म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे सोमवारी पहाटे पवन एक्स्प्रेसच्या इंजिनने गाड्या थांबवण्याच्या बफरला जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी त्यामुळे पुन्हा सुरक्षित प्रवासाचा मुद्दा चर्चिला गेला आहे. यापूर्वी पश्चिम रेल्वेवर चर्चगेट येथे एका मोटरमनने दिलेल्या जोरदार धडकेने काही प्रवासी जखमी झाले होते.
एलटीटी येथे लांब पल्ल्यांच्या गाड्यांची ये-जा असून सोमवारी या टर्मिनलकडे पवन एक्स्प्रेस आल्यानंतर हा अपघात झाला. पहाटे चारच्या सुमारास लोको पायलटचे नियंत्रण सुटल्याने बफरला जोरदार धडक बसल्याचे सांगण्यात येते. या गाडीचे सारथ्य करणारे एस. के. चतुर्वेदी आठ वर्षांपासून मेल, एक्स्प्रेस चालवत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून घडलेल्या दुर्घटनेबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. या धडकेत कोणीही जखमी झाले नसले तरीही गाडी रुळांवरून घसरली. या धडकेचा मोठा आवाज झाल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. या धडकेत बफरप्रमाणेच तिथे जोडण्यात आलेली पाण्याची पाइपलाइन फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. या दुर्घटनेमागील कारण शोधण्याचे काम सुरू असून, इथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्यानेही गाडीचा नेमका वेग किती होता, हे तपासले जाणार आहे. त्या संपूर्ण चौकशीनंतरच धडकेचे कारण समजणार असल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या धडकेतून सावरलेल्या रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लगेचच ही गाडी या रुळांवरून अन्यत्र नेण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी सुमारे चार तासांचा कालावधी लागला. लोकल मार्गावर याप्रकारचे अपघात टाळण्यासाठी एडब्ल्यूएस (ऑक्सिलरी वॉर्निंग सिस्टीम) अंतर्भूत असते. मात्र, लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी टर्मिनसकडे अशी यंत्रणा उपलब्ध नसते.
कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे सोमवारी पहाटे पवन एक्स्प्रेसच्या इंजिनने गाड्या थांबवण्याच्या बफरला जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी त्यामुळे पुन्हा सुरक्षित प्रवासाचा मुद्दा चर्चिला गेला आहे. यापूर्वी पश्चिम रेल्वेवर चर्चगेट येथे एका मोटरमनने दिलेल्या जोरदार धडकेने काही प्रवासी जखमी झाले होते.
एलटीटी येथे लांब पल्ल्यांच्या गाड्यांची ये-जा असून सोमवारी या टर्मिनलकडे पवन एक्स्प्रेस आल्यानंतर हा अपघात झाला. पहाटे चारच्या सुमारास लोको पायलटचे नियंत्रण सुटल्याने बफरला जोरदार धडक बसल्याचे सांगण्यात येते. या गाडीचे सारथ्य करणारे एस. के. चतुर्वेदी आठ वर्षांपासून मेल, एक्स्प्रेस चालवत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून घडलेल्या दुर्घटनेबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. या धडकेत कोणीही जखमी झाले नसले तरीही गाडी रुळांवरून घसरली. या धडकेचा मोठा आवाज झाल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. या धडकेत बफरप्रमाणेच तिथे जोडण्यात आलेली पाण्याची पाइपलाइन फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. या दुर्घटनेमागील कारण शोधण्याचे काम सुरू असून, इथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्यानेही गाडीचा नेमका वेग किती होता, हे तपासले जाणार आहे. त्या संपूर्ण चौकशीनंतरच धडकेचे कारण समजणार असल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या धडकेतून सावरलेल्या रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लगेचच ही गाडी या रुळांवरून अन्यत्र नेण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी सुमारे चार तासांचा कालावधी लागला. लोकल मार्गावर याप्रकारचे अपघात टाळण्यासाठी एडब्ल्यूएस (ऑक्सिलरी वॉर्निंग सिस्टीम) अंतर्भूत असते. मात्र, लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी टर्मिनसकडे अशी यंत्रणा उपलब्ध नसते.