‘मटा हेल्पलाइन’च्या गुणवंतांना बारावीतही घवघवीत यश
अजय उभारे, कॉलेज क्लब रिपोटर
मुंबई : ‘मटा’च्या वाचकांनी २०१५ च्या 'मटा हेल्पलाइन'च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरजांकरता आर्थिक आधार दिला. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा खडतर मार्ग सुकर झाला. समाजऋणाचे भान राखून या गुणवंतांनी यशाची नवी शिखरे गाठली आणि काहीअंशी वाचकांच्या ऋणांची परतफेडही हे विद्यार्थी करत आहेत. वाचकांनी केलेल्या मदतीतून २०१५च्या या गुणवंतांनी बारावीतही घवघवीत यश मिळवत वाचकांचा विश्वास सार्थ ठरवला. शिकण्याची जिद्द अंगी बाळगून या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वाटचालीत भरारी घेण्याचे ठरवले आहे. मिळालेल्या आर्थिक मदतीसाठी त्यांनी मटा आणि वाचकांचे आभार मानले.
समाजाच्या दातृत्वाचे लखलखीत उदाहरण ठरलेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा हेल्पलाइन’ उपक्रमाने अनेक गुणवंतांच्या पंखांना बळ दिले. घरची खालावलेली आर्थिक परिस्थिती आणि समोर शिक्षणाचा बलाढ्य डोंगर. त्यामुळे गुणवत्ता होती पण शिक्षणाचा खर्च परवडणारा नव्हता. अंधारात जणू आशेचा प्रकाशकिरण मिळावा अगदी तशीच या विद्यार्थाना 'हेल्पलाइन'ची साथ मिळाली आणि त्यांना शिक्षणाचा राजमार्ग सापडला.
'मटा हेल्पलाइन'मार्फत मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे या विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पुढे चालू ठेवता आले. २०१५च्या 'मटा हेल्पलाइन' बॅचमधील अक्षता जैपातकर हिने दहावीनंतर मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत तिने कॉमर्स शाखेत ९१.५४% घवघवीत यश मिळवले. अकाऊंट्स विषयात ९९, ओसी विषयात ९३ आणि मॅथेमॅटिक्स आणि स्टॅटेस्टिक विषयात ९८ गुण तिला मिळाले. मला मिळलेल्या या यशात माझ्या आई-वडिलांसह मटा वाचकांचाही मोलाचा वाटा असल्याचे ती आवर्जून सांगते. अक्षता सध्या सीपीटी परीक्षेची तयारी करत असून तिला सीए करायचे आहे.
मनाली सावंत या विद्यार्थिनीला सायन्स शाखेत ८९.७०% गुण मिळाले असून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये तिला करिअर करायचे आहे, तर शलाका पंडित या विद्यार्थिनीला कॉमर्स शाखेत ८८% गुण मिळवले. सध्या तिने सीएस कोर्ससाठी एका संस्थेत प्रवेश घेतला आहे. हेल्पलाइनचा मदतीचा हात मिळालेल्या मीनाक्षी शिंदेला आर्टस शाखेतून ८३ टक्के मिळाले. पुढे तिला बीए करायची इच्छा आहे. सुषमा परब या विद्यार्थिनीलाही आर्टसमध्ये ८३.५३% गुण मिळाले असून तिला आयएएस बनायचे आहे. त्यादृष्टीने तिचे प्रयत्न सुरू आहेत. ऋषिकेश लांडे या विद्यार्थ्याने सायन्स शाखेत ८३% मिळवले असून, त्याला मेडिकल क्षेत्रात करिअर घडवण्याची इच्छा आहे.
धीरज मसूरकर हा विद्यार्थी कॉमर्समधून ७८% गुणांसह यशस्वी झाला. कविता शिंदे ही विद्यार्थिनी सायन्स शाखेत ७०% गुण मिळवून सीईटीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. निशा तरटेला बारावी सायन्समध्ये ७६.७६% मिळाले असून, ती याच शाखेतून पुढे करिअर करायचा विचार करत आहे. सायली आगटे या विद्यार्थिनीला कॉमर्स शाखेत बारावीला ८८.९३% गुण मिळाले आहेत. अंजली पाटील हिला सायन्स शाखेत ७२.६१, तर भाग्यश्री सूर्यवंशीला ६५.८५ टक्के मिळाले आहेत. भाग्यश्रीने बारावी बरोबरच नीट आणि सीईटी ही प्रवेश परीक्षाही दिली आहे. सतीश नाईकला ७९.३०, तर वैशाली मोरेने बारावीला उत्तम यश मिळवले असून या दोघांना आर्किटकचरमध्ये करिअर करायचे आहे.
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळाले नसते तर आजचे यश कदाचित शक्य झाले नसते, अशा भावना या सर्व विद्यार्थांनी व्यक्त केल्या.
