मुंबई: विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार सक्रिय झाले आहेत. पवार यांनी राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींवर मोजकंच पण अत्यंत महत्त्वाचं असं भाष्य केलं आहे. पवारांच्या विधानामुळे नवा विधानसभा अध्यक्ष कोण होणार, हा सोपा वाटणारा प्रश्न गुंतागुंतीचा बनला आहे. ( Sharad Pawar On Maharashtra Assembly Speaker Post ) वाचा: नाना पटोले यांचा अखेर राजीनामा; विधानसभाध्यक्षपद काँग्रेसकडून जाणार?
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सत्तावाटप निश्चित केलं होतं. त्यात विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे गेलं होतं. मात्र, आता काँग्रेस श्रेष्ठींचा पटोले यांच्याकडे महाराष्ट्रात पक्षाची धुरा देण्याचा विचार असल्याने पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा आज राजीनामा दिला आहे. या घडामोडीनंतर हे पद काँग्रेसकडे राहणार की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यावर दावा सांगणार, हा कळीचा प्रश्न बनला आहे. त्यात शरद पवार यांच्या सूचक विधानाने हा प्रश्न सहज सुटणारा नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
वाचा: बाळासाहेब थोरात होऊ शकतात उपमुख्यमंत्री?; अजित पवार म्हणाले...
शरद पवार सध्या दिल्लीत असून महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींवर माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी त्यावर आपल्या खास शैलीत उत्तर दिले. 'विधानसभा अध्यक्षपद हे सरकारमधील तिन्ही पक्षांचे होते. नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे या पदाची व्हेकन्सी तयार झाली आहे. हे पद आता खुलं झालं आहे. या पदाबाबत आता पुन्हा चर्चा होईल', असे पवार म्हणाले. पदाचा राजीनामा देण्याआधी नाना पटोले यांनी त्याची शिवसेना आणि राष्ट्रवादीला कल्पना दिली होती. पक्षात त्यांना नवी जबाबदारी मिळत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यावर भाष्य करणे योग्य नाही. ती काँग्रेसची अंतर्गत बाब आहे, असेही पवार म्हणाले.
वाचा: तर तिसरा उपमुख्यमंत्री अपक्षांचा करा!; बच्चू कडू यांनी 'ती' शक्यता फेटाळली
शरद पवार यांच्या या विधानाने राज्यातील राजकारण तापणार हे निश्चित आहे. विधानसभा अध्यक्षपद खुले झाले आहे, असे पवार म्हणाल्याने एकप्रकारे राष्ट्रवादीकडूनही या पदावर दावा केला जाण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला मिळावं आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद द्यावं, अशाप्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, त्यालाही पवारांच्या विधानाने छेद मिळाला आहे.
वाचा: विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा ; पटोलेंची 'ही' पहिली प्रतिक्रिया
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सत्तावाटप निश्चित केलं होतं. त्यात विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे गेलं होतं. मात्र, आता काँग्रेस श्रेष्ठींचा पटोले यांच्याकडे महाराष्ट्रात पक्षाची धुरा देण्याचा विचार असल्याने पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा आज राजीनामा दिला आहे. या घडामोडीनंतर हे पद काँग्रेसकडे राहणार की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यावर दावा सांगणार, हा कळीचा प्रश्न बनला आहे. त्यात शरद पवार यांच्या सूचक विधानाने हा प्रश्न सहज सुटणारा नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
वाचा: बाळासाहेब थोरात होऊ शकतात उपमुख्यमंत्री?; अजित पवार म्हणाले...
शरद पवार सध्या दिल्लीत असून महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींवर माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी त्यावर आपल्या खास शैलीत उत्तर दिले. 'विधानसभा अध्यक्षपद हे सरकारमधील तिन्ही पक्षांचे होते. नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे या पदाची व्हेकन्सी तयार झाली आहे. हे पद आता खुलं झालं आहे. या पदाबाबत आता पुन्हा चर्चा होईल', असे पवार म्हणाले. पदाचा राजीनामा देण्याआधी नाना पटोले यांनी त्याची शिवसेना आणि राष्ट्रवादीला कल्पना दिली होती. पक्षात त्यांना नवी जबाबदारी मिळत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यावर भाष्य करणे योग्य नाही. ती काँग्रेसची अंतर्गत बाब आहे, असेही पवार म्हणाले.
वाचा: तर तिसरा उपमुख्यमंत्री अपक्षांचा करा!; बच्चू कडू यांनी 'ती' शक्यता फेटाळली
शरद पवार यांच्या या विधानाने राज्यातील राजकारण तापणार हे निश्चित आहे. विधानसभा अध्यक्षपद खुले झाले आहे, असे पवार म्हणाल्याने एकप्रकारे राष्ट्रवादीकडूनही या पदावर दावा केला जाण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला मिळावं आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद द्यावं, अशाप्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, त्यालाही पवारांच्या विधानाने छेद मिळाला आहे.
वाचा: विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा ; पटोलेंची 'ही' पहिली प्रतिक्रिया