म. टा. प्रतिनिधी, मुंबई
'ज्यांनी बोलायला हवे ते बोलत नाहीत. ज्यांनी प्रश्न विचारायला हवेत ते विचारत नाहीत. आम्ही प्रश्न विचारले तर आम्हालाच उलटे प्रश्न केले जातात. ही दमन नीती आहे', असे प्रतिपादन जेएनयू विद्यार्थी संघटनेचा युवा नेता कन्हैया कुमार याने बुधवारी केले. 'उमर खालिदवरील हल्ला असो किंवा जमावाकडून होणारी मारहाण असो, प्रत्येक गोष्टीतून निवडणुकीपूर्वी देशात भीतीचे वातावरण तयार केले जातेय. भीतीचे वातावरण तयार केले तरच ते निवडणुका जिंकू शकतील. त्यामुळेच जाणीवपूर्वक देशात भीती निर्माण केली जात आहे', असा आरोपही कन्हैया कुमारने केला.
मुंबईत प्रेस क्लबने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात कन्हैया कुमारने हा आरोप केला. 'तुरुंगातून सुटल्यानंतर चेंबूर येथे माझी सभा झाली. या सभेला काही लोकांनी विरोध केला. त्याच लोकांनी नंतर गौरी लंकेश यांची हत्या केली. मला विरोध करणारे आणि लंकेश यांचे मारेकरी यांच्यात काही तरी संबंध आहे', असा दावा कन्हैया कुमारने केला. 'लंकेश यांच्या मारेकऱ्यांना कर्नाटक पोलिस पकडणार असल्याची कुणकुण लागल्यानंतरच महाराष्ट्र पोलिसांनी या आरोपींना अटक केली. पाच वर्षांनंतर पोलिसांना अचानक या आरोपींना अटक करण्याची गरज का वाटली. याचा शोध घ्या', असे त्याने सांगितले.
प्रश्न विचारणे हेच क्रांतिकारक काम
'सध्या समाजात 'फोडा आणि राज्य करा'चा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. समाजात दुही माजवली जात आहे. त्याविरोधात बोलणाऱ्यांना गुन्हेगार ठरविले जात आहे. देशद्रोही, धर्मद्रोही आणि लष्करविरोधी ठरवले जात आहे', असे सांगतानाच 'सोशल मीडियावरून हॅशटॅगच्या नावाखाली वेगळीच मोहीम सुरू झाली आहे. प्रश्न विचारणाऱ्यांना ट्रोल करून धमकावले जात आहे. बलात्काराच्या धमक्याही दिल्या जात आहेत. या लोकांना अटक केली जात नाही. त्यामुळे आजच्या काळात सर्वांनी प्रश्न विचारायलाच हवेत. प्रश्न विचारणे हेच आजच्या घडीला क्रांतिकारक काम झाले आहे. त्यामुळे प्रश्न विचारत राहा', असे आवाहन कन्हैया कुमारने केले.
संयुक्त आघाडी निर्माण व्हावी
'आम्ही कुणाच्याच विरोधात नाही, पण आम्ही कुणाच्यासाठी तरी काम करत आहोत आणि हे तळागाळातील लोक आहेत. त्यामुळे देशात भक्कम पर्याय देण्यासाठी 'संयुक्त आघाडी' तयार होणे गरजेचे आहे. 'किमान समान कार्यक्रमा'वर आधारीत ही आघाडी असावी. संविधानिक मूल्यांवर विश्वास असणाऱ्यांनी या आघाडीत सामील व्हावे', असे आवाहनही कन्हैया कुमारने केले.
'ज्यांनी बोलायला हवे ते बोलत नाहीत. ज्यांनी प्रश्न विचारायला हवेत ते विचारत नाहीत. आम्ही प्रश्न विचारले तर आम्हालाच उलटे प्रश्न केले जातात. ही दमन नीती आहे', असे प्रतिपादन जेएनयू विद्यार्थी संघटनेचा युवा नेता कन्हैया कुमार याने बुधवारी केले. 'उमर खालिदवरील हल्ला असो किंवा जमावाकडून होणारी मारहाण असो, प्रत्येक गोष्टीतून निवडणुकीपूर्वी देशात भीतीचे वातावरण तयार केले जातेय. भीतीचे वातावरण तयार केले तरच ते निवडणुका जिंकू शकतील. त्यामुळेच जाणीवपूर्वक देशात भीती निर्माण केली जात आहे', असा आरोपही कन्हैया कुमारने केला.
मुंबईत प्रेस क्लबने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात कन्हैया कुमारने हा आरोप केला. 'तुरुंगातून सुटल्यानंतर चेंबूर येथे माझी सभा झाली. या सभेला काही लोकांनी विरोध केला. त्याच लोकांनी नंतर गौरी लंकेश यांची हत्या केली. मला विरोध करणारे आणि लंकेश यांचे मारेकरी यांच्यात काही तरी संबंध आहे', असा दावा कन्हैया कुमारने केला. 'लंकेश यांच्या मारेकऱ्यांना कर्नाटक पोलिस पकडणार असल्याची कुणकुण लागल्यानंतरच महाराष्ट्र पोलिसांनी या आरोपींना अटक केली. पाच वर्षांनंतर पोलिसांना अचानक या आरोपींना अटक करण्याची गरज का वाटली. याचा शोध घ्या', असे त्याने सांगितले.
प्रश्न विचारणे हेच क्रांतिकारक काम
'सध्या समाजात 'फोडा आणि राज्य करा'चा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. समाजात दुही माजवली जात आहे. त्याविरोधात बोलणाऱ्यांना गुन्हेगार ठरविले जात आहे. देशद्रोही, धर्मद्रोही आणि लष्करविरोधी ठरवले जात आहे', असे सांगतानाच 'सोशल मीडियावरून हॅशटॅगच्या नावाखाली वेगळीच मोहीम सुरू झाली आहे. प्रश्न विचारणाऱ्यांना ट्रोल करून धमकावले जात आहे. बलात्काराच्या धमक्याही दिल्या जात आहेत. या लोकांना अटक केली जात नाही. त्यामुळे आजच्या काळात सर्वांनी प्रश्न विचारायलाच हवेत. प्रश्न विचारणे हेच आजच्या घडीला क्रांतिकारक काम झाले आहे. त्यामुळे प्रश्न विचारत राहा', असे आवाहन कन्हैया कुमारने केले.
संयुक्त आघाडी निर्माण व्हावी
'आम्ही कुणाच्याच विरोधात नाही, पण आम्ही कुणाच्यासाठी तरी काम करत आहोत आणि हे तळागाळातील लोक आहेत. त्यामुळे देशात भक्कम पर्याय देण्यासाठी 'संयुक्त आघाडी' तयार होणे गरजेचे आहे. 'किमान समान कार्यक्रमा'वर आधारीत ही आघाडी असावी. संविधानिक मूल्यांवर विश्वास असणाऱ्यांनी या आघाडीत सामील व्हावे', असे आवाहनही कन्हैया कुमारने केले.