अ‍ॅपशहर

धोकादायक इमारती ८ दिवसात रिकाम्या करू

भेंडीबाजारातील हुसैनीवाला इमारत कोसळल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालं आहे. धोकादायक इमारतीत राहणाऱ्या लोकांना जबरदस्तीने बाहेर काढल्या जाईल. आता सरकार थांबणार नाही. आठवड्याभरात ही कारवाई करण्यात येईल, असं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आज स्पष्ट केलं.

Maharashtra Times 31 Aug 2017, 3:21 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the dangerous buildings will be vacant in 8 days
धोकादायक इमारती ८ दिवसात रिकाम्या करू


भेंडीबाजारातील हुसैनीवाला इमारत कोसळल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालं आहे. धोकादायक इमारतीत राहणाऱ्या लोकांना जबरदस्तीने बाहेर काढल्या जाईल. आता सरकार थांबणार नाही. आठवड्याभरात ही कारवाई करण्यात येईल, असं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आज स्पष्ट केलं.

प्रकाश मेहता यांनी आज भेंडीबाजारात येऊन दुर्घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. या इमारत दुर्घटनेची नैतिक जबाबदारी सरकारनं स्विकारली आहे, असं सांगतानाच यापुढे कोणतीही दया माया न दाखवता धोकादायक इमारतीतील रहिवाशांना जबरदस्तीने बाहेर काढू. धोकादायक इमारती रिकाम्या करू. येत्या ८ दिवसात ही कारवाई करण्यात येणार असून त्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली जाणार असल्याचंही मेहता यांनी सांगितलं.

अनधिकृत बांधकाम झाल्याचे चौकशीत कळले तर महापालिका व म्हाडा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी मेहता यांनी दिला आहे. तसंच धोकादायक इमारतीतील लोकांनी संक्रमण शिबीरात जावं म्हणून त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. तर पालक मंत्री सुभाष देसाई यांनी हुसैनीवाला इमारत धोकादायक होती, असं स्पष्ट केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज