मुंबईच्या आरे कॉलनीत झाडांची कत्तल होत असताना राज्यात प्लास्टिकबंदी करणारे नकली पर्यावरण मंत्री कुठे गेले आहेत असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी उपस्थित केला आहे. तर आरे कॉलनीतील वृक्षतोडीच्या प्रश्नावर सरकार अहंकारी भूमिका घेत आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरद्वारे केला आहे. आरे कॉलनीतील हे जंगल मुंबईचे फुफ्फुस असून ते वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेणे अपेक्षित होते, असे सुप्रिया यांचे म्हणणे आहे. आरेतील वृक्षतोड म्हणजे मुंबईकरांचे नाक दाबून मारण्याचा प्रकार आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
सरकारची भूमिका अहंकारी
मुंबईच्या आरे कॉलनीत झाडांची कत्तल होत असताना राज्यात प्लास्टिकबंदी करणारे नकली पर्यावरण मंत्री कुठे गेले आहेत असा संतप्त सवाल राष्ट्रवादी ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Oct 2019, 4:00 am