती नाही'

या कामासाठी कोणत्याही मुख्याध्यापकावर सक्ती नसून ते हे काम करण्यास इच्छुक आहेत का, असे विचारत असल्याचे पालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी सांगितले. हे काम करण्यासाठी आवश्यक उप शिक्षणाधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत, यामुळे व्यवस्थेवर येणारा ताण कमी करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचेही पालकर म्हणाले. ज्या शाळांना केंद्र नाही, अशा शाळांच्या मुख्याध्यापकांना विचारणा होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज