मुंबई : तानसा पाइपलाइनलगतच्या रहिवाशांचे माहुल येथे स्थलांतर केल्यानंतर त्यांची नावेही मतदार यादीमधून काढून टाकण्यात आली आहेत. माहुलमध्ये राहणाऱ्या सोळाशे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क सोमवारी बजावता आला नाही. या मतदारांनी पूर्वीच्या तसेच माहुलमधील केंद्रांवरही चौकशी केली. मात्र मतदार यादीमध्ये नाव नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावता येणार नाही, असे सांगण्यात आले. सरकारच्या बेजबाबदारपणामुळे मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले, असा आक्षेप माहुलवासियांनी घेतला.
माहुलवासी मतहक्कापासून वंचित
तानसा पाइपलाइनलगतच्या रहिवाशांचे माहुल येथे स्थलांतर केल्यानंतर त्यांची नावेही मतदार यादीमधून काढून टाकण्यात आली आहेत...
MT 30 Apr 2019, 4:00 am