म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
काही गोविंदा पथकांनी वयाची अट आणि वजन यांचा समतोल राखण्यासाठी सर्वात वरच्या थरावर मुलींनाही चढवले. आतापर्यंत वरच्या थरावर मुलींना चढवण्याची पद्धत केवळ काही मंडळांमध्ये होती, मात्र यंदाच्या वर्षी याचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून आले. याच्या जोडीला महिला गोविंदा पथकेही होती. सहा थरांपर्यंत महिला गोविंदांनी मानवी मनोऱ्याचे थर रचले.
दादर येथे सलामीची दहीहंडी फोडून अनेक पथके उपनगरे, ठाण्याच्या दिशेने रवाना झाली. बोरिवली, घाटकोपर येथे दिवसभर दहीहंडीचा जोर होता तर शहरामध्ये गिरगाव, कुलाबा, ताडदेव, जांबोरी मैदान, वरळी नाका, प्रभादेवी, दादर येथे पथकांनी उपस्थिती लावली. दादरमध्ये स्टेशन परिसरातील दहीहंडीचे वातावरण दुपारनंतर ओसरू लागते, मात्र यंदा दुपारनंतरही तिथे उत्साही उपस्थिती होती. पाच ते सहा थर रचून या पथकांनी सलामी दिली. दादरमध्ये सकाळी पोलिसांना सलामी देण्यात आली. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांनाही गोविंदा पथकांनी आदरांजली वाहिली. ठाण्यासोबत घाटकोपर, बोरिवलीमध्येही सेलिब्रिटींनी उपस्थिती लावून गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला.
अभिनेते, राजकारण्यांचीही उपस्थिती
अभिनेते जितेंद्र, वरुण धवन, राधिका आपटे, तेजा देवकर, श्रुती मराठे, भाऊ कदम, स्मिता गोंदकर, रवीना टंडन यांनी विविध आयोजनामध्ये सहभाग नोंदवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आयोजित विविध दहीहंडी उत्सवामध्ये उपस्थिती लावून गोविंदांशी संवाद साधला, तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यामध्ये मनसेच्या दहीहंडीसाठी हजेरी लावली.
९३५ मंडळांचा विमा
शनिवारपर्यंत एकूण ९३५ मंडळांनी विमा काढला. गेल्या वर्षी फक्त ३८९ मंडळांनी विमा काढला होता. सोमवारी संध्याकाळपर्यंत यातील ८ गोविंदांनी विम्यासाठी दावा केल्याची माहिती ओरिएंटल इन्शुरन्सचे सहाय्यक प्रबंधक सचिन खानविलकर यांनी दिली.
काही गोविंदा पथकांनी वयाची अट आणि वजन यांचा समतोल राखण्यासाठी सर्वात वरच्या थरावर मुलींनाही चढवले. आतापर्यंत वरच्या थरावर मुलींना चढवण्याची पद्धत केवळ काही मंडळांमध्ये होती, मात्र यंदाच्या वर्षी याचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून आले. याच्या जोडीला महिला गोविंदा पथकेही होती. सहा थरांपर्यंत महिला गोविंदांनी मानवी मनोऱ्याचे थर रचले.
दादर येथे सलामीची दहीहंडी फोडून अनेक पथके उपनगरे, ठाण्याच्या दिशेने रवाना झाली. बोरिवली, घाटकोपर येथे दिवसभर दहीहंडीचा जोर होता तर शहरामध्ये गिरगाव, कुलाबा, ताडदेव, जांबोरी मैदान, वरळी नाका, प्रभादेवी, दादर येथे पथकांनी उपस्थिती लावली. दादरमध्ये स्टेशन परिसरातील दहीहंडीचे वातावरण दुपारनंतर ओसरू लागते, मात्र यंदा दुपारनंतरही तिथे उत्साही उपस्थिती होती. पाच ते सहा थर रचून या पथकांनी सलामी दिली. दादरमध्ये सकाळी पोलिसांना सलामी देण्यात आली. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांनाही गोविंदा पथकांनी आदरांजली वाहिली. ठाण्यासोबत घाटकोपर, बोरिवलीमध्येही सेलिब्रिटींनी उपस्थिती लावून गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला.
अभिनेते, राजकारण्यांचीही उपस्थिती
अभिनेते जितेंद्र, वरुण धवन, राधिका आपटे, तेजा देवकर, श्रुती मराठे, भाऊ कदम, स्मिता गोंदकर, रवीना टंडन यांनी विविध आयोजनामध्ये सहभाग नोंदवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आयोजित विविध दहीहंडी उत्सवामध्ये उपस्थिती लावून गोविंदांशी संवाद साधला, तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यामध्ये मनसेच्या दहीहंडीसाठी हजेरी लावली.
९३५ मंडळांचा विमा
शनिवारपर्यंत एकूण ९३५ मंडळांनी विमा काढला. गेल्या वर्षी फक्त ३८९ मंडळांनी विमा काढला होता. सोमवारी संध्याकाळपर्यंत यातील ८ गोविंदांनी विम्यासाठी दावा केल्याची माहिती ओरिएंटल इन्शुरन्सचे सहाय्यक प्रबंधक सचिन खानविलकर यांनी दिली.