अजय उभारे, कॉलेज क्लब रिपोटर
मुंबई : ‘मटा’च्या वाचकांनी २०१५ च्या 'मटा हेल्पलाइन'च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरजांकरता आर्थिक आधार दिला. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा खडतर मार्ग सुकर झाला. समाजऋणाचे भान राखून या गुणवंतांनी यशाची नवी शिखरे गाठली आणि काहीअंशी वाचकांच्या ऋणांची परतफेडही हे विद्यार्थी करत आहेत. वाचकांनी केलेल्या मदतीतून २०१५च्या या गुणवंतांनी बारावीतही घवघवीत यश मिळवत वाचकांचा विश्वास सार्थ ठरवला. शिकण्याची जिद्द अंगी बाळगून या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वाटचालीत भरारी घेण्याचे ठरवले आहे. मिळालेल्या आर्थिक मदतीसाठी त्यांनी मटा आणि वाचकांचे आभार मानले.
समाजाच्या दातृत्वाचे लखलखीत उदाहरण ठरलेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा हेल्पलाइन’ उपक्रमाने अनेक गुणवंतांच्या पंखांना बळ दिले. घरची खालावलेली आर्थिक परिस्थिती आणि समोर शिक्षणाचा बलाढ्य डोंगर. त्यामुळे गुणवत्ता होती पण शिक्षणाचा खर्च परवडणारा नव्हता. अंधारात जणू आशेचा प्रकाशकिरण मिळावा अगदी तशीच या विद्यार्थाना 'हेल्पलाइन'ची साथ मिळाली आणि त्यांना शिक्षणाचा राजमार्ग सापडला.
'मटा हेल्पलाइन'मार्फत मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे या विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पुढे चालू ठेवता आले. २०१५च्या 'मटा हेल्पलाइन' बॅचमधील अक्षता जैपातकर हिने दहावीनंतर मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत तिने कॉमर्स शाखेत ९१.५४% घवघवीत यश मिळवले. अकाऊंट्स विषयात ९९, ओसी विषयात ९३ आणि मॅथेमॅटिक्स आणि स्टॅटेस्टिक विषयात ९८ गुण तिला मिळाले. मला मिळलेल्या या यशात माझ्या आई-वडिलांसह मटा वाचकांचाही मोलाचा वाटा असल्याचे ती आवर्जून सांगते. अक्षता सध्या सीपीटी परीक्षेची तयारी करत असून तिला सीए करायचे आहे.
मनाली सावंत या विद्यार्थिनीला सायन्स शाखेत ८९.७०% गुण मिळाले असून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये तिला करिअर करायचे आहे, तर शलाका पंडित या विद्यार्थिनीला कॉमर्स शाखेत ८८% गुण मिळवले. सध्या तिने सीएस कोर्ससाठी एका संस्थेत प्रवेश घेतला आहे. हेल्पलाइनचा मदतीचा हात मिळालेल्या मीनाक्षी शिंदेला आर्टस शाखेतून ८३ टक्के मिळाले. पुढे तिला बीए करायची इच्छा आहे. सुषमा परब या विद्यार्थिनीलाही आर्टसमध्ये ८३.५३% गुण मिळाले असून तिला आयएएस बनायचे आहे. त्यादृष्टीने तिचे प्रयत्न सुरू आहेत. ऋषिकेश लांडे या विद्यार्थ्याने सायन्स शाखेत ८३% मिळवले असून, त्याला मेडिकल क्षेत्रात करिअर घडवण्याची इच्छा आहे.
धीरज मसूरकर हा विद्यार्थी कॉमर्समधून ७८% गुणांसह यशस्वी झाला. कविता शिंदे ही विद्यार्थिनी सायन्स शाखेत ७०% गुण मिळवून सीईटीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहे. निशा तरटेला बारावी सायन्समध्ये ७६.७६% मिळाले असून, ती याच शाखेतून पुढे करिअर करायचा विचार करत आहे. सायली आगटे या विद्यार्थिनीला कॉमर्स शाखेत बारावीला ८८.९३% गुण मिळाले आहेत. अंजली पाटील हिला सायन्स शाखेत ७२.६१, तर भाग्यश्री सूर्यवंशीला ६५.८५ टक्के मिळाले आहेत. भाग्यश्रीने बारावी बरोबरच नीट आणि सीईटी ही प्रवेश परीक्षाही दिली आहे. सतीश नाईकला ७९.३०, तर वैशाली मोरेने बारावीला उत्तम यश मिळवले असून या दोघांना आर्किटकचरमध्ये करिअर करायचे आहे.
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळाले नसते तर आजचे यश कदाचित शक्य झाले नसते, अशा भावना या सर्व विद्यार्थांनी व्यक्त केल्या.