म. टा. प्रतिनिधी, मुंबई
देशभरातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना आपत्कालीन व्यवस्थापनाची माहिती देण्याबाबत योग्य अंमलबजावणी होत नसल्याची गंभीर दखल विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात विद्यापीठांनी आपत्कालीन व्यवस्थापनाचा सहभाग अभ्यासक्रमात करण्याची सूचना करण्यात आली असून, मुंबईसह देशभरातील विद्यार्थ्यांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे पुस्तकी धडे मिळणार आहेत.
देशभरात अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवत असते. अशा परिस्थितीला तोंड देण्याकरिता आणि ती योग्यरीत्या हातळण्याकरिता युवा पिढीमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. याबाबत देशभरातील कॉलेजांना सूचना दिल्यानंतरही योग्य अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापनाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय ‘यूजीसी’ने घेतला आहे. त्यानुसार सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून कॉलेजांत आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे देण्याचे निर्देश दिले आहेत.
बॉम्बची अफवा अथवा स्फोट, भूकंप, आग, कॅम्पसमध्ये गोळीबार किंवा दहशतवादी हल्ले अशा आपत्कालीन स्थितीत काय करावे हे शिकवण्याची सूचना करण्यात आली आहे. कॉलेजांनी याचा अभ्यासक्रमात समावेश करताना आपत्त्कालीन परिस्थितीत आर्थिक अडचणी आल्या तर काय करावे याविषयी माहिती देण्याची सूचनाही करण्यात आली आहे. ‘यूजीसी’चे सचिव पी. के. ठाकूर यांनी हे निर्देश दिले आहेत. आता कॉलेज याची किती अंमलबजावणी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशभरातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना आपत्कालीन व्यवस्थापनाची माहिती देण्याबाबत योग्य अंमलबजावणी होत नसल्याची गंभीर दखल विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात विद्यापीठांनी आपत्कालीन व्यवस्थापनाचा सहभाग अभ्यासक्रमात करण्याची सूचना करण्यात आली असून, मुंबईसह देशभरातील विद्यार्थ्यांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे पुस्तकी धडे मिळणार आहेत.
देशभरात अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवत असते. अशा परिस्थितीला तोंड देण्याकरिता आणि ती योग्यरीत्या हातळण्याकरिता युवा पिढीमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. याबाबत देशभरातील कॉलेजांना सूचना दिल्यानंतरही योग्य अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापनाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय ‘यूजीसी’ने घेतला आहे. त्यानुसार सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून कॉलेजांत आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे देण्याचे निर्देश दिले आहेत.
बॉम्बची अफवा अथवा स्फोट, भूकंप, आग, कॅम्पसमध्ये गोळीबार किंवा दहशतवादी हल्ले अशा आपत्कालीन स्थितीत काय करावे हे शिकवण्याची सूचना करण्यात आली आहे. कॉलेजांनी याचा अभ्यासक्रमात समावेश करताना आपत्त्कालीन परिस्थितीत आर्थिक अडचणी आल्या तर काय करावे याविषयी माहिती देण्याची सूचनाही करण्यात आली आहे. ‘यूजीसी’चे सचिव पी. के. ठाकूर यांनी हे निर्देश दिले आहेत. आता कॉलेज याची किती अंमलबजावणी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.