म. टा विशेष प्रतिनिधी, मुंबई
मागील दोन दिवस अतिवृष्टीमुळे शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयास विलंब झाल्याच्या वादानंतर अखेर मुंबई शहर आणि उपनगरात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन आगामी काळात शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय मुंबई महापालिका घेईल, असे शिक्षणमंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी स्पष्ट केले.
मुंबईत मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर तावडे यांनी बुधवारी पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली. पावसाची परिस्थिती, आगामी काळात अतिवृष्टी झाल्यास विविध सरकारी यंत्रणांनी समन्वयाने करावयाच्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. या बैठकीला महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार अॅड. आशीष शेलार, पालिका आयुक्त अजय मेहता, पोलिस आयुक्त सुबोध जयस्वाल, कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्यासह विविध विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर अतिवृष्टी होत असेल तर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याबाबतचे परिपत्रक त्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत पालिकेमार्फत जारी करण्यात येईल आणि हे परिपत्रक सर्व शाळांसाठी असेल, असे तावडे यांनी स्पष्ट केले. अतिवृष्टी झाली तर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी सरकारी कृती यंत्रणेची एक समन्वय समिती करण्यात येईल. ही कृती समिती व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व यंत्रणेशी जोडली जाईल. यामध्ये सर्व सरकारी यंत्रणा एकत्रितपणे काम करतील, असे तावडे यांनी सांगितले.
२० ठिकाणांवरच उपाययोजना
पालिकेने केलेल्या सादरीकरणामध्ये मुंबईतील पाणी साचणारी २२५ ठिकाणे निश्चित केली असून त्यातील १२० ठिकाणांवरच पालिका उपाययोजना करू शकली आहे. उर्वरित १०५ ठिकाणांवर पाणी तुंबत असले तरी त्याबाबत उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे पालिकेने मान्य केले. त्यामुळे याठिकाणी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार आशीष शेलार यांनी केली. पालिका, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग या प्राधिकरणांच्या अखत्यारीत २०० ठिकाणांवर ८५० हून अधिक खड्डे पडल्याचे निदर्शनास आणत ते तातडीने बुजवावे, असे शेलार यांनी सांगितले.
मागील दोन दिवस अतिवृष्टीमुळे शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयास विलंब झाल्याच्या वादानंतर अखेर मुंबई शहर आणि उपनगरात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन आगामी काळात शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय मुंबई महापालिका घेईल, असे शिक्षणमंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी स्पष्ट केले.
मुंबईत मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर तावडे यांनी बुधवारी पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली. पावसाची परिस्थिती, आगामी काळात अतिवृष्टी झाल्यास विविध सरकारी यंत्रणांनी समन्वयाने करावयाच्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. या बैठकीला महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार अॅड. आशीष शेलार, पालिका आयुक्त अजय मेहता, पोलिस आयुक्त सुबोध जयस्वाल, कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्यासह विविध विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर अतिवृष्टी होत असेल तर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याबाबतचे परिपत्रक त्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत पालिकेमार्फत जारी करण्यात येईल आणि हे परिपत्रक सर्व शाळांसाठी असेल, असे तावडे यांनी स्पष्ट केले. अतिवृष्टी झाली तर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी सरकारी कृती यंत्रणेची एक समन्वय समिती करण्यात येईल. ही कृती समिती व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व यंत्रणेशी जोडली जाईल. यामध्ये सर्व सरकारी यंत्रणा एकत्रितपणे काम करतील, असे तावडे यांनी सांगितले.
२० ठिकाणांवरच उपाययोजना
पालिकेने केलेल्या सादरीकरणामध्ये मुंबईतील पाणी साचणारी २२५ ठिकाणे निश्चित केली असून त्यातील १२० ठिकाणांवरच पालिका उपाययोजना करू शकली आहे. उर्वरित १०५ ठिकाणांवर पाणी तुंबत असले तरी त्याबाबत उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे पालिकेने मान्य केले. त्यामुळे याठिकाणी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार आशीष शेलार यांनी केली. पालिका, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग या प्राधिकरणांच्या अखत्यारीत २०० ठिकाणांवर ८५० हून अधिक खड्डे पडल्याचे निदर्शनास आणत ते तातडीने बुजवावे, असे शेलार यांनी सांगितले.